राज्यातील शिवभोजन थाळी योजनेवर आर्थिक संकटात सापडली आहे. केंद्र चालकांची तब्बल ७ महिन्यांची बिले सरकारकडे थकीत असून ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. फेब्रुवारी २०२५ नंतर केंद्र चालकांना एकाही महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. राज्यात सध्या १,८८४ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. पूर्वी ही संख्या सुमारे २,५०० होती. मात्र अनुदान वेळेत न मिळाल्यामुळे अनेक केंद्र बंद पडली आहेत. शिवभोजन […]Read More
बुलढाणा, दि १८ बुलढाण्याच्या जळगाव-जामोद तालुक्यातील आडोळ डॅम परिसरातील गावठाण रस्त्याच्या मागणीसाठी गौलखेड येथील तरुण विनोद पवार यांचा जलसमाधी आंदोलनात मृत्यू झाला, हा सरकारी अनास्थेने घेतलेला बळी आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज गौलखेड येथे पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले […]Read More
पुणे, दि १८निसर्ग हा मानवाचा पहिला गुरू आहे. निसर्गाशी संवाद साधण्यासाठी काव्य लेखन हे उत्तम माध्यम आहे. देशाच्या स्वातंत्र्यात कविता आणि साहित्यातील विविध प्रकारांचे अमूल्य योगदान आहे. समाजभान असणाऱ्या कवींना व सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याचे काम पिंपरीतील आर्य समाज संस्था सलग पंचवीस वर्ष करत आहे हे अभिमानास्पद आहे असे नांदेड येथील ज्येष्ठ लेखिका […]Read More
पुणे, दि १८भारतीय स्वातंत्र्याचे शतक साजरे होत असताना २०४७ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था सहा दश लक्ष डॉलरचा टप्पा पार करेल. यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग व्यवसाय उभारणार्या भारतीय आणि मराठी उद्योजकांचे योगदान उल्लेखनीय असेल असा विश्वास भारत आणि दुबई संयुक्त अरब अमिरातीचे वाणिज्य दूत सतीशकुमार शिवन यांनी व्यक्त केला.पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ […]Read More
मुंबई दि १८ — मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर रेड अलर्ट देण्यात आलेल्या मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड , नाशिक जिल्ह्यातील घाटमाथा, बुलडाणा जिल्ह्यातील दोन तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये यांना उद्या, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याकडून उद्या मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई सह या सगळ्या जिल्ह्यात […]Read More
सांगली दि १८:- सांगली जिल्ह्यात सर्वदूर हलक्या सरी पडत आहेत. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.वारणा धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळ जलाशय परिचलन सूची प्रमाण धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून वक्र द्वारा द्वारे 10,000 क्युसेक आणि विद्युत गृहातून 1630 असा एकूण […]Read More
मुंबई, दि १८मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर काही काळ ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा एकदा दमदार पुनरागमन करत चर्चेत आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या १२व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवात (२०२२–२३) तिच्या मोग या कोंकणी चित्रपटासाठी तिला ‘बेस्ट अॅक्ट्रेस’चा विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर झाला. जोजो डिसुझा दिग्दर्शित मोग ही प्रेम, संघर्ष आणि मानवी नात्यांची कहाणी सांगणारी […]Read More
उर्ग्येन आर्ट फेस्टिव्हल – पुण्यात उर्ग्येन संघरक्षित यांच्या शताब्दी वर्षानिमित्त
पुणे, दि १८: त्रिरत्न इन्स्टिट्यूट आणि करुणदीप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उर्ग्येन आर्ट फेस्टिव्हल हा भव्य सांस्कृतिक सोहळा २१ ते २६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत बालगंधर्व कला दालन, जंगली महाराज रोड, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. हा महोत्सव त्रिरत्न बौद्ध समुदायाचे संस्थापक व आधुनिक बौद्ध पुनरुज्जीवनाचे अग्रणी उर्ग्येन संघरक्षित (१९२५–२०१८) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त साजरा […]Read More
मुंबई, दि. १८ :– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेशकुमार, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, आपत्ती व्यवस्थापन अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, […]Read More
मुंबई, दि १८- “टि सी एस कर्मचारी कपातीमुळे एकूणच आय टी कर्मचारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष मनोज व्यवहारे यांनी टिसीएस कर्मचारी कपाती विरोधात राज्यातील कार्यकर्त्यांसोबत ठीक ठिकाणी जोरदार ठिय्या आंदोलन केले आहे. याबाबत त्यांनी नुकतीच मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका […]Read More