ठाणे दि २८– ठाण्यातील अंबर इंटरनॅशनल स्कूल’ आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था’ अर्थात इस्रोच्या स्पेस ट्यूटर प्रोग्राम अंतर्गत व्योमिका स्पेस अकॅडमी यांच्यात शनिवारी, 28 जून रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये मुंबई महानगर क्षेत्रातील (एम. एम. आर.) पहिली स्पेस एज्युकेशन लॅब ठाण्यातील `अंबर इंटरनॅशनल स्कूल’ येथे लक्ष्मण कदम यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात येणार आहे. या […]Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) उपस्थित असलेल्या भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्याशी थेट संवाद साधला. व्हिडिओ कॉलद्वारे पार पडलेला हा संवाद देशभरात प्रसारित झाला आणि नागरिकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. शुक्ला हे अॅक्सिओम स्पेसच्या AX-4 मोहिमेचे मिशन पायलट आहेत आणि १९८४ नंतर अंतराळात गेलेले पहिले भारतीय अंतराळवीर म्हणून ओळखले […]Read More
पुणे, दि. २८ : आधुनिक काळात लोकांच्या भावनांचा फायदा घेणारी बाबा-बुवाही अत्याधुनिक साधने वापरू लागली आहेत. पोथ्यांमध्ये दिसणारे बाबा आता लोकांच्या मोबाईलमध्येही डोकावू लागले आहेत. आपल्याकडे दिव्यशक्ती असल्याचे भासवत मोबाईल अँपद्वारे भक्तांवर नजर ठेवणाऱ्या भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद दादा उर्फ दादा उर्फ प्रसाद दादा भीमराव तामदार असं अटक केलेल्या 29 वर्षीय […]Read More
एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना आवश्यक मुंबई, दि. २८ :– राज्यातील एकल महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनात महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी एकल महिलांच्या सविस्तर समस्या मांडल्या. यावेळी अपर मुख्य सचिव व्ही. राधा, महिला व […]Read More
नवी दिल्ली,दि. २८ : वरिष्ठ IPS अधिकारी पराग जैन यांची भारताच्या बाह्य गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) च्या नवीन प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते रवि सिन्हा यांच्यानंतर १ जुलै २०२५ पासून पदभार स्वीकारतील. ही नियुक्ती २ वर्षांच्या निश्चित कालावधीसाठी करण्यात आली आहे. पराग जैन हे १९८९ बॅचचे पंजाब कॅडरचे आयपीएस अधिकारी असून […]Read More
भारत सरकारने २०१९ मध्ये कोल्हापुरी चपलांना जीआय टॅग प्रदान केला आहे. २३ जून रोजी प्राडाने मिलान येथे आयोजित केलेल्या पुरुषांच्या २०२६ स्प्रिंग/समर संग्रहात कोल्हापुरी चपलांसारख्या सँडल्स सादर केल्या होत्या. त्यानंतर झालेल्या गदारोळानंतर Prada ला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲॅग्रिकल्चर ने पाठवलेल्या पत्राला उत्तर देताना, Pradaने स्पष्ट केले की, त्यांच्या अलीकडील पुरुषांच्या फॅशन शोमध्ये […]Read More
महाड दि २८(मिलिंद माने)– सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून रत्नागिरी , रायगड या तीन जिल्ह्याला जोडणाऱ्या महत्त्वकांक्षी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात होऊन तब्बल १८ वर्षाचा कालावधी लोटला. मात्र मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम नेमके कोणत्या वर्षात पूर्ण होणार असा सवालच आता कोकणकर जनता राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना विचारत असून सन २००५ पासून तयार झालेल्या DPR. प्रोजेक्ट […]Read More
मुंबई दि २८:– इयत्ता पहिली ते चौथी पर्यंच्या विद्यार्थ्यांना दोनपेक्षा अधिक भाषा शिकणे दडपणाचे आहे, असा तज्ज्ञांचा दावा असून महायुती सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून हिंदी या तिसऱ्या भाषेची केलेली सक्ती गैर आहे. त्याला विरोध असून ५ जुलै रोजी मराठीसाठी मुंबईत आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका […]Read More
छत्रपती संभाजीनगर मधील वैजापुरमधून एक भयंकर बातमी समोर येत आहे. वैजापुरमध्ये एका महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर वैजापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास वैजापुरातील एका आश्रमात महिला कीर्तनकार हभप संगीताताई महाराज यांच्यावर मारेकऱ्यांनी थेट आश्रमात घुसून दगडाने वार केले. यामध्ये त्यांचा मृत्यू […]Read More
राज्याच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला. निकाल जाहीर होऊन जवळपास आता दीड महिना झाल्याने आता ११ वी च्या प्रवेशासाठी यादीची विद्यार्थी उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर आज दोन दिवसांआधीच जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे 11 वी प्रवेशाची पहिली यादी 30 जूनला जाहीर होणार होती, पण पहिली गुणवत्ता प्रवेश यादी शिक्षण संचालनालयाकडून […]Read More