mmcnews mmcnews

देश विदेश

‘देश अमेरिकेकडे गहाण’- राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

नवी दिल्ली, दि. ३ : लोकसभेच्या चालू असलेल्या अधिवेशनात आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सर्वात गंभीर आरोप केला आहे. अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार कराराच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरत अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात अत्यंत जहाल शब्दांत सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]Read More

देश विदेश

अमेरिकेचा भारतावरील टॅरिफ 25% वरून 18% टक्के

नवी दिल्ली, दि. ३ : भारत आणि अमेरिकेदरम्यान ज्या व्यापार कराराची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती, त्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केली. ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने भारतावरील रेसिप्रोकल टॅरिफ (परस्पर कर) 25% वरून 18% पर्यंत कमी केले आहे. या निर्णयामुळे भारतीय निर्यातदारांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. तथापि, या सवलतीसोबत अमेरिकेने एक महत्त्वाची अट […]Read More

देश विदेश

लोकसभेत गदारोळ, आठ खासदारांचे निलंबन

नवी दिल्ली, दि. ३ : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान आज लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान मोठा गोंधळ झाला. यावेळी काही खासदारांनी टेबलावर चढून सभापतींच्या व्यासपीठावर कागदपत्रे फेकली. यामुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाला होता. यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या खासदारांवर कडक कारवाई केली आहे. सभापतींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी आठ विरोधी खासदारांना […]Read More

पर्यटन

मलंगगडावर अडकली नव्याने सुरू केलेली फ्युनिकुलर ट्रॉली

कल्याण, दि. ३ : कल्याणनजिकच्या मलंगगडावर जाण्यासाठी काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आलेली फ्युनिकुलर ट्रॉली मलंगगडावर भाविकांना घेऊन जाताना मध्येच अडकली आहे. भाविक मध्येच अडकल्यामुळे खळबळ उडाली आहे. यात्रेच्या निमित्ताने आज गडावर मोठी गर्दी आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त भाविक घेऊन गेल्यामुळे फ्युनिकुलर वाटेतच अडकली असल्याचं सांगितलं जात आहे. घटनास्थळी भाविकांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

स्वच्छतेसाठी मुंबई मनपाचे कडक धोरण, होणार मोठी सशुल्क कारवाई

मुंबई, दि. 2 : मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाने व्यापक नियमावली लागू केली आहे. या नियमांनुसार सार्वजनिक स्थळी थुंकल्यास २५० रुपये, कचरा टाकल्यास ५०० रुपये, ओला व सुका कचरा वेगळा न केल्यास २०० रुपये तर विनापरवाना राडारोडा वाहतूक केल्यास थेट २५ हजार […]Read More

पर्यटन

ही आहे देशातील सर्वात मंद गतीने धावणारी ट्रेन, तरीही लोकप्रिय

मुंबई, दि. २ : भारताची सर्वात मंद गतीने धावणारी ट्रेन म्हणून ओळखली जाणारी निलगिरी माउंटन रेल्वे आजही प्रवाशांच्या मनात अपार लोकप्रियता मिळवत आहे. UNESCO जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेली ही रेल्वे केवळ प्रवासाचे साधन नसून, निसर्गसौंदर्याचा अनुभव देणारी एक अद्वितीय सफर आहे. ४६ किलोमीटरचा प्रवास ही ट्रेन जवळपास पाच तासांत पूर्ण करते. आधुनिक काळात वेगवान […]Read More

अर्थ

She Marts – महिला बचत गटांसाठी रिटेल आउटलेट्स

नवी दिल्ली, दि. 2 : स्वयंसहाय्यता बचत गटांमुळे देशभरातील महिलांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ मिळाले आहे. या उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी आता महिला बचत गटांसाठी She marts ही रिटेल आउटलेट्स सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे महिला कल्याण केवळ ‘कर्ज-आधारित उपजीविका’ पुरते मर्यादित राहणार नाही. महिलांना समान भागीदार आणि त्यांच्या व्यवसायाच्या मालक बनवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. […]Read More

देश विदेश

पाक विश्वचषकात खेळणार पण भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार

मुंबई, दि. २ : आगामी टी२० विश्वचषक २०२६ मध्ये पाकिस्तान सरकारने आपल्या क्रिकेट संघाला विश्वचषकात खेळण्याची परवानगी दिली असली, तरी पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्धच्या गट साखळीतील सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.बांगलादेशने सुरक्षेचे कारण देत भारतात खेळण्यास नकार दिल्यानंतर आयसीसीने बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर केले, ज्याच्या निषेधार्थ पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. यामुळे पाकिस्तानला मिळणारा आयसीसीच्या […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबईत सुरू होतय एएमआय बॅक्टीरिया उत्पादन केंद्र , जाणून घ्या

मुंबई, दि. २ : मुंबईतील पहिले एनारोबिक मायक्रोबियल इनोकुलम म्हणजेच एएमआय बैक्टीरिया उत्पादन केंद्र आणि प्रयोगशाळा लोअर परेल रेल्वे कार्यशाळेत उभारली जात आहे. हे केंद्र एक्सप्रेस आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील बायो-शौचालयांच्या कार्यक्षमतेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि माणसाच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीमुळे येणाऱ्या दुर्गंधीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विकसित केलं जातं आहे. या प्रस्तावित केंद्रात दररोज सुमारे 3 लाख लीटर […]Read More

महानगर

मुंबईतून 36 तासांत 12 अल्पवयीन मुलंमुली बेपत्ता

मुंबई, दि. २ : मुंबईत गेल्या 36 तासांमध्ये एकट्या मुंबई शहरातून 12 अल्पवयीन मुलं आ बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेपत्ता झालेल्या या 12 मुलांमध्ये 8 मुलींचा समावेश असून, ही मुलं मुंबईतील 7 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गायब झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबई पोलीस यंत्रणासुद्धा सध्या शहरातील या प्रकाराकडे अतिशय गांभीर्यानं पाहत […]Read More