mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

लष्कर ए तैयबा च्या टॉप कमांडरची गोळ्या झाडून हत्या

इस्लामाबाद,दि. १८ : पाकिस्तानमध्ये दहशतवादी सैफुल्लाह खालीदची गोळ्या मारून हत्या झाली आहे. सैफुल्लाह हा लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा टॉपचा कमांडर होता. त्याला अज्ञातांनी गोळ्या घातल्याचे सांगितले जात आहे.पाकिस्तानातील सिंध प्रांतातील बदीन जिल्ह्याच्या माटली तालुक्यात याला गोळ्या घालण्यात आल्या आहेत. सैफुल्लाह हा लष्कर ए तैयबा या संघटनेचे नेपाळमधील युनिट सांभाळायचा. लष्कर ए तैयबा या […]Read More

महानगर

बेशिस्त वाहनचालकांवर पुणे पोलिसांची AI द्वारे नजर

पुणे, दि. १८ : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज) रस्त्यावर ‘AI’वर आधारित वाहतुकीचे नियमभंग शोधणारी प्रणाली दोन ठिकाणी बसवण्यात आली असून, तिच्या आधारे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना दणका देण्यात येणार आहे. डबल पार्किंग करणारे, पदपथावर वाहने उभी करून गप्पा मारणारे, ‘ट्रिपल सीट’, नो-एंट्रीतून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. AI आधारित प्रणालीमुळे अशा चालकांवरही […]Read More

Uncategorized

स्वच्छ मुंबईसाठी, एक छोटा बदल पुरेसा आहे!

मुंबई दि १८– मुंबई मध्ये थांबायला कोणालाच वेळ नाही, प्रत्येक जण धावतोय, पुढे जातोय. पण या धावपळीत आपण रोज तयार करत असलेल्या कचऱ्याकडे किती जण लक्ष देतो? आपलं शहर दररोज हजारो टन कचरा निर्माण करतं, आणि त्याचे नीट व्यवस्थापन नाही केले तर तो आपल्या आरोग्यावर आणि परिसरावर परिणाम करतो. पण हे इतकं अवघडही नाही. थोडा […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याविरोधात कोल्हापूरात सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन

कोल्हापूर दि १८– अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर सांगली, कोल्हापुरात नक्षलवादी तयार होतील, असं वक्तव्य खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापुरात चक्काजाम आंदोलनात केलं. प्रस्तावित अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याविरोधात आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी चक्काजाम आंदोलनात हे वक्तव्य केलं. धैर्यशील माने म्हणाले की, अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर कोल्हापूर, सांगली […]Read More

विज्ञान

ISRO ला 101 व्या उपग्रहाच्या प्रक्षेपणात अपयश

श्रीहरीकोटा, दि. १८ : ISRO कडून आज सकाळी ५.५९ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV-C61) द्वारे १०१ वा उपग्रह EOS-09 (पृथ्वी वेधशाळा उपग्रह) चे प्रक्षेपण करण्यात आले मात्र परंतु हे प्रक्षेपण यशस्वी झाले नाही. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात यशस्वी झाल्यानंतर, तिसऱ्या टप्प्यात EOS-09 मध्ये एक त्रुटी आढळून आली. इस्रो […]Read More

आरोग्य

CBSC शाळांच्या कॅम्पसमध्ये स्थापन होणार ‘शुगर बोर्ड’

नवी दिल्ली, दि. १८ : CBSE ने आपल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना त्यांच्या कॅम्पसमध्ये ‘शुगर बोर्ड’ (Sugar Boards) स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये साखरेच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या आरोग्याच्या धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. CBSE ने शाळांना या उपक्रमांचे छायाचित्रांसह एक संक्षिप्त अहवाल १५ जुलै २०२५ पर्यंत PDF स्वरूपात सादर करण्यास सांगितले आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

सकल मातंग समाजाचे आक्रोश महाआंदोलन!

मुंबई प्रतिनिधी, दि. १८ : अनुसूचित जातींमधील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळावा यासाठी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “आक्रोश महाआंदोलन” आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन २० मे २०२५ रोजी, मुंबईच्या आझाद मैदानात दुपारी १ ला होणार आहे.या आंदोलनाचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून ते येत्या जून २०२५ […]Read More

महानगर

भीमनगरच्या रहिवाशांना घरे देऊन न्याय द्यावा 

पुणे:   झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पौड रस्ता येथील भीमनगरच्या रहिवाशांची सहमती नसताना देखील घरे खाली करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दिलेली नोटीस मागे घ्यावी. भीमनगरवासीयांना आहे त्याच ठिकाणी घरे देऊन योग्य न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जेष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केली आहे. भीमनगर वाचविण्यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केलेल्या आवाहनानुसार मेधा पाटकर यांनी भीमनगरला […]Read More

महानगर

बोरवली येथे तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई प्रतिनिधी, दि. १७ : शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आज संपूर्ण मुंबईत ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर शिवसेनेच्या वतीने देशभक्ती, एकता आणि अभिमानाचा जल्लोष करत भव्य तिरंगा यात्रा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी ९ वाजता कोरा केंद्र, बोरीवली पश्चिम येथून सुरू झालेल्या या रॅलीत हजारोंच्या संख्येने नागरिक आणि शिवसैनिक […]Read More

कोकण

स्वतंत्र कोकण राज्याची 31 मे रोजी पत्रकार परिषद

मुंबई प्रतिनिधीः स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वतंत्र कोकण राज्याची मागणी विषय असणारी पत्रकार परिषद शनिवार दिनांक ३१ मे रोजी दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत मुंबई मराठी पत्रकार संघ (नोंदणीकृत) पहिला मजला पत्रकार भवन आझाद मैदान बाळशास्त्री जांभेकर चौक महापालिका मार्ग मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या पहिल्याच […]Read More