मुंबई, दि. १९ : आज मुंबईत राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्ज देताना बँकांनी सिबिलची मागणी करू नये, असे आदेश दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ICICI, HDFC आणि Axis या खासगी क्षेत्रातील प्रमुख बँकांना चांगलेच खडेबोल सुनावले. ते म्हणाले, बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देताना त्यांच्याकडे सिबिलची मागणी करू […]Read More
मुंबई, दि. १९ : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा परिणाम सुकामेव्याच्या बाजारावर दिसून येत आहे. सध्या काजू, अंजीर, बदाम, मनुका, किसमिस आणि अक्रोड यांसारख्या सुकामेव्याचे दर १०० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत.या वाढीमागे मुख्यतः आयातीवरील अडथळे आणि वाहतूक खर्चातील वाढ हे कारण आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या सीमेवर कडक पावले उचलली आहेत. परिणामी व्यापारमार्ग बंद […]Read More
छ संभाजीनगर दि १९– राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखालील स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाची बैठक आज सोमवार दिनांक १९ मे २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, संभाजीनगर येथे पार पडली. या बैठकीस छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड-वाघाळा, जालना, हिंगोली या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी, महानगरपालिका, […]Read More
मुंबई, दि. १९ – संविधान (१२९वे सुधारणा) विधेयक, २०२४ आणि केंद्रशासित प्रदेश कायदा (सुधारना) विधेयक, २०२४ या अनुषंगाने आयोजित संयुक्त समितीच्या अभ्यास दौऱ्यानिमित्त आज मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्राशी संबंधित विषयांवर व्यापक व मुद्देसूद चर्चा झाली. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, […]Read More
मुंबई प्रतिनिधीकोविड-१९ हा आजार आता एक प्रस्थापित (Endemic) आणि निरंतर चालणारी आरोग्य समस्या म्हणून गणली जाते. या आजाराचा विषाणू वस्ती पातळीवर स्थिरावला असल्याने, कोविड आजाराचे रुग्ण अत्यंत कमी प्रमाणात अधून मधुन आढळून येतात. मागील काही दिवसांत सिंगापूर, हाँगकाँग, पूर्व आशिया आणि इतर देशांमध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळले आहे. कोविड-१९ चा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी […]Read More
सिंधुदुर्ग नगरी : मुंबई – गोवा महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव द्यावं अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे.दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या 179 व्या पुण्यतिथी निमित्त ओरस येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारकात आयोजित अभिवादन सभेत एस.एम.देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री नितेश राणे होते. एस.एम. म्हणाले, मुंबई – गोवा […]Read More
मुंबई दि १९ :– वाहनांच्या पार्किंगची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीच्या कोंडी सारखी समस्या निर्माण होत आहे. भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी “एकात्मिक पार्किंग धोरण “आणण्याचा विचार परिवहन खाते करत असून त्याची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये(MMRDA) करण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी […]Read More
मुंबई दि.१९ :- मोटार परिवहन विभागाच्या ऑन लाईन बदल्यामुळे पारदर्शकते बरोबरच जास्तीत जास्त अधिकारी – कर्मचाऱ्यांनी मागणी केलेला पसंतीक्रम मिळत असल्याने बहुतेक अधिकाऱ्यांचे समाधान होते. त्यामुळे भविष्यात परिवहन विभागाच्या ऑन लाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणावी, तसेच महिला अधिकारी वर्गाच्या अडचणी प्राधान्याने विचारात घ्याव्यात असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. परिवहन मंत्री सरनाईक […]Read More
मुंबई,दि. १९ : सिंगापूर, मलेशिया या देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत होतो. आता मुंबईतही कोरोनाने प्रवेश केला आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात या रुग्णांना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या रुग्णांना वेगवेगळ्या आजारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आला आहे. केईएम हॉस्पिटलमध्ये काल दोन […]Read More
नवी दिल्ली, दि. १९ : भारत सरकारच्या “खेलो इंडिया” उपक्रमात नवी स्पर्धा समाविष्ट करण्यात आल्या असून देशभरातील युवा खेळाडूंना अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा उद्देश आहे. या नव्या स्पर्धांमुळे भारतीय क्रीडा क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. भारत सरकारने युवा खेळाडूंना अधिक व्यासपीठ मिळावे, पारंपरिक आणि आधुनिक खेळांना संधी मिळावी यासाठी पुढील स्पर्धांचा समावेश […]Read More