mmcnews mmcnews

महानगर

काळाचौकी दत्ताराम लाड मार्गावर स्पीड ब्रेकर बसवा

मुंबई, दि 28 काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गांवर वेगवान वाहनांच्या गतीला आळा बसविण्यासाठी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.अटल सेतू झाल्याने या मार्गांवर मोठ्या डंपर, ट्रक यांची वर्दळ जास्त झाली आहे. पूर्वी या मार्गांवर स्पीड ब्रेकर होते. मात्र नवीन रस्ता करताना ते उखडून टाकण्यात आले. नवीन रस्ता होऊन आज कित्येक महिने झाले मात्र […]Read More

राजकीय

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार ‘द रेस’ अनधिकृत डान्स

नवी मुंबई दि २८ :– नवी मुंबईतील वाशी परिसरातील ‘द रेस’ नावाच्या अनधिकृत डान्स बारवर काल रात्री पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली.ही कारवाई राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या स्पष्ट निर्देशानुसार आणि तत्परतेने पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यात आली. सदर बार परवानगीशिवाय रात्री १२ नंतर सुरू होता. पोलिसांनी रेड केली असता, म्युझिक सिस्टीमच्या कर्णकर्कश्श आवाजात […]Read More

देश विदेश

भात, तूर, कापूस यांसह 14 पिकांच्या MSP त वाढ

नवी दिल्ली, दि. २८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने 2025-26 च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या 14 वाणांसाठी किमान आधारभूत किमती (एमएसपी) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भाताच्या नवीन किमान आधारभूत किमतीचा दर २,३६९ रुपये निश्चित करण्यात आला […]Read More

बिझनेस

ही कंपनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून करणार व्यावसायिक उड्डाणे

नवी मुंबई, दि. २८ : भारतीय विमानवाहतूक क्षेत्रात नवा टप्पा गाठत Indigo आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (NMIA) व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही ऐतिहासिक भागीदारी भारताला २०३० पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची विमानवाहतूक अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावेल. इंडिगोची भव्य उड्डाण योजनाइंडिगो हे NMIA वरून व्यावसायिक उड्डाणे […]Read More

राजकीय

मच्छीमारांसाठी राज्य सहकारी बँकेची १००० कोटींची तरतूद

मुंबई दि २८– नुकतेच शेतकरी म्हणून गणना झालेल्या राज्यातील मच्छीमारांसाठी आणखी एक आनंदाची बातमी असून राज्य सहकारी बँकेने मच्छीमारांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.राज्य सहकारी बँकेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.या बैठकीला मत्स्यविकास मंत्री नितेश राणे , पदुमचे सचिव डॉ रामास्वामी एन,मत्स्यआयुक्त किशोर तावडे,राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनासकर,व्यवस्थापकीय संचालक […]Read More

देश विदेश

रेल्वेच्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली दि २८ —पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत आणि जलद गतीने व्हावी, यासाठी भारतीय रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली. प्रकल्प पुढील प्रमाणे: या प्रकल्पांचा एकूण खर्च 3,399 कोटी रुपये (अंदाजे) इतका असून, 2029-30 पर्यंत ते पूर्ण होतील. हे प्रकल्प मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटीसाठीच्या पीएम-गति शक्ती […]Read More

सांस्कृतिक

अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार, आध्यात्मिक पर्यटनविकासासाठी १४८ कोटी

मुंबई, दि. २८ :- उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने 147 कोटी 81 लाख रुपये खर्चाच्या ‘अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार व विकास आराखड्या’स सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासंबंधीचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला आहे. अष्टविनायक विकास आराखड्यामुळे अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच परिसराचा विकास होणार असून देवस्थानांना भेट देणाऱ्या भाविकांना, […]Read More

ट्रेण्डिंग

या तारखेपर्यंत e-KYC न केल्यास रेशन कार्ड होणार बंद

मुंबई, दि. २८ : रेशन वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी सरकारने एक नवीन नियम लागू केला आहे. याअंतर्गत E-KYC वेळेवर झाले नाही तर शिधापत्रिकेवरून नाव काढून टाकले जाऊ शकते आणि मोफत किंवा स्वस्त रेशन उपलब्ध होणे बंद होऊ शकते. E-KYC मुळे रेशनचे फायदे फक्त योग्य आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचतील. सरकारने यापूर्वी ३१ मार्च २०२५ ही […]Read More

राजकीय

डिनो मोरियासह आदित्य ठाकरेंची चौकशी करा

मुंबई, दि 28 मिठी नदी सफाई आणि नालेसफाईच्या कामात तब्बल ६५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषदेत केला. विशेष म्हणजे, या प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया यांची चौकशी सुरू असून, डिनो मोरिया आणि युवानेते आदित्य ठाकरे यांची घनिष्ट मैत्री असल्याने आदित्य ठाकरेंचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी […]Read More

राजकीय

चौंडी येथील विकास आराखड्यासाठी 681 कोटींच्या खर्चास मान्यता

मुंबई, दि. २८ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मगाव असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील मौजे चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचे जतन व संवर्धन विकासासासाठी 681 कोटी 32 लाख रुपयांच्या विकास आराखड्यात प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासंदर्भातील शासननिर्णय नियोजन विभागाने आज जारी केला आहे. सदर आराखड्याच्या संनियंत्रण आणि अंमलबजावणीची जबाबदारी […]Read More