mmcnews mmcnews

महानगर

वांद्रे येथील उच्च न्यायालयासाठी भूखंडाचे नि:शुल्क हस्तांतरण

मुंबई दि २४– वांद्रे (पूर्व) येथील उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंड सार्वजनिक बांधकाम विभागास नि:शुल्क हस्तांतरित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीतील 90 एकर जागेपैकी 30.16 एकर भूखंड उच्च न्यायालयास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भूखंडावर उच्च न्यायालयाकरिता नवीन संकुल उभारण्यात येणार […]Read More

राजकीय

महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती, 20 हजार 787 कोटींची तरतूद

मुंबई दि २४– राज्याच्या पूर्वेकडील पवनार (जि.वर्धा) येथून ते पश्चिमेकडील पत्रादेवी (जि.सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र-गोवा सीमेला जोडणाऱ्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग (शिघ्रसंचार द्रूतगती मार्ग) प्रकल्पाला गती देण्यासाठी 20 हजार 787 कोटी रुपयांच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणारा हा द्रूतगती मार्ग 802.592 किलोमीटर लांबीचा असणार […]Read More

राजकीय

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा जनता दरबाराचा नवा आदर्श

मुंबई दि २४ :– विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकाच छताखाली उपलब्ध राहून, नागरिकांच्या समस्यांचे निरसन करण्याच्या हेतूने थेट प्रशासकीय मदत मिळवून देणारा जनता दरबार आयोजित करून कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या या जनता दरबारात महाराष्ट्रातील सुमारे 500 नागरिकांनी आपले प्रश्न मांडले. राज्य सरकारकडून विविध ठिकाणी […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

मंगळवार, दि. २४ जून, २०२५• महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग – पवनार (जि.वर्धा) ते पत्रादेवी ( जि. सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र गोवा सरहद्द शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास मान्यता. राज्यातील साडेतीन शक्तिपीठ , दोन ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर अंबेजोगाई सहित १८ तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग. प्रकल्प महामंडळामार्फत राबवणार, प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी २० हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)• […]Read More

महाराष्ट्र

महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर.

पुणे, प्रतिनिधी – द महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची ( MASMA )वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेला संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले १०० हून अधिक उद्योजक उपस्थित होते. तत्कालीन अध्यक्ष शशिकांत वाकडे यांनी मागील वर्षाच्या कार्यकाळातील विविध उपक्रमांचा आढावा सभेसमोर मांडला. कोषाध्यक्ष समीर गांधी यांनी मागील वर्षाचा आर्थिक अहवाल सादर केला, जो […]Read More

राजकीय

वारीबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर अबू आझमींनी मागितली माफी

मुंबई, दि. २४ : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पंढरपूरच्या वारीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर माफी मागितली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, त्यांच्या विधानाचा हेतू कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता. जर त्यांच्या शब्दांमुळे वारकरी समाजाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यांनी “मी माझे शब्द पूर्णपणे मागे घेतो आणि सर्वांची माफी मागतो” असं जाहीरपणे म्हटलं. त्यांनी […]Read More

महाराष्ट्र

राज्यात पाच महिन्यांत 30 हजार नागरिक बेपत्ता

मुंबई, दि. २४ : राज्यातील 30 हजारांहून अधिक नागरिक गेल्या ५ महीन्यांत बेपत्ता असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. बेपत्ता नागरिकांमध्ये 18 पेक्षा जास्त वयाच्या 12,467 पुरुष आणि 17646 स्त्रियांचा समावेश असून एकूण आकडा 30 हजार 113 असा आहे. 18 वर्षे वयाखालील व्यक्ती बेपत्ता झाल्यास त्याची नोंद किडनॅपिंग अंतर्गत केली जाते, हे येथे उल्लेखनीय आहे. […]Read More

राजकीय

शक्तिपीठ महामार्ग भूसंपादनाला मान्यता

मुंबई, दि. २४ : राज्य सरकारने आज शक्तिपीठ महामार्ग भूसंपादनासाठी २० हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता दिली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. सांगली- कोल्हापूरमधील शेतकऱ्यांच्या या महामार्गाला मोठा विरोध होत आहे. शासन निर्णयमहाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग – पवनार (जि.वर्धा) ते पत्रादेवी ( जि. सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र गोवा सरहद्द शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास मान्यता. […]Read More

ट्रेण्डिंग

१ जुलैपासून रेल्वे तिकिट दरात वाढ

मुंबई, दि. २४ : रेल्वेने दीर्घ कालावधीनंतर तिकिटांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन दर 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहेत. त्याचबरोबर तत्काळ तिकिट बुकिंगसाठी नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. सर्वसामान्य प्रवाशांना फायदा व्हावा यासाठी हे निर्णय घेतले असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. उपनगरीय तिकिटांसाठी आणि द्वितीय श्रेणीच्या ५०० किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी भाड्यात […]Read More

राजकीय

राहुल डंबाळे यांना मौलाना आझाद समाज भूषण पुरस्कार प्रदान

पुणे, दि २४ : देशभरातील अल्पसंख्यांक विशेषता मुस्लिमांच्या प्रश्नावर अत्यंत प्रभावी काम करत असल्याबद्दल नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी चे अध्यक्ष राहुल डंबाळे यांचा पुणे शहर जिल्हा मुस्लिम समाज च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रशीद शेख व माजी नगरसेवक आयुब शेख यांच्या हस्ते […]Read More