mmcnews mmcnews

पश्चिम महाराष्ट्र

संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं मेंढ्यांच रिंगण पडलं पार……

पुणे दि २७– श्रीसंत तुकोबाराय यांच्या पालखीला मेंढ्यांचं अनोखं रिंगण घातलं जातं. दरवर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काटेवाडीत आगमनझाल्यावर पालखीला मेंढ्यांचं रिंगण घातलं जातं.आज देखील काटेवाडी येथे हा रिंगण सोहळा पार पडला.यामध्ये माने केसकर महानवर, काळे, मासाळ यांच्या मेंढ्यांना हा मान असतो. काही वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं बारामतीत आगमन झालं होतं. त्यावेळेसकाटेवाडी आणि आसपासच्या […]Read More

सांस्कृतिक

चांदोबा लिंब या ठिकाणी माऊलीचे पहिले उभे रिंगण संपन्न.

सातारा दि २७– संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी लोणंद येथून तरडगाव मुक्कामासाठी निघाली असून दरवर्षी प्रमाणे चांदोबाचा लिंब या ठिकाणी माऊलीच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडले. चिकोडी येथील अंकलीकर सरकार यांचे दोन अश्व दरवर्षी पालखीच्या सोहळ्यासाठी येत असतात . चांदोबाचा लिंब या ठिकाणी माऊलींची पालखी थांबते . मृदुंग आणि टाळांच्या नादामध्ये माऊली माऊलीचा जयघोष […]Read More

शिक्षण

*बंद पडलेल्या मराठी शाळेत झाली कापडाची शोरुम!

मुंबई प्रतिनिधी: मध्य मुंबईतील परळ येथील नायगावसारख्या मराठी बहुल भागातील नामांकित सरस्वती प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद पडली असून महापालिकेच्या जागेवरील या शाळेचा व्यावसायिक वापर होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. शाळेच्या तळमजल्यावर गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर साड्यांची दुकाने सुरू झाली असून शाळेच्या वरच्या मजल्यावर मुख्याध्यापक वास्तव्य करीत आहेत. शाळेसाठी दिलेल्या सरकारी जमिनीचा […]Read More

सांस्कृतिक

आषाढीसाठी विठोबाचे 24 तास दर्शन सुरू…

पंढरपूर दि २७:- आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी विठोबाचे आज पासून 24 तास दर्शन सुरू झाले आहे. परंपरेप्रमाणे आषाढ महिना सुरू झाल्यावर आज विठोबाचा पलंग काढण्यात आला. यावेळी विठोबाचे नवरात्र बसते असे मानले जाते यानंतर विठोबाचे सर्व राजोपचार बंद करून देव आपल्या लाडक्या भक्तांना 24 तास दर्शन देण्यासाठी उभा असणार आहे. आषाढी नंतरच्या 16 जुलै रोजी होणाऱ्या […]Read More

राजकीय

भाषेच्या मुद्द्यावर विरोधक खोटे नरेटीव्ह सेट करतेय

मुंबई, दि. २७ — महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची असून इतर भाषांना ऑप्शन्स देण्यात यावेत, ही महायुती सरकारची स्पष्ट भूमिका आहे. सरकारच्यावतीने वारंवार ही भूमिका मांडूनही विरोधक मात्र या विषयावर खोटे नरेटीव्ह सेट करत आहेत अशी टिका भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली. अखिल भारतीय कामगार सेनेचे माजी सरचिटणीस आणि माथाडी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. […]Read More

महानगर

पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई दि २६ :– पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त, बुधवार दिनांक २६ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरात भव्य नाट्य-संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सरफोजीराजे भोसले भरतनाट्यम ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर यांच्यावतीने सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, अहिल्याबाईंच्या जीवनकार्यावर आधारित नाट्य, संगीत आणि नृत्य यांचा संगम साकारण्यात आला. […]Read More

राजकीय

सलीम सारंग यांच्या मागणीची अजित पवारांकडून दखल

मुंबई, दि २७राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या मुस्लिम विरोधी विधानाचा तीव्र निषेध करत पक्षाकडे कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या या ठाम भूमिकेची अखेर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दखल घेतली असून, त्यांनी संग्राम जगताप यांच्याकडून स्पष्टीकरण मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित […]Read More

राजकीय

शेतमालाच्या बाजारमूल्य निश्च‍ितीमुळे शेतकऱ्यांना मिळणार अधिक फायदा

मुंबई, दि. २७ :– शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारमूल्य मिळावे यासाठी, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, स्मार्टअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे येथे कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी ‘हेजिंग डेस्क’ सुरू केला आहे. टप्प्या-टप्प्याने इतर पिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शेतकरी त्यांच्या उत्पादनांच्या भविष्यातील किंमतीतील चढ-उतारामुळे […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुणेकरांनी अनुभवली मनोरंजनाची मेजवानी

पुणे, दि २७ : पारंपारिक लावण्या, हिंदी मराठी गाण्यांच्या मैफली, नामवंत कलाकारांसोबत गप्पा, समकालीन सामाजिक घटितांची नोंद घेणारी विविध चर्चासत्रे, आदि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुण्यनगरीचे सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा ५७ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने पुणेकरांनी मनोरंजनाची मेजवानी अनुभवली. बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या वतीने आयोजित या महोत्सवात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते […]Read More

खान्देश

हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली 143 क्युमेक्सने विसर्ग सुरू

जळगाव दि २७– जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. आज धरणात एकूण 64.95 टक्के पाणीसाठा असून पाणीपातळी 211.380 मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. धरणाच्या पाण्यात आवक वाढल्याने धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या 143 क्युमेक्स (सुमारे 5050 क्युसेक्स) दराने पाणी खाली […]Read More