न्यूयॉर्क, दि. २० : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 17 ऑगस्ट 2025 रोजी ‘इंडिया डे’ परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनने (Chhatrapati Foundation) छत्रपती शिवाजी महाराजांचा कीर्तीरथ सादर केला आणि भव्य मिरवणूक काढली. अमेरिकेमध्ये वास्तव्यास असलेले भारतीय मिरवणुकीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. लेझीम आणि ढोलच्या गजराने सारेजण भारावून गेले होते. परेड ग्रँड मार्शलचा […]Read More
बंगळुरु, दि. 20 : कर्नाटक राज्यात अपहरणांच्या घटनांमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये 13 वर्षांच्या मुलाचे अपहरण झाले होते आणि नंतर त्याची हत्या झाली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले होते. गेल्या 5 वर्षात राज्यात 13 हजार 552 लोकांचे अपहरण झाले असल्याचे समोर आले आहे. गंभीर बाब म्हणजे यात 9789 महिला […]Read More
मुंबई, दि. २० : काल मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असताना मोनोरेल बंद पडल्याने प्रवाशांना थरारनाट्य अनुभवावे लागले. सायंकाळी प्रवाशांनी खचाखच भरलेली मोनोरेल चेंबुर आणि भक्तीपार्क येथे अचानक बंद पडल्याने सव्वा तास जीव टांगणीला लागलेल्या दोनशेहून अधिक प्रवाशांची अग्निशमन दलाचे कशीबशी सुटका केली. मोनोरेलमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी चढल्याने तिच्यात बिघाड झाल्याचे स्पष्टीकरण एमएमआरडीएने दिले. अशा घटनांची […]Read More
दिल्ली, दि २०आज नवी दिल्ली येथे संसद भवनात झालेल्या सल्लागार समिती सांस्कृतिक व्यवहार व पर्यटन मंत्रालयाच्या बैठकीत ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील सहभागी झाले. यावेळी संस्कृती विभागाच्या युगे युगीन भारत संग्रहालय व ज्ञान भारतम मिशन यांचा आढावा घेण्यात आला. तसेच पर्यटन विभागातील होमस्टे, कौशल्य विकास, Ease of Doing Business तसेच राज्यांच्या सहकार्याने ५० प्रमुख […]Read More
छ. संभाजी नगर दि २०– जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 95 टक्क्यावर पहोचला असून उद्या जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात विसर्ग केला जाणार आहे. धरणाचे एकूण 18 दरवाजे प्रत्येकी अर्धा फुटाने उघडण्यात येणार असून एकूण 9 हजार 432 क्युसेकने विसर्ग केला जाणार आहे अशी माहिती साह्यक अभियंता मंगेश शेलार यांनी दिली. उद्या सकाळी 7 वाजता […]Read More
मुंबई, दि. २०– कानात ईअर फोन लावून पाण्यातून चाललेल्या एका युवकाला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्देवी घटना पन्नालाल कंपाऊंड, एलबीएस मार्ग, भांडुप पश्चिम येथे घडली. पाण्यात विजेचा प्रवाह आल्याने या तरुणाला त्याचा शॉक लागला. खा. संजय दिना पाटील यांनी संबंधीत जबाबदार अधिका-यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्हिलेज रोड, भांडुप पश्चिम येथे राहणारा दिपक […]Read More
पुणे, दि २०प्रसिद्ध फिल्म आणि मीडिया प्रॉडक्शन हाऊस टायगरमंकने पुण्याच्या ऐतिहासिक गणेश मंदिरांवरील पाच भागांची माहितीपट मालिका सादर केली आहे. “ऐतिहासिक गणपती मंदिरे” या शीर्षकाखाली साकारलेली ही मालिका पुण्यातील विस्मृतीत गेलेल्या पाच गणेश मंदिरांचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा उलगडते. या मालिकेत त्रिशुंड गणपती, खिंडीतला गणपती, गुपचुप गणपती, मोदी गणपती आणि मातीचा गणपती या मंदिरावरील माहितीपट […]Read More
गडचिरोली दि २०:– गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील तब्बल 112 गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. अशा बिकट परिस्थितीत गडचिरोली पोलिसांनी मानवतेचा हात पुढे करत अंगणवाडी सेविकेचे जीव वाचवले आहेत. भामरागडमधील आरेवाडा येथील गंभीर आजारी अंगणवाडी सेविकेला पोलिसांनी थेट हेलिकॉप्टरद्वारे गडचिरोलीत स्थलांतरित केले. या एअर रेस्क्यू ऑपरेशन राबवून जिल्हा सामान्य रुग्णालय दाखल करून महिलेचा जीव धोक्यातून […]Read More
नवी दिल्ली,दि. 20 : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर त्यांच्या निवासस्थानी आयोजित साप्ताहिक जनसुनावणी दरम्यान एक धक्कादायक हल्ला झाला. एका तरुणाने तक्रार देण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ जाऊन अचानक कानशिलात लगावली आणि त्यांचे केस ओढण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत मुख्यमंत्री गुप्ता यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली, आणि त्यांना तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. सुदैवाने, डॉक्टरांनी त्यांच्या […]Read More
पुणे, दि २०: महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी या देशाच्या महान नेत्यांनी देशाची एकता, अखंडता व एकात्मतेसाठी बलिदान दिले, अशा बलिदान देणाऱ्या नेत्यांच्या प्रति निष्ठा बाळगणे हे खरे भारतीयत्व आहे असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले आहे.स्वर्गीय राजीव गांधी यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त आज कात्रज येथील, राजीव गांधी […]Read More