mmcnews mmcnews

पश्चिम महाराष्ट्र

पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या स्मृतिदिनी शैक्षणिक सुविधा उपक्रमाचे भूमिपूजन

पुणे, दि १५: पद्मविभूषण मा. डॉ. मोहन धारिया यांच्या स्मृतिदिनानिमित्त समाजोपयोगी कार्याची परंपरा पुढे चालवत एक अर्थपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. शैक्षणिक सुविधा उपक्रमांतर्गत टॉयलेट ब्लॉक (संपूर्ण सुविधा असलेला) या बांधकामाच्या भूमिपूजनाचा समारंभ ‘केईएस सी. के. गोयल आणि टिकराम जगन्नाथ कनिष्ठ महाविद्यालय, खडकी, पुणे’ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमाची अंमलबजावणी ‘देसाई ब्रदर्स लिमिटेड (डीबीएल), […]Read More

महानगर

BIS च्यावतीने मुंबईत ‘मानक महोत्सव’

मुंबई, दि. १४ : भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय राष्ट्रीय मानक संस्था, भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ने मुंबईतील अंधेरी उपनगरामध्‍ये भारत रत्नम – मेगा सीएफसी, सीप्झ येथे “एक सामायिक दृष्टी एका चांगल्या जगासाठी – शाश्वत विकास उद्दिष्टे 17 वर विशेष लक्ष : उद्दिष्टांसाठी भागीदारी” ही संकल्पना मध्‍यवर्ती ठेवून जागतिक […]Read More

राजकीय

जिप, पंसमध्ये स्वीकृत सदस्य वाढवा, बावनकुळे यांच्या मागणीला यश….

​मुंबई, दि.१५ : जिल्हा परिषदेमध्ये पाच व पंचायत समितीमध्ये दोन सदस्य नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्य म्हणून नेमण्यासाठी ‘महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात’ सुधारणा करावी, अशी मागणी पत्राद्वारे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामविकास विभागाला त्यावर कारवाईसाठी सूचित केले आहे. बावनकुळे पत्रात म्हणतात, ग्रामीण स्तरावर सक्रिय […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड्समध्ये ५० विशिष्ट व्यक्तिमत्वांचा गौरव

पुणे, दि १५: लायन्स इंटरनॅशनल प्रांत ३२३४ D2 तर्फे आयोजित “लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड्स सोहळा २०२५” हा भव्य कार्यक्रम आज पुण्यातील प्रतिष्ठित हॉटेल शेराटन येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ५० विशिष्ट व्यक्तिमत्वांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री संगीता बिजलानी होत्या. त्यांनी मंचावर उपस्थित […]Read More

राजकीय

वाळू घाटांचे लिलाव पंधरा दिवसांत!

मुंबई, दि. १४: पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर वाळूची आवश्यकता भासणार असून, त्यामुळे वाळू घाटांचे लिलाव वेळेत करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या कामात दिरंगाई करण्यावर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. वाळू धोरण आणि वाळू गटाबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. अपर […]Read More

ट्रेण्डिंग

अस्वच्छ शौचालये दाखवा आणि जिंका हजार रुपये

मुंबई, दि. १४ : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) ‘स्वच्छता अभियाना’अंतर्गत एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. या प्रवासात टोल प्लाझावर अस्वच्छ शौचालय आढळले, तर त्याची तक्रार करा आणि लगेच तुमच्या FASTag खात्यावर 1,000 रुपये मिळवा. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी टोल प्लाझावर असलेल्या अस्वच्छ शौचालयांची तक्रार केल्यास, त्यांना बक्षीस म्हणून 1,000 रुपये FASTag रिचार्ज मिळणार आहे. […]Read More

करिअर

उच्च न्यायालयात होणार २ हजार २२८ पदांची भरती

मुंबई, दि. १४ : मुंबई उच्च न्यायालय, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाकरिता नव्याने २ हजार २२८ पदांची निर्मिती करण्यास करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. न्यायालयीन कामकाज गतीने होण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्याचबरोबर न्यायालयीन कामकाजामध्ये माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दीमत्तेचा जास्तीत जास्त वापर करुन कामकाज गतीमान होण्याच्या दृष्टीने २ हजार […]Read More

राजकीय

उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन

मुंबई, दि. १४ : ठाकरे बंधूमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दिसत असलेल्या सौहार्दाच्या संबंधांमुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते उत्साहात आहे. लवकरच येऊ घातलेल्या मुंबई मनपाच्या निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूमधील संबंध अधिकाधीक सुधारत असल्याचे चित्र विविध उपक्रमांद्वारे ठसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी आज निवडणूक आयोगाकडे जाऊन आपले निवेदन दिलं आहे. त्यानिमित्ताने आज पुन्हा […]Read More

महानगर

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार…

पालघर दि १४ : वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिर आज उत्साहात संपन्न झाले. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे निवृत्त उपकुलसचिव तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. दिनेश कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी […]Read More

ट्रेण्डिंग

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास मिळणार 6 लाखांची मदत

मुंबई, दि. १४ : राज्यात अनेक रस्त्यावरील खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे आजवर हजारो नागरीकांचा मृत्यू होते. मात्र या समस्येवर सर्वांगिण उपाययोजना करण्यात येत नाही. या रस्त्यावरील खड्ड्यांवरुन हायकोर्टानं प्रशासनाला खडेबोल सुनावले आहेत. खड्डे आणि उघड्या मॅनहोलमध्ये पडून एखाद्याचा जीव गेल्यास आता मृताच्या वारसांना 6 लाखांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे..तसंच जखमींना दुखापतीच्या स्वरुपानुसार […]Read More