Month: February 2022

ऍग्रो

Soyabean prices: सोयाबीनने चार महिन्यांत प्रथमच 7,000 चा टप्पा पार

लातूर, दि. 24  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक 7050 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. गेल्या अडीच महिन्यांतील ही सर्वाधिक दरवाढ असून याच शेतकऱ्यांना या वाढीचा फायदा होणार आहे. ज्यांनी चार महिन्यांपासून सोयाबीन बाजारात आणले नाही. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या शेतकऱ्यांना वाढलेल्या भावाचा फायदा होणार आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांचे लागवडीखालील क्षेत्र कमी […]Read More

अर्थ

मल्ल्या-नीरव-मेहुलकडून 18 हजार कोटी रुपये जप्त

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकारने सर्वोच न्यायालयात सांगितले की, बुधवारपर्यंत देशभरात ईडीकडून (ED) 4700 प्रकरणांची चौकशी सुरू आहे आणि 313 जणांना अटक करण्यात आली आहे. विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्या धन सावकारी (money laundering) प्रकरणात ईडीने न्यायालयाच्या आदेशानुसार 18000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त केल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला […]Read More

अर्थ

बार्कलेज ने कमी केला विकास दराचा अंदाज

नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना साथीच्या तिसऱ्या लाटेमुळे भारताच्या आर्थिक विकासावर परिणाम होऊ शकतो. विदेशी ब्रोकरेज फर्म बार्कलेजने (Barclays) चालू आर्थिक वर्ष 2022 च्या वाढीचा (GDP Growth Rate) अंदाज कमी केला आहे. आधी बार्कलेजचा अंदाज व्यक्त केला होता की चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 10 टक्के दराने वाढेल, परंतु आता तिसऱ्या लाटेमुळे, जीडीपी […]Read More

अर्थ

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात होऊ शकते तीन टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या (Central Govt Employees) महागाई भत्त्यात (DA) होळीपूर्वी वाढ होण्याची शक्यता आहे. सरकार महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करणार आहे जी 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार वाढीव पगार, जानेवारी आणि फेब्रुवारीच्या थकबाकीसह कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यातील दिला जाईल. सध्या एकूण महागाई […]Read More

Featured

दूरसंचार महसूल अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा जास्त मिळणार

नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दूरसंचार सेवांमधून सरकारचे महसूल संकलन (Telecom Revenue) पुढील आर्थिक वर्षात 52,806.36 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय (Budget) अंदाजापेक्षा खूप जास्त असेल. स्पेक्ट्रम लिलावातून मिळणार्‍या महसुलाचीही भर पडल्यामुळे ही वाढ होण्याची शक्यता आहे. दूरसंचार विभागाचे सचिव के राजारामन यांनी सांगितले की, स्पेक्ट्रम लिलावाच्या प्रस्तावामुळे महसूल संकलन अर्थसंकल्पीय लक्ष्यापेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. […]Read More

अर्थ

रशिया व युक्रेन मधील तणावामुळे बाजार( Stock Market) दिशाहीन

सलग दुसऱ्या आठवड्यात भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांनी घसरणीचा सिलसिला सुरूच ठेवला. रशिया व युक्रेन या देशातील तणाव,कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि FII ची अथक विक्री या कारणांमुळे बाजारात अस्थिरता वाढली.त्याचप्रमाणे सोमवारी जाहीर झालेल्या किरकोळ महागाईच्या दरानी सात महिन्यांचा उच्चांक गाठला. अमेरिका व यु.के येथील महागाईने सुद्धा ३०/४० वर्षांचा उच्चांक गाठल्याने तेथील सेंट्रल बँकांवर व्याजदर वाढीसाठी […]Read More

महाराष्ट्र

थकीत वसुलीसाठी साखरेचा लिलाव सुरू…

सांगली , दि. 19  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तासगाव साखर कारखान्याच्या थकीत एफआरपी वसुलीसाठी महसूलखात्या मार्फत साखर विक्रीची टेंडर काढून आरआरसीमार्फत कारवाई सुरू केली आहे. या कारखान्याच्या गोडाऊनमध्ये 14 हजार 940 पोती साखर शिल्लक आहे. तासगाव आणि नागेवाडी येथील साखर कारखान्यांच्या ऊस बिलाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. नागेवाडी कारखान्याकडील दोन वर्षाची तर तासगाव कारखान्याकडील एक वर्षाची […]Read More

अर्थ

परकीय चलन साठ्यात झाली घट

नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात (Forex Reserve) पुन्हा एकदा घट झाली आहे. 11 फेब्रुवारी 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात तो 1.763 अब्ज डॉलरने कमी होऊन 630.19 अब्ज डॉलर झाला आहे. मात्र या काळात सोन्याच्या साठ्याचे मूल्य वाढले आहे आणि 95.20 कोटी डॉलरने वाढून तो 40.235 अब्ज डॉलर झाला आहे. भारतीय रिझर्व्ह […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

ऊस बिलांच्या थकबाकीसाठी शेतकरी रस्त्यावर..

सांगली, दि. 18  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऊस बिलाची थकीत एफ आर पी, रासायनिक खताचे वाढलेले दर, कृषी पंपाच्या वीज आणि पाणी बिलाची रक्कम इत्यादी प्रश्नावर सांगली जिल्ह्यातील उसकरी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोर्चाने जात असताना पोलिसांशी त्यांची झटापट झाली. आंदोलकांनी सरकारचा प्रतिकात्मक मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी सदरचे […]Read More

Featured

एलआयसीवर आयकर विभागाच्या 75 हजार कोटींचे दायित्व

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आयपीओ आणण्याच्या तयारीत असलेली देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (LIC) आयकर विभागाचे (income tax department) सुमारे 75,000 कोटी रुपये थकित आहेत. विशेष बाब म्हणजे कर दायित्वे भरण्यासाठी कंपनी आपल्या निधीचा वापर करू इच्छित नाही. आयपीओ साठी बाजार नियामक सेबीकडे सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, भारतीय आयुर्विमा महामंडळावर (LIC) […]Read More