मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकार सज्ज झाले आहे. आपत्कालिन स्थितीत नेहमीच अलर्ट मोड वर राहून लोकांच्या मदतीला धावून जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरसाठी रवाना झाले आहेत. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यातील अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. […]Read More
काल काश्मीरमधील झालेल्या भीषण हल्ल्याच्या 27 पर्यटकांचा बळी गेला. याच्या निषेधार्थ आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणाऱ्या IPL सामन्यात सर्व खेळाडू आणि पंच काळ्या पट्ट्या घालून मैदानात प्रवेश करणार आहेत. तसेच या सामन्यादरम्यान मैदानावर कोणत्याही प्रकारचा उत्सव साजरा केला जाणार नाही. खेळ शांततेत खेळला जाईल. फटाके वाजवले जाणार नाहीत, तसेच चीअरलीडर्सकडून नृत्य केले […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकानंतर मतदार यादी आणि मतदानप्रक्रियेवर करण्यात येत असलेल्या आरोपांना भारत निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार, निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी नसून, सर्व कायदेशीर तरतुदींनुसारच निवडणुका पार पडल्या आहेत. आयोगाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 6 कोटी 40 लाख 87 हजार 588 मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. सकाळी […]Read More
मुंबई दि २३– आंतरराष्ट्रीय ब्लड आर्टिस्ट डॉक्टर संतोष कटारे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र स्वतःच्या रक्ताने रेखाटले आहे. याची प्रतिमा त्यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल कटारे यांचे अभिनंदन केले आहे.Read More
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर काही पर्यटक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटकांचं नाव, धर्म विचारून त्यांना गोळ्या झाडल्याचे समोर आल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबाबत आता महत्त्वाची माहिती आता समोर येऊ लागली आहे. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा एक फोटो समोर […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :- महाराष्ट्र राज्याचा गाडा जिथून चालतो त्या मंत्रालयात महायुती सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर येऊन अनेक महिने उलटले आहेत. परंतु अजूनही मंत्रालयातील जलसंधारण विभागात महाविकास सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा फलक आणि फोटो पाहायला मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. […]Read More
काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन
मुंबई, दि. 23 : पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24×7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून […]Read More
पहलगाम, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून बैसरन व्हॅलीची पाहणी करण्यात आली. पहलगाम येथे नेमकी घटना कशी घडली, याबाबत अमित शाह यांनी माहिती घेतली. जम्मू काश्मीरचे […]Read More
श्रीनगर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंगळवारी दुपारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे.तर २० हून अधिक लोक जखमी झाले. या भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील संजय लेले, अतुल मोने, दिलीप डिसले, संतोष जगदाळे, कौस्तुभ गनबोटे, हेमंत जोशी या ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. संजय लेले, हेमंत […]Read More
बुलडाणा, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील 16 गावांमध्ये केस आणि नख गळती घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक जिल्हयात दाखल झाल आहे. त्यांनी आज बाधीत गावांना भेटी दिल्या. त्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आणि आवश्यक नमुने देखील संकलित केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते […]Read More