mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

आपत्तीत कामे करण्याला प्राधान्य; राजकारण करणाऱ्यांना उत्तरे देणार नाही

मुंबई दिनांक २६:– आपत्तीमध्ये काम करण्याला आमचं प्राधान्य आहे. आपत्तीचे राजकारण करणाऱ्यांना उत्तरं देत बसणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यातील सध्याच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील अद्ययावत अशा राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन त्यांनी आढावा घेतला त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. आपत्कालीन कार्य केंद्र तंत्रज्ञानाने सुसज्ज असे झाल्याने कोणत्याही आपत्तीत शासनाला योग्य व्यवस्थापन […]Read More

ट्रेण्डिंग

मंडणगड मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, दापोली हर्णे रस्ता खचला…

रत्नागिरी दि २६:– रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. दापोली, मंडणगड तालुक्यात तर अक्षरश: पावसाचा कहर सुरू आहे. खेड तालुक्यात जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून खेड शहराला पुराचा धोका वाढला आहे. दुपारी बारा वाजता जगबुडी नदीची इशारा पातळी म्हणजेच सहा मीटर इतकी नोंदवली गेली आहे. मुसळधार पावसामुळे दापोली-हर्णे रस्ता खचला आहे. दापोली तालुक्यातील वणंद […]Read More

ट्रेण्डिंग

भिवंडीतील नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा;खासदार बाळ्या मामांनी मनपा अधिकाऱ्यांना धरले धारेवर….

मुंबई, दि 26 पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून अवकाळी पावसाने मागील महिन्याभरापासून हजेरी लावली असतानाही मनपा प्रशासनाने नालेसफाईच्या कामात दिरंगाई केली असून ठेकेदारांसह मनपा अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पावसाळ्यात शहरातील सखल भागात पाणी साचून शहर तुंबण्याची शक्यता निर्माण झाल्याने भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी मनपा अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.सोमवारी खासदार […]Read More

राजकीय

भ्रष्ट महायुती सरकारने मुंबईची तुंबई केली

मुंबई, दि.26मुंबईत दरवर्षी मान्सूनपूर्व कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात पण त्यातून कामे कशी होतात हे चित्र पहिल्याच पावसाने दाखवून दिले आहे. बीएमसीत प्रशासकाच्या माध्यमातून भाजपा युती सरकार राज्य करत असून पहिल्याच पावसात मुंबईकरांना जो नाहक त्रास सहन करावा लागला त्याला भ्रष्ट भाजपा युतीचे ट्रिपल इंजिन सरकारच जबाबदार असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा […]Read More

राजकीय

सरकार सतर्क, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

मुंबई दि २६– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पावसाच्या स्थितीचा सातत्याने आढावा घेत असून, संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी ते सातत्याने संपर्कात आहेत असे मुख्यमंत्री कार्यालयाने कळविले आहे. राज्यातील विविध ठिकाणी घेण्यात […]Read More

ट्रेण्डिंग

खासदार नरेश म्हस्के यांनी घेतला पावसाळी स्थितीचा आढावा

ठाणे दि २६– खासदार नरेश म्हस्के यांनी आज ठाणे महानगरपालिकेच्या विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन पाहणी केली .यावेळी जिह्वाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी,अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे व इतर प्रशासकीय अधीकारी कर्मचारी उपस्थित होते. ML.MSRead More

कोकण

रायगड जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा कोमात; सत्ताधारी सुस्त, तर जनता त्रस्त

मुंबई, दि . 26पावसाळा सुरू होण्यापूर्वी अवकाळी पावसाने रायगड जिल्ह्यात धुमाकूळ माजवला असताना रायगड जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा मात्र कोमात गेली आहे तर रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मस्त झाले असून शासकीय अधिकारी मालामाल झाले असून याचा महाराष्ट्र जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना भोगाव लागत असून रस्ते वीज व अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटल्याने पुढील चार महिन्यात पावसाळ्यात सर्वसामान्य जनता […]Read More

राजकीय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती, इंदापूर, पुणे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांतील

मुंबई, दि. २६ :- “मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात पावसाचा […]Read More

महानगर

मेट्रो तीन ची सेवा सुरळीत, प्रवाशांना धोका नाही

मुंबई दि २६– आचार्य अत्रे मेट्रोस्थानकाच्या ज्या भागाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही त्या भागात पावसाच्या पाण्याची गळती झाली असून त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला कोणताही धोका नाही, मेट्रो तीन मार्ग मधील आरे ते वरळी ही मेट्रो सेवा नियमितपणे सुरू असल्याचे स्पष्टीकरण मेट्रो तीनच्या वतीने देण्यात आले आहे. वरळी येथील आचार्य अत्रे मेट्रोस्थानकात ज्या भागातून प्रवाशांना प्रवेश […]Read More