mmcnews mmcnews

विदर्भ

चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका कायम

चंद्रपूर दि १९:- चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात काल दुपारपासून पावसाची संततधार सुरू आहे. एकीकडे वर्धा नदीला पूर आला असताना जोरदार पावसाने चंद्रपूरकरांच्या चिंता वाढविल्या आहेत. विशेष म्हणजे अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात गेले 3 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे इसापूर धरणातुन मोठ्या प्रमाणात पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणाचे पाणी पैनगंगा नदीतून वर्धा नदीत […]Read More

विदर्भ

चिखली तालुक्यात अतिवृष्टी तर अनेक जलप्रकल्प भरले, विसर्ग सुरू…

बुलडाणा दि १९ — जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पावसाची संतत सुरु असल्याने अनेक ओढे ,नद्या ओसंडून वाहत आहेत, चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतीवृष्टी झाली असून हजारो हेक्टर शेतातील पिके पाण्याखाली आली आहेत. अनेक रस्ते, पूल यावरून पाणी वाहत असल्याने ग्रामीण भागातील काही गावांचा संपर्क तुटला आहे . भारतीय हवामान विभागाने (IMD) बुलडाणा जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी […]Read More

मराठवाडा

बिंदुसरा धरण तिसऱ्यांदा भरले तसेच मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले…

बीड दि १९….गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बीड मधील बिंदुसरा धरण तिसऱ्यानंदा भरले तसेच मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले, परळीचे नागापूर धरण ओवर फ्लो तर माजलगावच्या सरस्वती नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक नद्या आणि नाले तुडुंब भरून […]Read More

विदर्भ

गडचिरोलीत पावसाचा कहर, पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी….

गडचिरोली दि १९:– गडचिरोली जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेला अंदाज खरा ठरला असून पावसाने परत जोरदार हजेरी लावली आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून भामरागड तालुक्यात तिन्ही नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने भामरागड तालुक्याचा जगाशी संपर्क तुटलेला आहे. पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, खंडी नाल्यात काल एका युवकाचा या पुरात […]Read More

ट्रेण्डिंग

Amazon ची ही सुविधा होणार बंद

Amazon ने घोषणा केली आहे की कंपनी 20 ऑगस्ट 2025 पासून अँड्रॉइड यूझर्ससाठी त्यांचे अ‍ॅपस्टोअर बंद करेल. ही सेवा बऱ्याच काळापासून चालू आहे परंतु गुगल प्ले स्टोअरसमोर ती अधिक लोकप्रिय होऊ शकली नाही. बहुतेक लोक तिच्या बंद होण्यावर परिणाम करणार नाहीत, परंतु ज्यांनी प्लॅटफॉर्मवरून अ‍ॅमेझॉन कॉइन्स किंवा अ‍ॅप्स डाउनलोड केले आहेत त्यांच्यासाठी ही वाईट बातमी […]Read More

ट्रेण्डिंग

या देशात पदवीधर होण्याआधी १० झाडे लावणे बंधनकारक

पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी एक चांगले जग निर्माण करण्यासाठी फिलिपिन्स सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 2019 साली संसदेत ‘Graduation Legacy for the Environment Act’ हा कायदा एकमताने मंजूर करण्यात आला. या कायद्यानुसार, आता हायस्कूल, कॉलेज आणि अगदी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्गात जाण्यापूर्वी किंवा पदवी मिळवण्यापूर्वी किमान 10 झाडे लावण्याचा पुरावा सादर […]Read More

ट्रेण्डिंग

प्रवासाला तब्बल बारा तास, मग टोल का द्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा

नवी दिल्ली. दि. १८: केरळमधील त्रिशूर येथील ६५ किलोमीटरच्या महामार्गावरील प्रवासासाठी १२ तास लागत असतील तर प्रवाशाला १५० रुपये टोल का भरावा, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विचारला. त्रिशूरमधील पलियाक्कारा टोल प्लाझावर टोल वसुलीला स्थगिती देण्याच्या केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि सवलत देणारी कंपनी, गुरुवायूर इन्फ्रास्ट्रक्चर […]Read More

महिला

उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केले ‘लाडकी सून’ अभियान

ठाणे, दि. १८ : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या यशानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी ठाणे शहरातून ‘लाडकी सून’या राज्यव्यापी अभियानाची त्यांनी सुरुवात केली आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश घरगुती अत्याचार आणि अन्यायाला बळी पडणाऱ्या महिलांना तात्काळ मदत करणे हा आहे. या अभियानांतर्गत पीडित सुनांना मदत करण्यासाठी एक […]Read More

ट्रेण्डिंग

ब्राह्मण समाजाविषयी द्वेष निर्माण करणारी व्यवस्था बंद व्हावी

मुंबई, दि. १८ : ब्राह्मण समाजाविषयी द्वेष निर्माण करणारी व्यवस्था बंद केली पाहिजे, असे आवाहन ‘उचल्या’ या कादंबरीचे लेखक लक्ष्मण गायकवाड यांनी काल केले. श्रीविद्या प्रकाशनतर्फे प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्या ‘चिवित्रा’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन गायकवाड आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले “समाजातील जातिव्यवस्था, वर्णभेद […]Read More

ट्रेण्डिंग

कुणाल कामरा हक्कभंग प्रकरणी महाधिवक्त्यांचा अभिप्राय मागवला

मुंबई, दि. १८ : विनोदी तिरकस वक्तव्य करत अनेक विषयांवर टिप्पणी करणाऱ्या कुणाल कामरा विरोधात महाराष्ट्र विधीमंडळाने दाखल केलेल्या हक्कभंग ठरावावर आता राज्याच्या महाधिवक्त्यांचा सल्ला मागण्यात आला आहे. कुणाल कामरा याने हक्कभंग नोटीसला दिलेल्या उत्तरानंतर त्याच्यावरील पुढील कारवाईसाठी हक्कभंग समितीने राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांना कायदेशीर सल्ला देण्याची विनंती केली आहे. कुणाल कामराने हक्कभंग नोटीसला […]Read More