mmcnews mmcnews

महानगर

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

मंगळवार दि. १९ ऑगस्ट, २०२५.• मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ.(महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग) • कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमीटेड, संस्थेस कसबा करवीर, बी वॉर्ड, कोल्हापूर येथील गट क्र.६९७/३/६ मधील २ हे. ५० आर जमीन देणार. (महसूल, नोंदणी […]Read More

खान्देश

हतनूर धरणातील पाण्याचा विसर्ग, तापीची पातळी वाढली

नंदुरबार दि १९:– हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे तापी नदीची पातळी वाढली आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजमधूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. प्रशासनाने तापी नदीच्या काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, नदीपात्रात न जाण्याचं आवाहन केलं आहे. हतनूर धरणातून आज दुपारी १२ वाजता १,५७,३९९ क्यूसेक पाणी सोडण्यात आलं आहे. येत्या काही […]Read More

विदर्भ

प्रमुख नद्यांना पूर – हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान

वाशीम दि १९:– वाशीम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मागील चार दिवसांपासून प्रमुख नद्या आणि नाल्यांना मोठा पूर आलेला आहे. या पुरामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकं वाहून गेली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, वाशीम जिल्ह्यातील सर्व ४५ महसूल मंडळात मागील दोन महिन्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यापैकी ११ महसूल मंडळात तीनपेक्षा जास्त […]Read More

महानगर

*असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी युनियनने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी ; ज्येष्ठ राजकीय

मुंबई, दि १९ :असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी युनियनने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, जे कामगार आहेत त्यांचा उत्कर्ष कसा होईल, त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, ऐश्वर्य कसे येईल, त्यांना आनंदाने कसे जगता येईल, यासाठी युनियनने प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी कामगार नेत्यांना सल्ला दिला. दिपकभाऊ काळींगण यांच्या नेतृत्वाखालील ऑल […]Read More

महानगर

पावसाचा वाढता जोर पाहता, मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क

मुंबई, दि १९ : गेले तीन दिवस मुंबई परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळित होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाचा वाढता जोर पाहता, आपत्ती विभागाने सज्ज राहावे असे निर्देश त्यांनी या यावेळी विभागाला दिले. मंत्री श्री. मंगलप्रभात […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

तुफानी पावसात भरकटलेले हेलिकॉप्टर रस्त्यावर उतरले

पुणे दि १९– लोणावळ्यापासून अवघ्या ३० किमी अंतरावरच्या सालतर गावात मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे.सालतर गावच्या मागील बाजूला मंदिराकडे जाणारा सिमेंट काँक्रीटचा रस्ता आहे त्यावर उतरविण्यात आले.बाजूलाच मुळशी धरणाचा जलाशय तर दुसऱ्या बाजूला जग प्रसिद्ध ॲम्बी व्हँलीचा प्रकल्प आहे. हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलेट, चार प्रवासी होते.स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार हे […]Read More

कोकण

पुराच्या पाण्यामुळे शहरात आली मगर….

महाड दि १९ — रायगड जिल्ह्यात सलग पडणाऱ्या मुसळधार पावसात माणगाव मध्ये पुराच्या पाण्यामुळे एक मगर शहरी भागात आढळून आली आहे. नागरिकांना मुंबई गोवा महामार्गालगत एक मगर जखमी अवस्थेत असल्याचे आढळले, पुराच्या पाण्यासोबत ही मगर आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आधी देखील मागणाव मध्ये नागरी भागात मगर आढळून आल्याची घटना घडली होती. प्राणी […]Read More

महानगर

मुंबईत तुफानी पाऊस, सर्व कार्यालये बंद

मुंबई दि १९ — हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्यानंतर काल रात्री पासूनच मुंबई परिसरात जोरदार पाऊस सुरू असून त्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये यांना आज दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी देण्यात आली आहे.खासगी कार्यालये/ आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या सूचना द्याव्यात असे आवाहन देखील […]Read More

कोकण

पनवेलमध्ये गाढी नदीला आला पूर.

पनवेल दि १९ — रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातमुसळधार पावसामुळे गाढी नदीला मोठा पूर आला आहे.चिपळे येथील पुलावरून गाढी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आलेले दिसत आहे. पनवेल परिसरातील गाढी नदी दुथडी भरून वाहत आहे शक्य असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पनवेलमध्ये अनेक ठिकाणी पाणीच पाणी […]Read More

मराठवाडा

येलदरी धरणाचे दरवाजे उघडले, शेतशिवारात पूर स्थिती…

परभणी दि १९ — जिल्ह्यातील सर्व भागात रात्रभर मुसळधार पाऊस पडला असून सध्याही रिमझिम पाऊस सुरू आहे . रात्री 8 वाजता येलदरी धरणाचे 8 दरवाजे 2 मीटरने वर उचलल्याने सध्या पूर्णा नदी पात्रात 64 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पूर्णा नदीच्या पुराच्या पाण्यात वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठावरील शेत शिवारांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली […]Read More