नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार, कोविड-19 च्या उद्रेकानंतर दक्षिण आणि नैऋत्य आशियातील अपखंडामध्ये भारतीय अर्थव्यवस्था सर्वात लवचिक असल्याचे सिद्ध होऊ शकते. कोविड-19 नंतर कमी परंतू सकारात्मक आर्थिक वाढीमुळे आणि मोठ्या बाजारपेठेमुळे गुंतवणूकदारांसाठी भारत आकर्षक ठिकाण राहील असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. आशिया आणि प्रशांत साठी संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि […]Read More
रांची, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुमला विकास भारती यांच्या प्रयत्नांनी बासमती तांदळाच्या उत्पादनातून गुमला जिल्ह्यातील नक्षलग्रस्त बनालटमधील शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडला आहे. बासमती भात वाण ‘कला जीरा’ ही शेती येथील डझनभर शेतकरी कुटुंबांचे जीवन सुगंधित करते. पर्यावरणाचा विचार करून रासायनिक खतांचा वापर करण्याऐवजी येथे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. विकास भारतीच्या माध्यमातून […]Read More
नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 2020 वर्षे संपण्यास अवघे चार दिवस शिल्लक आहेत. नवीन वर्षात प्रवेश करण्यापूर्वी 2021 मध्ये बँका किती दिवस बंद रहाणार आहेत ही बँकांच्या सुट्ट्यांची यादी तपासून घ्यावी. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे वर्षभरातील सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार 2021 मध्ये बँका पूर्ण 56 दिवस बंद राहतील. यात शनिवार आणि […]Read More
नवी दिल्ली, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वस्तु व सेवा कर (जीएसटी) नियमात सरकारने कलम 86-बी समाविष्ट केल्याने वाद निर्माण झाला आहे. अलीकडेच व्यापार्यांची संघटना, कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने जीएसटी नियमात कलम-86-बी समाविष्ट करण्याला विरोध करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहिले होते. आता अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. या नियमाचा […]Read More
नवी दिल्ली, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबरच्या तिमाहीत अर्थव्यवस्थेत अपेक्षेपेक्षा चांगली पुनर्प्राप्ती दिसून येत आहे. त्याचसोबत पतमानांकन संस्था इंडिया रेटिंग्सने आर्थिक वर्ष 2021 साठीच्या आर्थिक वाढीच्या अंदाजात सुधारणा केली आहे. इंडिया रेटिंग्सने याआधी आर्थिक विकास दर उणे 11.8 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्रा आता ते वाढवून उणे 7.8 टक्के केला आहे. […]Read More
मुंबई, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणूच्या आघातानंतर भारतीय अर्थव्यवस्था बहुतांश अंदाजांपेक्षा वेगाने प्रगती करत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालात ‘अर्थव्यवस्थेची स्थिती’ या शीर्षकाच्या एका लेखात म्हटले आहे की तिसर्या तिमाहीत (क्यू3) अर्थव्यवस्था सकारात्मक श्रेणीत येऊ शकते. या अहवालात असे म्हटले आहे की अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यावरुन भारतीय अर्थव्यवस्था कोविड-19 च्या आघातामधून वेगाने प्रगती […]Read More
नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बुधवारी सर्व ग्राहकांना सतर्क केले आहे. आरबीआयने म्हटले आहे की जर आपण डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे किंवा मोबाईल अॅपद्वारे कर्जासाठी अर्ज करीत असाल तर सावध व्हा. याद्वारे ना केवळ आपल्या कागदपत्रांद्वारे फसवणूकच केली जाऊ शकते तर उच्च व्याज दराने कर्ज देखील दिले जाते. या व्यतिरिक्त त्यांचे पैसे […]Read More
नवी दिल्ली, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देना बँक आणि विजया बँक 1 एप्रिल 2019 रोजी बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाल्या, परंतु सर्व 3,898 शाखांचे एकत्रीकरण डिसेंबर 2020 मध्ये पूर्ण झाले आहे. आता देना बँक व विजया बँकेच्या ग्राहकांना बँक ऑफ बडोदाच्या 8,248 शाखा आणि 10,318 एटीएमचा लाभ घेता येणार आहे. विलीनीकरणानंतर, देना बँक […]Read More
इंदूर, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक वर्ष 2019-20 साठीचे प्राप्तिकर विवरण दंडाशिवाय भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. या तारखेनंतर 1 जानेवारीपासून वार्षिक 5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणार्या करदात्यांना एक हजार रुपये दंड आणि त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या करदात्यांना दहा हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. साधारणपणे 31 जुलैनंतर दंड एक हजार आणि पाच […]Read More
नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत दोन-अंकी विकासदर गाठू शकतो असा विश्वास अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. ठाकूर यांनी सांगितले की, तरुण आणि महत्वाकांक्षी वर्ग तसेच ग्रामीण क्षेत्राकडून निर्माण झालेया मागणीच्या जोरावर उत्पादन कामांचा विस्तार होईल आणि डिजिटल सेवा क्षेत्रात तेजी दिसून येईल. या जोरावर दोन अंकी विकास दर गाठण्याची […]Read More