Month: November 2023

देश विदेश

इंफाळ विमानतळावर दिसले UFO

इंफाळ, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंफाळ विमानतळावर काल अज्ञात उडणारी वस्तू (UFO) दिसल्याची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) दिली. त्यामुळे इंफाळ विमानतळावर 3 तास गोंधळ उडाला होता. इम्फाळला येणारी दोन उड्डाणे कोलकात्याकडे वळवण्यात आली. तर तीन विमानांच्या लँडिंगला उशीर झाला. इम्फाळ विमानतळाचे संचालक चिपेम्मी केशिंग यांनी ड्रोन दिसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुरक्षेची […]Read More

ट्रेण्डिंग

सरकार ताब्यात घेणार सहाराचा निधी

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सहाराचे संस्थापक सुब्रत रॉय सहारा यांच्या निधनानंतर केंद्र सरकार सहाराच्या गुंतवणूकदारांबाबत मोठा निर्णय घेत आहे. सहाराच्या गुंतवणूकदारांच्या परतफेडीसाठी खास उघडलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केलेली रक्कम 25 हजार कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. बँकांमध्ये पडून असलेला हा पैसा केंद्र सरकार ताब्यात घेण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने सहारा रिफंड पोर्टल […]Read More

ट्रेण्डिंग

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी समिती स्थापन

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांपासून राज्यातल्या विविध ठिकाणी धनगर समाज बांधव मोर्चे आंदोलने करत आहेत. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून (अनुसूचित जमाती) आरक्षण मिळण्याच्या मागणीने जोर धरला आहे. याचीच दखल घेऊन राज्य सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती […]Read More

महाराष्ट्र

एसटी चालवतांना भ्रमणध्वनीवर बोलल्यास थेट कारवाई

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एसटी बस चालवत असतांना भ्रमणध्वनीवर बोलणे अथवा हेडफोन घालून भ्रमणध्वनीवरील गाणी, व्हिडीओ ऐकणे/बघणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर प्रचलित नियमानुसार कडक कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत. एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. गेली ७५ वर्षे प्रवाशांची विश्वासर्हता जपण्यामध्ये एसटीच्या निर्व्यसनी […]Read More

Lifestyle

नाश्त्यात क्रिस्पी बटाटा ब्रेड बॉल्स खाण्याचा आनंद घ्या

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बहुतेक लोक न्याहारीसाठी ब्रेड, अंडी आणि ब्रेड ऑम्लेट खातात आणि घराबाहेर पडतात. अनेकवेळा तो रोजच्या नाश्त्यात त्याच बीन्स खात राहतो. हे खाल्ल्यानंतर कंटाळा येतो. मग लोक ब्रेडची नवीन रेसिपी शोधतात, जेणेकरून चवही बदलू शकेल आणि नाश्ताही आरोग्यदायी होऊ शकेल. काळजी करू नका, आम्ही तुम्हाला ब्रेड आणि बटाटे घालून […]Read More

विदर्भ

धानाला बोनस नागपूर अधिवेशनात, ई पीक पहाणीला मुदतवाढ

भंडारा, दि. २० ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : भंडारा जिल्ह्यातील धान हे प्रमुख पीक आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धानाला बोनस देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सातत्याने काम करते आहे. त्यामुळे नागपूर येथे होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात धानाला बोनस जाहीर करू, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. शासन आपल्या दारीअभियानांतर्गत […]Read More

महानगर

२५ नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीची मुंबईत ‘संविधान सन्मान महासभा’

मुंबई दि.20( एम एमसी न्यूज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडीकडून येत्या 25 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर “संविधान सन्मान महासभे”चे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संविधानाने या देशातील शोषित, वंचित, अल्पसंख्यांक, दलित – आदिवासी, ओबीसी व धार्मिक समुह या सर्वांच्या हक्क अधिकारांचे संरक्षण केले आहे. समता, बंधुता आणि न्यायाची हमी दिली आहे. 25 नोव्हेंबर 1949 […]Read More

पर्यटन

मुघल वास्तुकलेचा उत्तम नमुना

चंदीगड, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रंग दे बसंती या बॉलीवूड चित्रपटातील “तू बिन बताये” हे सुंदर गाणे आठवते? बरं, ते दोराहा किल्ल्यावर चित्रित करण्यात आलं होतं, ज्याला मुघल सराई किंवा दोराहा सेराई असंही नाव देण्यात आलं होतं आणि म्हणूनच याला आरडीबी किल्ला म्हटलं जातं. १७ व्या शतकात सम्राट जहांगीरने बांधलेला हा विलक्षण किल्ला […]Read More

मराठवाडा

४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन गंगापूर येथे

छ. संभाजीनगर दि २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाडा साहित्य परिषदेचे ४३ वे मराठवाडा साहित्य संमेलन गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे दिनांक २ आणि ३ डिसेंबर २३ रोजी संपन्न होणार आहे. या संमेलनाअध्यक्षपदी प्रख्यात लेखक डॉक्टर जगदीश कदम हे असणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दोन डिसेंबर रोजी सकाळी […]Read More

राजकीय

महाराष्ट्र जळत असताना भाजपा सरकार मात्र मजा बघत आहे

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता भीषण आहे, शेतकरी आणि सर्वसामान्य जनता दुष्काळ तसेच महागाईत होरपळून निघाली आहे. महागाई , दुष्काळामुळे शेतकरी, कष्टकरी तसेच महिला आणि बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत परंतू राज्यातील तिघाडी सरकारी त्याकडे लक्ष देत नाही. जनतेच्या ज्वलंत प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक मराठा आणि ओबीसी समाजात […]Read More