Month: September 2023

ऍग्रो

कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी काढली ट्रॅक्टर रॅली…

बुलडाणा, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बुलडाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ..कांद्यावरील निर्यात शुल्क हटवा यासह विविध मागण्याफडे लक्ष वेधण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे शेतकरी संघटनेच्यावतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला . सप्टेंबर महिना सुरु पण जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस झाला नाही जिल्ह्यातील प्रकल्प ही कोरडे आहेत शेतातील पिके मान टाकायला लागले आहे त्यामुळे […]Read More

राजकीय

सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवर कर्ज

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे कर्ज अटी आणि शर्तींच्या अधीन राहून उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेच्या अनुषंगाने सहकारी साखर कारखान्यांना त्यांच्या फेस व्हॅल्युनुसार […]Read More

राजकीय

मेट्रो प्रकल्पांना ब्रीज लोन घेण्याबाबत उच्चाधिकार समिती

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मेट्रो कारशेडसाठी ठाण्यातील मोघरपाडा येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत करण्याचा त्याचप्रमाणे राज्यातील मेट्रो प्रकल्पांना ब्रीज लोन साठी शासन हमी देण्यासंदर्भात निर्णय घेण्याकरिता उच्चाधिकार समिती नेमण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मुंबई मेट्रो टप्पा-4, 4अ, 10 आणि 11 या मेट्रो मार्गांसाठी मौजे […]Read More

राजकीय

राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सायबर गुन्ह्यांविरुद्ध तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्यात ८३७ कोटी रुपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पामुळे नागरिकांना आता एका फोनवरून आठवडाभर २४ तास कार्यरत कॉल सेंटरवर तक्रार नोंदवता येणार आहे. अत्याधुनिक सायबर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तक्रारीचा तपास […]Read More

ऍग्रो

तीन लाख कांदा उत्पादकांना ३०० कोटी रुपये अनुदान वितरीत

मुंबई, दि.६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, […]Read More

महानगर

ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि मराठा समाजाच्या आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज शिवसेना उबाठा पक्षाच्या आमदार , खासदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, खासदार […]Read More

विदर्भ

पावसाअभावी सुकू लागली पिके; शेतकऱ्यांची वाढली चिंता

वाशिम, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाअभावी आतापर्यंत तग धरून असलेले सोयाबीन पीक आता खराब होऊ लागले आहे. तर पावसाने दिलेल्या दडीने जबरदस्त फटका खरीप पिकांना बसला असून येत्या दोन-तीन दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांच्या हातातून ही पिके जाणार असल्याचे चित्र वाशीम जिल्ह्यातील सर्वच भागात दिसून येत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत असून पावसाची […]Read More

महानगर

युरोपीय देशांमध्ये झालेल्या करारांच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र आणि युरोपीय देशांमध्ये उद्योग, कृषी , शिक्षणांसंदर्भात झालेल्या विविध करारांच्या अंमलबजावणीसंदर्भात विधीमंडळाच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. विधानसभा अध्यक्ष ॲड् राहुल नार्वेकर आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह विधिमंडळाच्या सदस्यांचे शिष्टमंडळ जर्मनी, नेदरलँड्स आणि लंडन या तीन देशाच्या अभ्यास दौऱ्यावर […]Read More

राजकीय

सरकारची शिष्टाई असफल , जरांगे यांनी दिली चार दिवसांची मुदत

जालना, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना समजण्यात आज सरकारच्या मंत्र्यांचे शिष्टमंडळ अयशस्वी ठरले आहे. जरांगे यांनी पुढील चार दिवसात अध्यादेश काढून आरक्षण द्या अशी मुदत या शिष्टमंडळाला दिली आहे. आज मंत्री गिरीश महाजन , संदीपान भुमरे, अतुल सावे यांच्या शिष्टमंडळानेमनोज जरांगे यांची भेट घेऊन आरक्षणाच्या निर्णयासाठी तीस दिवसांची मुदत […]Read More

राजकीय

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठयांना आरक्षण द्या

नागपूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यायचे असेल तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या अशी स्पष्ट भूमिका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे. नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार बोलत होते. ओबीसींच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडताना वडेट्टीवार म्हणाले, ओबीसींची लोकसंख्या ५२ टक्क्यांहून अधिक आहे आणि त्यांना मिळणारे आरक्षण […]Read More