mmcnews mmcnews

Breaking News

मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

परभणी, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिंगोली, जालना , लातूर आणि परभणी या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला आहे,त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.Rain with strong winds in Marathwada या जिल्ह्यातील अंबड, रेणापूर, हिंगोली शहर पूर्णा,मानवत,पलम, गंगाखेड तालुक्यासह अनेक भागात आज पुन्हा वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपले असून गारांचा खच पडलेला दिसून येत आहे.रब्बीची काढणीला […]Read More

देश विदेश

रमजानसाठी या राज्य सरकारने केला कार्यालयीन वेळेत बदल

लखनऊ,दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २२ मार्च पासून मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत बिहारच्या नितीश कुमार सरकारने मुस्लिम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने एक परिपत्रक जारी करून मुस्लिम कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना रमजानमध्ये नियोजित वेळेच्या एक तास आधी कार्यालयात येण्याची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर त्यांना नियोजित वेळेच्या […]Read More

राजकीय

लाल वादळ अखेर शमलं

ठाणे, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाशिक वरून मुंबईच्या दिशेने निघालेले लाल वादळ , लॉंग मार्च शहापूर तालुक्यातील वासिंद येथून परत जाण्यास सुरुवात झाली आहे, हा मोर्चा वासिंद येथे मैदानात दोन दिवसापासून थांबवण्यात आला होता.The red storm has finally subsided शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या असून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी माजी आमदार जे पी […]Read More

देश विदेश

आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त पंतप्रधानांनी केले टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या ग्लोबल मिलेट्स (भरड धान्ये) परिषदेचे उद्घाटन केले. दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन केंद्र (IARI) कॅम्पसमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष 2023 वर टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण केले. पंतप्रधानांनी बायर-सेलर मीट आणि प्रदर्शनाचेही […]Read More

राजकीय

राज्याच्या बिघडत्या वायू प्रदूषणाच्या संकटा कडे लक्ष द्या

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय मंत्री भूपिंदर यादव यांना महाराष्ट्राच्या बिघडत्या वायू प्रदूषणाच्या संकटाबद्दल युवा सेना अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्र लिहून लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईच्या AQI वर लक्ष केंद्रित केले आहे. पूर्णवेळ पर्यावरण मंत्र्याची अनुपस्थिती आणि राज्याच्या बेकायदेशीर सरकारमधील सार्वजनिक समस्यांबद्दल संवेदनशीलतेचा अभाव यामुळे हे संकट अधिकच बिकट झाले आहे, कारण […]Read More

अर्थ

अमेरिकन बँका मधील संकटामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड

मुंबई, दि. 18 (जितेश सावंत): गेला संपूर्ण आठवडा भारतीय शेअर बाजारावर अमेरिकेतील बँकामधील दिवाळखोरीच्या संकटांचे पडसादउमटतानादिसले.बाजार आठवडाभरअस्थिरतेच्याछायेखाली वावरताना दिसला.आठवडाभरात अमेरिकेतील तीन बँकांना टाळे लागले. या वृत्तानंतर जगभरातील शेअर बाजार रक्तबंबाळ झाल्याचे दिसून आले.त्यातच एफआयआयची(FIIs) विक्री देखील सुरुच राहिली.आठवड्यात निफ्टीने 17,000 मनोवैज्ञानिक पातळी तोडली.परंतु कच्च्या तेलाच्या किमतीतील नरमता, आणि यूएस फेड आगामी धोरणात आक्रमक होणार नाही […]Read More

महानगर

त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भाजप शिंदे गटाला ४८ जागा सोडायला तयार दिसतेय परंतू अजून एक वर्ष निवडणुकीला असून २८८ जागा भाजप चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. एकदा भाजप महाराष्ट्रात निवडणूका लढवेल आणि […]Read More

सांस्कृतिक

अभिनेते भालचंद्र कुलकर्णी निधन

कोल्हापूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. अल्पशा आजाराने त्यांनी ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कळंबा, शिवप्रभू नगर येथील निवासस्थानापासून सकाळी साडेअकरा वाजता अंत्ययात्रेस सुरुवात होणार आहे.भालचंद्र कुलकर्णी यांचं मराठी सिनेमातील योगदान मोठं आहे, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित […]Read More

महानगर

फक्त सभापतींशी चर्चा करणे बंधनकारक, उप सभापतींशी नाही

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे नियम आहेत, सभापती नसतील तर उपसभापतींशी चर्चेची गरज नाही अशी स्पष्ट भूमिका आज विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केली आहे. आज विधानसभेत याबाबतचा मुद्दा आशीष शेलार यांनी उपस्थित केला होता, विधानपरिषद उप सभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी काल त्या […]Read More

देश विदेश

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, केंद्राकडून सतर्कतेचे निर्देश

मुंबई,दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात एच3एन2 रुग्णांची संख्या वाढत असताना आता कोरोनाचा प्रसारही वाढला आहे..वाढती कोरोना रूग्णांची संख्या आणि एच3एन2 रुग्णांची पाहता केंद्राने राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.8 मार्चपासून राज्यात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या चाचण्या, बूस्टर डोस आणि नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना केंद्राकडून राज्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यात […]Read More