mmcnews mmcnews

राजकीय

राज्याच्या बिघडत्या वायू प्रदूषणाच्या संकटा कडे लक्ष द्या

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय मंत्री भूपिंदर यादव यांना महाराष्ट्राच्या बिघडत्या वायू प्रदूषणाच्या संकटाबद्दल युवा सेना अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्र लिहून लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईच्या AQI वर लक्ष केंद्रित केले आहे. पूर्णवेळ पर्यावरण मंत्र्याची अनुपस्थिती आणि राज्याच्या बेकायदेशीर सरकारमधील सार्वजनिक समस्यांबद्दल संवेदनशीलतेचा अभाव यामुळे हे संकट अधिकच बिकट झाले आहे, कारण […]Read More

अर्थ

अमेरिकन बँका मधील संकटामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड

मुंबई, दि. 18 (जितेश सावंत): गेला संपूर्ण आठवडा भारतीय शेअर बाजारावर अमेरिकेतील बँकामधील दिवाळखोरीच्या संकटांचे पडसादउमटतानादिसले.बाजार आठवडाभरअस्थिरतेच्याछायेखाली वावरताना दिसला.आठवडाभरात अमेरिकेतील तीन बँकांना टाळे लागले. या वृत्तानंतर जगभरातील शेअर बाजार रक्तबंबाळ झाल्याचे दिसून आले.त्यातच एफआयआयची(FIIs) विक्री देखील सुरुच राहिली.आठवड्यात निफ्टीने 17,000 मनोवैज्ञानिक पातळी तोडली.परंतु कच्च्या तेलाच्या किमतीतील नरमता, आणि यूएस फेड आगामी धोरणात आक्रमक होणार नाही […]Read More

महानगर

त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भाजप शिंदे गटाला ४८ जागा सोडायला तयार दिसतेय परंतू अजून एक वर्ष निवडणुकीला असून २८८ जागा भाजप चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. एकदा भाजप महाराष्ट्रात निवडणूका लढवेल आणि […]Read More

महाराष्ट्र

अभिनेते भालचंद्र कुलकर्णी निधन

कोल्हापूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. अल्पशा आजाराने त्यांनी ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कळंबा, शिवप्रभू नगर येथील निवासस्थानापासून सकाळी साडेअकरा वाजता अंत्ययात्रेस सुरुवात होणार आहे.भालचंद्र कुलकर्णी यांचं मराठी सिनेमातील योगदान मोठं आहे, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित […]Read More

महानगर

फक्त सभापतींशी चर्चा करणे बंधनकारक, उप सभापतींशी नाही

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे नियम आहेत, सभापती नसतील तर उपसभापतींशी चर्चेची गरज नाही अशी स्पष्ट भूमिका आज विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केली आहे. आज विधानसभेत याबाबतचा मुद्दा आशीष शेलार यांनी उपस्थित केला होता, विधानपरिषद उप सभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी काल त्या […]Read More

ट्रेण्डिंग

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, केंद्राकडून सतर्कतेचे निर्देश

मुंबई,दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात एच3एन2 रुग्णांची संख्या वाढत असताना आता कोरोनाचा प्रसारही वाढला आहे..वाढती कोरोना रूग्णांची संख्या आणि एच3एन2 रुग्णांची पाहता केंद्राने राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.8 मार्चपासून राज्यात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या चाचण्या, बूस्टर डोस आणि नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना केंद्राकडून राज्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यात […]Read More

देश विदेश

या राज्यात दारुच्या प्रत्येक बाटलीवर १० रु गोमाता अधिभार

शिमला, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिमाचल प्रदेश सरकारने राज्यात दारु विक्रीवर प्रत्येक बाटलीमागे 10 रुपये गोमाता अधिभार (Cow cess) लावण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये जाहीर करण्यात आलेल्या विविध योजनांमध्ये सर्वांत लक्षवेधी ठरली ती ‘गोमाता अधिभार’ ही घोषणा. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी हिमाचल […]Read More

देश विदेश

सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दलासाठी 70,500 कोटी रु. मंजुर

नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत आज लष्करासाठी आवश्यक खरेदीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल. सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दलासाठी 70,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली संपादनासाठ मंजूरी देण्यात आली आहे. एकूण प्रस्तावांपैकी, भारतीय नौदलाचे प्रस्ताव 56,000 कोटींहून अधिक आहेत, ज्यात मोठ्या […]Read More

Breaking News

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामात राज्याचा हस्तक्षेप बेकायदेशीर

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील सर्व नगरपरिषद , नगरपंचायत आणि महापालिकांच्या कारभारात राज्य सरकार हस्तक्षेप करत आहे , त्यांच्या माथी अनावश्यक योजना मारत असून त्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला .State interference in the work of local bodies illegal राज्यातील महानगरांतील समस्या , प्रभाग रचना फेर […]Read More

महानगर

किडनी घोटाळा प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातील किडनी विक्री घोटाळा आणि संबधित बाबींची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील समिती करेल अशी घोषणा आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली.Inquiry committee of retired judges in kidney scam case याबाबतचा प्रश्न माधुरी मिसाळ यांनी उपस्थित केला होता, त्याला राम सातपुते , राम कदम यांनी उप […]Read More