mmcnews mmcnews

राजकीय

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती

मुंबई, दि. २८ :.राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन पोर्टल, वन वेब ॲड्रेस’ ही महत्त्वाकांक्षी संकल्पना पुढे आणली असून त्याअंतर्गत ‘महासारथी’ (MahaSarathi) पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामुळे विविध शासकीय सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होऊन नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा मिळणार आहेत. […]Read More

राजकीय

राज्यातील प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती

मुंबई, दि. २८ : राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या अनेक प्रकल्पांमुळे भूसंपादनाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा वेगवान निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यात ५७ नवीन लवादांची नियुक्ती केली असून, यामुळे अनेक वर्षांपासून मोबदल्याविना रखडलेले २८ हजारांहून अधिक प्रकल्पग्रस्तांचे दावे आता जलदगतीने निकाली निघणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन यासाठी विशेष […]Read More

ट्रेण्डिंग

पंतप्रधान मोदींनी केले देशातील सर्वात मोठ्या विमानतळाचे उद्घाटन

नोएडा, दि. 28 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी उत्तर प्रदेशातील जेवर येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हे सध्या भारतातील सर्वात मोठे आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे विमानतळ आहे. 4 टप्पे पूर्ण झाल्यावर हे आशियातील सर्वात मोठे विमानतळ बनेल. पंतप्रधान मोदींनी जनसभेदरम्यान लोकांना इस्रायल-अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटाशी एकजुटीने […]Read More

अर्थ

17 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

मुंबई, दि. 28 : एकेकाळी जगातील सर्वात मोठी मोबाइल कंपनी असलेल्या नोकियाने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी जगभरात तब्बल 14 हजार कर्मचाऱ्यांना कमी करणार असून याचा थेट परिणाम भारतावरही होणार आहे. भारत नोकियासाठी महत्त्वाचा बाजार असून येथे 17 हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात. जागतिक कपातीमुळे अनेक भारतीय कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे. कंपनीची भारतातील […]Read More

महानगर

धारावीतील कुंभारकामाला मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड

मुंबई, दि. २८ : धारावीतील कुंभारवाडा परिसरातील ३० महिलांनी पॉटरी प्रशिक्षण कार्यशाळा पूर्ण केल्याबद्दल धारावी सोशल मिशन (DSM) तर्फे त्यांना इलेक्ट्रिक पॉटरी व्हील देऊन गौरव करण्यात आला. पारंपरिक कुंभारकामाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत महिलांसाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. कुंभारवाडा पारंपरिक मातीच्या भांड्यांसाठी प्रसिद्ध असून महिलांचा सहभाग आतापर्यंत मर्यादित होता. इलेक्ट्रिक […]Read More

देश विदेश

अमेरिकेतील सर्व चलनी नोटांवर असणार ट्रम्प यांची स्वाक्षरी

वॉशिंग्टन, दि. २८ : अमेरिकेच्या चलनी नोटांवर आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी असणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेच्या वित्त विभागाकडून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, येत्या काही महिन्यांत नव्या नोटा चलनात येतील. अमेरिकेत १८६० च्या दशकानंतर कागदी चलनाच्या डिझाइनमध्ये अनेक बदल झाले, पण अध्यक्षांची थेट सही नोटांवर देण्याची पद्धत कधीच वापरली गेली […]Read More

ऍग्रो

पशुपालकांना देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये महत्त्वाचे बदल

मुंबई,दि. २८ : गेल्या वर्षी जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जनावरांचे मृत्यू व गोठ्यांचे नुकसान झाले. यासाठी राज्य सरकारने मदत योजनेत महत्त्वाचे बदल करून सर्व पशुपालकांना सरसकट मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आधी नियमांमुळे वगळले गेलेले शेतकरीही आता मदतीस पात्र ठरणार आहेत. या निर्णयामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार […]Read More

महानगर

जागतिक जलदिन 2026 कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई प्रतिनिधी म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन, मुंबई यांच्या वतीने *जागतिक जलदिन 2026 निमित्त विशेष कार्यक्रम जुहू येथील हॉटेल रामाडा प्लाझा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये पाणी कसं मौल्यवान आहे याबद्दल विविध नामवंतांनी आपले विचार प्रगट केले.या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध वास्तुविशारद चंद्रशेखर प्रभू उपस्थित होते. त्यांनी महापालिकेतील अभियंत्यांना मार्गदर्शन करताना स्वयंपूर्ण विकास व […]Read More

महानगर

न्याय आणि समतोल तपासाची गरज राष्ट्रीय पुरुष आयोगाची भूमिका

मुंबई प्रतिनिधी : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पुरुष आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, महिलांच्या सुरक्षेचा आणि सन्मानाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असून त्यात कुठलीही तडजोड होऊ शकत नाही; मात्र कोणत्याही व्यक्तीवर आरोप करताना पुरावे आणि तपास यालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. संमती आणि जबरदस्ती यामध्ये स्पष्ट फरक आहे. न्यायालयांनी […]Read More

राजकीय

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात ठाणे जिल्हा परिषद राज्यात तृतीय

ठाणे, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील विविध शासकीय कार्यालयांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यात आले असून, जिल्हा परिषद ठाणे यांनी राज्यात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या पार्श्वभूमीवर आज, दिनांक २८ मार्च, २०२६ रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह, मलबार हिल येथे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते […]Read More