mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

इराणच्या 5 महिला फुटबॉलपटूंना ऑस्ट्रेलियात आश्रय

मेलबर्न, दि. १० : आशियाई कपमधून बाहेर पडल्यानंतर इराणच्या महिला फुटबॉल संघातील पाच खेळाडूंना ऑस्ट्रेलियाने मानवतावादी व्हिसा देऊन आपल्या देशात राहण्याची परवानगी दिली आहे. गेल्या आठवड्यात दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी इराणच्या संघाने आपले राष्ट्रगीत गायले नव्हते. यानंतर त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. रविवारी गोल्ड कोस्ट स्टेडियमबाहेर शेकडो लोकांनी संघाच्या समर्थनार्थ “सेव्ह अवर गर्ल्स” […]Read More

ट्रेण्डिंग

सुनेत्रा पवारांनी महिलांसाठी सुरू केली विशेष सवलत

मुंबई, दि. १० : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विधान परिषदेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ (लवकर या-लवकर जा) ही विशेष योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेअंतर्गत मुंबई महानगरातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांना सकाळी ९.१५ ते ९.४५ या वेळेत […]Read More

महाराष्ट्र

जिष्णु देव वर्मा यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ

मुंबई दि १० : त्रिपुरा येथील माणिक्य राजघराण्यातील सदस्य व तेलंगणाचे माजी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी जिष्णु देव वर्मा यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]Read More

शिक्षण

RTE प्रवेशासाठी विद्यार्थांना न्यायालयाकडून दिलासा

मुंबई, दि. १० : RTE प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारने लादलेली एक किलोमीटर अंतराची किचकट अट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगित केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, या अटीमुळे ज्या पालकांना अर्ज भरता आले नव्हते, त्यांच्यासाठी उच्च न्यायालयाने अर्जाची मुदत ३ दिवसांनी वाढवून दिली […]Read More

देश विदेश

देशातील अनेक राज्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद, हॉटेल व्यवसाय

नवी दिल्ली, दि. १० : इराणच्या हॉर्मुझ जलमार्गातून होणारा गॅस पुरवठा ठप्प झाल्यानंतर भारत सरकारने आता देशभरात ‘अत्यावश्यक वस्तू कायदा 1955’ लागू केला आहे. हे पाऊल उचलले आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांनी व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर सध्या बंदी घातली आहे. या बंदीमुळे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स बंद होण्याची […]Read More

देश विदेश

नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठी ‘अत्यावश्यक वस्तू कायदा’ लागू

नवी दिल्ली, दि. १० : अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज (दि.१०) Essential Commodities Act, 1955 (आवश्यक वस्तू कायदा) लागू केला आहे. नैसर्गिक वायू आणि एलपीजीचा पुरवठा खंडित होऊ नये तसेच घरगुती गॅस उपलब्धता कायम राहावी, यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार, नैसर्गिक वायूचा […]Read More

महानगर

पालिका क्षेत्रातील गायरान जमिनी आता शासनाच्या ताब्यात

मुंबई, दि. ९ : राज्यातील नगरपरिषदा आणि महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे पावणे आठ हजार हेक्टर इतक्या गायरान जमिनी संबंधित पालिकांना सार्वजनिक प्रयोजनांच्या वापरासाठी देणेकामी शासनाकडे हस्तांतरित करण्यासाठीचे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झाले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत हे विधायक मांडले होते. या सुधारणा विधेयकात नमूद केल्याप्रमाणे महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमीन आरक्षण उठवले जाणार […]Read More

ट्रेण्डिंग

आता 25 दिवसांनंतरच बुक करता येईल गॅस सिलिंडर

मुंबई, दि. 9 : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे घरगुती गॅस सिलिंडरचे दर तब्बल 60 रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच आता गॅस मिळण्यासाठी अधिक प्रतिक्षा करावी लागणार आहे. केंद्र सरकारने घरगुती एलपीजी सिलेंडरच्या रिफिल बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केला आहे. आता ग्राहक एक सिलेंडर बुक केल्यानंतर दुसरा सिलेंडर 21 दिवसांऐवजी 25 दिवसांनंतरच […]Read More

पर्यावरण

मुरबे बंदर प्रकल्पाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह

पालघर, दि. ९ : पालघरच्या किनारपट्टीवर प्रस्तावित ‘मुरबे मल्टिकार्गो बंदरा’च्या पर्यावरणीय परिणाम अहवालातील (EIA) गंभीर त्रुटी आता केंद्र सरकारच्या स्तरावर उघड झाल्या आहेत. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या केंद्र सरकारच्या तज्ज्ञ मूल्यमापन समितीच्या (EAC) ४३६ व्या बैठकीत या प्रकल्पाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. समितीने प्रकल्पाच्या अहवालात तब्बल २० गंभीर त्रुटी नोंदवत प्रस्तावाला सध्या स्थगिती […]Read More

मनोरंजन

बहुचर्चित ‘ लाडकी बहीण ‘ योजनेवर येतोय चित्रपट

मुंबई, दि. ९ : महाराष्ट्र राज्य सरकारच्या बहुचर्चित ‘ लाडकी बहीण ‘ योजनेची गोष्ट आता रूपेरी पडद्यावर येणार आहे. लाडकी बहीण’ या नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिला दिनाच्या निमित्तानं ही घोषणा करण्यात आली. ‘१५०० रुपये हप्ता आमच्या संसारात लाखापेक्षा भारी’ अशी टॅगलाइन असलेल्या या सिनेमात अभिनेत्री स्मिता तांबे मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबत सुरेखा […]Read More