mmcnews mmcnews

खान्देश

सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू….

नाशिक दि ११ : जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पंचाळे -शहा रस्त्यावर रात्री दोन वाजेच्या सुमारास ट्रक व पिकअप यांच्यात जोरदार धडक होऊन पिकप कार पेटली. यात दोन महिला व दोन पुरुष यांचा होरपळून मृत्यू झाला. पंचाळे येथून काहीजण पिकअप गाडीने जागरण गोंधळासाठी गेल्याची समजते रात्री परत येत असताना पंचाळे- शहा रस्त्यावर पंचाळे गावापासून दोन […]Read More

मराठवाडा

मराठवाड्यात भूकंपाचा धक्का, नागरिक भयभीत ….

हिंगोली दि ११ : मराठवाडा परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी 8 वाजून 47 मिनिटांनी हिंगोली जिल्ह्यात भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 इतकी नोंदवली गेली आहे. अचानक बसलेल्या या धक्क्यामुळे नागरिक काही काळ घराबाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा […]Read More

मनोरंजन

‘अबब विठोबा बोलू लागला ’ प्रसिद्ध बालनाट्य पुन्हा रंगभूमीवर

मुंबई, दि. 10 : एकेकाळी गाजलेलं आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारं ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे लोकप्रिय बालनाट्य पुन्हा एकदा रंगभूमीवर धम्माल करायला सज्ज झालं आहे. हे नाटक प्रामुख्याने सुधा करमरकर (बालरंगभूमीच्या जननी) यांच्या तालमीत तयार झालेले असून, बालकलाकारांसाठी एक उत्तम संस्कारक्षम नाटक म्हणून ओळखले जाते. एका छोट्या मुलाचा विठ्ठलाशी असलेला संवाद, प्रेम आणि भाबडेपणा यावर […]Read More

ट्रेण्डिंग

रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच

मुंबई, दि. 10 : रॉयल एनफील्डने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक ‘फ्लाइंग फ्ली C6’ लॉन्च केली आहे. तिची एक्स-शोरूम किंमत ₹2.79 लाख आहे. तथापि, कंपनीने ‘बॅटरी एज अ सर्विस’चा पर्याय देखील दिला आहे. या मॉडेल अंतर्गत बाईकची किंमत कमी होऊन ₹1.99 लाख होईल. या इलेक्ट्रिक बाईकची बुकिंग आणि टेस्ट राइड आज 10 एप्रिलपासून सर्वात आधी बंगळुरूमध्ये […]Read More

कोकण

कोकणासाठी ४ वातानुकूलित विशेष रेल्वेगाड्या

मुंबई, दि. १० : उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने कोकण मार्गावर ४ वातानुकूलित विशेष सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेगाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि मडगाव स्थानकांदरम्यान धावतील. उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणात गावी आणि पर्यटनाकरिता नागरिक मोठ्या संख्येने जातात. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला […]Read More

ट्रेण्डिंग

10 हजारांवरील UPI पेमेंटवर लागेल एक तासाचा ‘ब्रेक’

मुंबई, दि. 10 : RBI ने ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी आता महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यांना ५ सूत्री सुरक्षा योजना मांडली आहे. RBI नवीन सुरक्षा उपाययोजना लागू करण्याच्या तयारीत आहे. प्रस्तावित नियमांनुसार, 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचे ऑनलाइन व्यवहार तात्काळ पूर्ण करण्याऐवजी एका तासापर्यंत थांबवले जाऊ शकतात. या वेळेत ग्राहक इच्छित असल्यास व्यवहार रद्द देखील करू […]Read More

ट्रेण्डिंग

आसाम आणि पुदुचेरीमध्ये इतिहासातील सर्वाधिक मतदानाची नोंद

मुंबई,दि. 10 : भारतातील विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत आसाम, केरळ आणि पुदुचेरी या दोन राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला आहे. या तिन्ही ठिकाणी मतदानाचे जुने सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. निवडणूक आयोगाने अद्याप अंतिम आकडेवारी जाहीर केली नसली, तरी आतापर्यंतची ही टक्केवारी लोकशाहीसाठी अत्यंत आश्वासक मानली जात आहे. आसाम, केरळ आणि पुदुचेरी येथील […]Read More

आरोग्य

मुंबई बसून डॉक्टरांनी केले ओमानमधील महिलेचे रोबोटिक किडनी ऑपरेशन

मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाने जागतिक आरोग्य दिन २०२६ रोजी एक मोठे यश संपादन केले आहे. रुग्णालयाचे डॉक्टर टी. बी. युवराजा यांनी मुंबईत बसून ओमानमधील मस्कत येथील मेडिकल सिटी रुग्णालयात ५५ वर्षीय महिलेचे रोबोटिक किडनी ऑपरेशन केले. ही सीमापार रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया भारतातून पहिल्यांदाच करण्यात आल्याचे मानले जात आहे. ही शस्त्रक्रिया प्रगत ‘मेडबॉट ट्युमाई’ रोबोटिक […]Read More

मनोरंजन

आता OTT वर धडकणार ‘धुरंधर 2’

मुंबई, दि. ९ : गेले २१ दिवस धुरंधर २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. हा सिनेमा सर्वात कमी वेळात १००० कोटींचा नेट आकडा गाठणारा एकमेव भारतीय चित्रपट ठरला आहे. धुरंधर २ ने जागतिक पातळीवर १६६० कोटींहून अधिक कलेक्शन केले असून भारतात त्याने १२०० कोटींचा गल्ला पार केला आहे. कित्येकांनी हा सिनेमा एकपेक्षा जास्त वेळा […]Read More

आरोग्य

राज्यातील सर्व जिल्ह्यांत एका फोनवर हजर होणार फिरते रुग्णालय

मुंबई, दि. ९ : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या नवीन रुग्णवाहिका दाखल होणार आहेत. 108 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करताच या रुग्णवाहिका रुग्णांच्या दारात हजर होतील. राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहर असो वा दुर्गम गाव, प्रत्येक ठिकाणी गरजूंना रुग्णवाहिकेची सेवा वेळेत मिळावी असा सरकारचा प्रयत्न आहे. या […]Read More