mmcnews mmcnews

पर्यटन

भारतीयांच्या कैलास मानससरोवर यात्रेत नेपाळचा अडथळा

नेपाळने भारतीयांच्या कैलास मानससरोवर यात्रेवर अडथळा आणला आहे. कारण भारताने जून–ऑगस्ट २०२६ दरम्यान लिपुलेख मार्गाने यात्रा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली असून, नेपाळचा दावा आहे की हा मार्ग त्यांच्या भूभागात येतो. त्यामुळे काठमांडूने भारत आणि चीन दोघांकडे औपचारिक आक्षेप नोंदवले आहेत. नेपाळचा आक्षेपलिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी हे भाग महाकाली नदीच्या पूर्वेला असल्याने नेपाळच्या भूभागात येतात, […]Read More

पर्यावरण

नवी मुंबई मनपाने केली वेस्ट प्लॅस्टीकपासून मजबूत बाकड्यांची निर्मिती

नवी मुंबई : नवी मुंबईत कचऱ्यातील प्लास्टिकचा पुनर्वापर करून पर्यावरणपूरक बाकडे तयार करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. गॅलक्सी सरफॅक्टंट्स लिमिटेड आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या या मजबूत प्लास्टिक बाकड्यांचे लोकार्पण आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या आठ महिन्यांपासून शहरातील कचऱ्यातील प्लास्टिक वेगळे […]Read More

अर्थ

UAE पडला OPEC मधून बाहेर

अबुधाबी, दि. ४ : संयुक्त अरब अमिरातीने (UAE) खनिज तेल उत्पादक देशांची बलाढ्य संघटना असलेल्या ‘ओपेक’ (OPEC) आणि ‘ओपेक प्लस’मधून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. युएई आता स्वतंत्रपणे तेलाचे उत्पादन आणि वितरण करणार आहे. UAE 1967 पासून ओपेकचा सक्रिय सदस्य होता. मात्र, गेल्या काही काळापासून युएई आणि सौदी अरेबिया यांच्यात तेल उत्पादनाच्या मर्यादेवरून मतभेद […]Read More

पर्यटन

राणीच्या बागेत होणार रॉयल बंगाल वाघाचे आगमन

मुंबई, दि. ४ : राणीच्या बागेच्या प्राणीवैभवात आता बंगालच्या रॉयल वाघाचा समावेश होणार आहे. नागपूर येथील गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाने भायखळा येथील वीरमाता जिजामाता भोसले उद्यान वनस्पती व प्राणीसंग्रहालयास वाघाची जोडी देण्याची तयारी दर्शवली आहे. गोरेवाडा प्राधिकरणाकडून राणी बागेला रॉयल बंगाल टायगरची जोडी देण्यासाठी केंद्रीय प्राधिकरणाला पत्रव्यवहार केला असून लवकरच केंद्रीय प्राधिकरणाची मंजुरी मिळेल, असा विश्वास राणी […]Read More

राजकीय

बंगालमध्ये अखेर भाजपकडून दीदींचा ‘ खेला ‘

कोलकाता, दि. ४ : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. भाजपने २०६ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले, तर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) फक्त ८१ जागांवर थांबली. भवानिपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी यांना सुवेंदु अधिकारी यांनी पराभूत केले. या विजयाबाबत पंतप्रधा नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर […]Read More

राजकीय

तामिळनाडू,केरळमध्ये सत्ताबदल, पुद्दुचेरित भाजपा पुन्हा सत्तेत

नवी दिल्ली. दि. ४ : तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत मोठे राजकीय बदल झाले आहेत. तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या पक्षाने (TVK) पहिल्याच निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला, केरळमध्ये काँग्रेस-आघाडी (UDF) ने डाव्या आघाडीचा पराभव करून सत्ता मिळवली, तर पुद्दुचेरीत एन. रंगासामी यांच्या AINRC-नेतृत्वाखालील एनडीएने पुन्हा विजय मिळवला. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय […]Read More

देश विदेश

आसाममध्ये भाजपची हॅट्रिक

दिसपूर, दि. ४ : आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवून विजयाची हॅट्रिक नोंदवली आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवले असून भाजपने १०० पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. एकूण १२६ जागांपैकी बहुमतासाठी ६४ जागांची गरज होती, मात्र भाजप-एनडीएने १०० हून अधिक जागा मिळवून प्रचंड आघाडी घेतली. काँग्रेस आघाडीला २० […]Read More

महानगर

‘सेल्फी’ साठी कनेक्टिंग लिंकवर थांबू नका; सीसीटीव्हीची नजर

मुंबई, दि. ३ : यशवंतराव चव्हाण मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक ( मिसिंग लिंक ) लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो, घेण्यासाठी वाहन चालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रुतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून वाहनधारकांसाठी अपघाताचा धोका असल्याने ते टाळावे, असे आवाहन […]Read More

महानगर

दीनदयाल सेवा प्रतिष्ठानला मानकर ट्रस्ट चा ‘कर्मयोगी पुरस्कार’ प्रदान

मुंबई दि. ३ : स्वातंत्र्यप्राप्तीला अनेक दशके उलटून गेल्यानंतरही विकासापासून वंचित राहिलेला पारधी समाज तसेच नापिकी, कर्जबाजारीपण मुळे त्रस्त शेतकरी बांधवांच्या उत्थानासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी करीत असलेल्या कार्याकरिता यवतमाळच्या दीनदयाल सेवा प्रतिष्ठानला कै. लक्ष्मणराव मानकर संस्थेचा ‘कर्मयोगी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. शाल, सोनचाफ्याची परडी, स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि दोन लक्ष रुपयांचा धनादेश या स्वरूपातील […]Read More

ट्रेण्डिंग

दिवसाच्या वीजवापरात ७० लाख ग्राहकांना २२३५ कोटी रुपयांचा लाभ

मुंबई, दि. ०३ : राज्यातील वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीजवापरासाठी टीओडी (टाइम ऑफ डे) सवलत जुलै २०२५ मध्ये लागू केल्यापासून आतापर्यंत ७० लाख ग्राहकांना एकूण २२३५ कोटी रुपयांचा लाभ झाला असून त्यामध्ये १५,९०७ उच्चदाब औद्योगिक ग्राहक एकूण १५३४ कोटी रुपयांच्या लाभासह प्रथम स्थानावर आहेत, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली. विजेचा […]Read More