mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

पेट्रोल, डिझेल महागले

मुंबई, दि. १४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल- डिझेलचा वापर कमी करा असा सल्ला मागील आठवड्यातच दिला होता. त्यावेळीच लवकरच इंधनाचे दर वाढणार असल्याचे सुतोवाच झाले होते. उन्हाळ्याच्या झळांनी त्रासलेल्या आणि सिलिंडर टंचाईने ग्रासलेला नागरिकांना आजपासून पेट्रोल डिझेलच्या महागाईची झळही बसणार आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रति ३ रूपयांनी वाढ करण्यात […]Read More

ट्रेण्डिंग

 रेल्वे बुकिंगचा 40 वर्षे जुना नियम बदलणार

मुंबई, दि. १४ : गेल्या चार दशकांपासून सुरु असलेल्या रेल्वे तिकिटाच्या नियमांमध्ये भारतीय रेल्वेने बदल केले आहे. यामध्ये प्रवाशांचा तिकिट बुकिंगचे नियम सर्वात महत्त्वाचे म्हणजे बदलणार आहे. आतापर्यंत आपण 40 वर्षे जुने म्हणजे 1986 सालापासून सुरु असलेल्या नियमानुसार तिकिट बुकिंग करत होतो. ही प्रणाली इटॅनियम सर्व्हर आणि ओपनव्हीएमएस तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे आता कालबाह्य झाले […]Read More

ट्रेण्डिंग

भाडेकरुने घरमालकाची शांतता भंग करणे हा ‘उपद्रव’ : उच्च न्यायालय

मुंबई, दि. 14 : मुंबई : पुण्यातील बुधवार पेठ भागातील श्रीराज लॉज चालवणाऱ्या भाडेकरूला उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. लॉजमधील ग्राहकांमुळे होणाऱ्या उपद्रवाचा आणि त्रासाचा विचार करून न्यायालयाने संबंधित लॉज तीन महिन्यांत रिकामे करून त्याचा ताबा मालकाकडे देण्याचे आदेश दिले. एखादा भाडेकरू शेजारी राहणाऱ्या मालकाच्या खासगी जीवनात व मानसिक शांततेत बाधा आणणारा व्यवसाय करत असेल […]Read More

सांस्कृतिक

भंडारा उधळण्याबाबत जेजुरी गडावर नवीन नियम लागू

पुणे, दि. १४ : जेजुरीत भंडाऱ्यामुळे आग लागण्याच्या घटना आणि भेसळीच्या तक्रारी पाहता, भाविकांच्या आरोग्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे जेजुरीतील भंडाऱ्यासाठी विशेष धोरण निश्चित केले जाणार असून, त्यात शुद्धता आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. जेजुरी आणि इतर देवस्थानांच्या ठिकाणी विकला जाणारा ‘हळद भंडारा’ […]Read More

राजकीय

१६ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांत SIR जाहीर

नवी दिल्ली, दि. १४ : भारत निवडणूक आयोगानं एसआयआरचा तिसरा टप्पा जारी केला आहे. या तिसऱ्या टप्प्यात 16 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रात एसआयआरची प्रक्रिया 20 जूनपासून सुरु होईल ती प्रक्रिया 7 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर पूर्ण होणार आहे.एसआयआरचा तिसरा टप्पा 20 मे पासून […]Read More

ऍग्रो

साखरेच्या निर्यातीवर तत्काळ प्रभावाने संपूर्ण बंदी

नवी दिल्ली, दि. १४ : केंद्र सरकारने देशातून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने संपूर्ण बंदी घातली आहे. ही बंदी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहील. देशांतर्गत साखरेच्या किमती कोणत्याही परिस्थितीत नियंत्रणाबाहेर जाऊ नयेत, अशी सरकारची इच्छा आहे. एल निनोमुळे मान्सूनबाबत अनिश्चितता कायम आहे. प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये उसाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे, […]Read More

ऍग्रो

हनी ट्रॅपींगमध्ये शेतकऱ्याने गमावले ७० लाख

अमरावती, दि. १३ : प्रेमाने गोड बोलून लोकांना लुबाडण्याचे म्हणजेच हनी ट्रॅपिंगचे प्रकार आता शहरांरोबर गावांतही येऊन पोहोचले आहे. अमरावती जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकऱ्यांला हनी ट्रॅप करून तब्बल ७० लाख रुपये लुबाडण्यात आले आहेत. केवळ 10 हजार रुपयांच्या एका साध्या मदतीपासून सुरू झालेला हा व्यवहार अखेर 70 लाखांच्या खंडणीवर जाऊन थांबला असून, या प्रकरणी एका […]Read More

पर्यटन

नाणेघाटात सुरू होतेय ‘डिजिटल वारसा प्रवास’

कल्याण, दि. १३ : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, मुंबई मंडळातर्फे १८ मे रोजी नाणेघाट येथे ‘ऑडिओ गाइड टूर’ आणि ‘नाणेघाट पास ट्रान्सफॉर्मेशन’ प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. प्राचीन काळातील प्रमुख व्यापारी मार्ग असलेला नाणेघाट आता पर्यटकांना डिजिटल स्वरूपात आपला इतिहास सांगणार आहे. यामुळे ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञान घडणार आहे. ‘प्राचीन व्यापार मार्गापासून डिजिटल हेरिटेज […]Read More

देश विदेश

ताफा सोडून पंतप्रधान मोदींचा फक्त २ गाड्यासह प्रवास

नवी दिल्ली, दि. १३ : आयातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच देशवासियांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानंतर विरोधकांकडून पंतप्रधानांनी स्वत: हे आमलात आणावे अशी मागणी विरोधकांकडून होत होती. याला चोख प्रत्युत्तर देत आज पंतप्रधानांनी ताफा टाळून फक्त २ गाड्यांसह प्रवास केल्याचे दिसून आले. पंतप्रधानांच्या ताफ्यात […]Read More

ऍग्रो

केंद्राकडून १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ

नवी दिल्ली, दि. १३ : खरीप हंगाम २०२६-२७ साठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत अर्थात MSP मध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी किफायतशीर भाव मिळावा, यासाठी सरकारने २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ केली आहे. MSP दर पुढीलप्रमाणे : मागील वर्षाच्या तुलनेत किमान आधारभूत किमतीत […]Read More