नवी दिल्ली, दि. ३१ : देशातील राज्यांमध्ये पुरूषांपेक्षा महिलांचं दारू पिण्याचे सर्वाधिक प्रमाण हे अरुणाचल प्रदेश या राज्यात अधिक आहे. येथील जवळपास 24.2% महिला दारू पितात. दारू येथील संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. येथील लोकांची ही खास प्रथा आहे. येथे ‘अपोन्ग’ म्हणजे तांदळापासून तयार केलेली बिअर पिण्याची प्रथा आहे. तर त्यानंतरचे राज्य हे सिक्किम आहे. […]Read More
मुंबई, दि. ३१ : मुंबई जवळील जागगतिक वारसा स्थळ असलेल्या एलिफंटा बेटावर (घारापुरी) इतिहासाचा एक अनमोल ठेवा सापडला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) केलेल्या उत्खननात सुमारे 1500 वर्षांपूर्वीची दगडी बांधकामातील जलसंधारण रचना सापडली आहे. टी-आकाराचा हा पायऱ्यांचा जलसाठा (स्टेप्ड रिझर्व्हॉयर) पाहून पुरातत्व शास्त्रज्ञही थक्क झाले असून, यामुळे प्राचीन काळातील प्रगत जलव्यवस्थापन तंत्रावर नवा प्रकाश […]Read More
मुंबई, दि. ३१ : धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने जागतिक स्तरावर 1,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, या यशानंतर आता एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. पाकिस्तानातील कराचीमधील ल्यारी भागातील रहिवाशांनी चित्रपटाच्या कमाईत आपला वाटा असावा, अशी अजब मागणी लावून धरली आहे. काही स्थानिकांनी तर चित्रपटाच्या एकूण कमाईपैकी 80 टक्के हिस्सा ल्यारीच्या विकासासाठी देण्याचे […]Read More
नवी दिल्ली, दि. ३१ : केंद्र सरकारने भारत-यूएई मुक्त व्यापार करार, CEPA, अंतर्गत सोन्याच्या आयातीसाठी जारी करण्यात येणाऱ्या टॅरिफ रेट कोटा किंवा TRQ परवान्यांची अंतिम मुदत वाढवली आहे. याआधी 31 मार्च 2026 रोजी मुदत संपणाऱ्या TRQ परवान्यांना आता 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे. भू-राजकीय संकटामुळे आयातदार या कोट्याचा पूर्णपणे वापर करू शकले […]Read More
मुंबई, दि. 31 : महाराणी ताराराणी या जैन समुदायच्या होत्या, असं वक्तव्य जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केल्याने वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईतील जैन समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसागर म्हणाले की, मोहम्मद […]Read More
छ. संभाजीनगर, दि. ३१ : छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकीस्तानी सौंदर्य प्रसाधमांची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातल्या विविध ठिकाणी ही विक्री सुरु होती. या अवैध विक्रिची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत चार दुकानांवर धाड टाकली आहे. यामध्ये पोलिसांनी तीन जणांना अटकही केली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांच्या दक्षतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे. संबंधित आरोपींवर व्यावसाय […]Read More
मुंबई, दि. २८ :.राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन पोर्टल, वन वेब ॲड्रेस’ ही महत्त्वाकांक्षी संकल्पना पुढे आणली असून त्याअंतर्गत ‘महासारथी’ (MahaSarathi) पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामुळे विविध शासकीय सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होऊन नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा मिळणार आहेत. […]Read More
मुंबई, दि. २८ : राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या अनेक प्रकल्पांमुळे भूसंपादनाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा वेगवान निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यात ५७ नवीन लवादांची नियुक्ती केली असून, यामुळे अनेक वर्षांपासून मोबदल्याविना रखडलेले २८ हजारांहून अधिक प्रकल्पग्रस्तांचे दावे आता जलदगतीने निकाली निघणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन यासाठी विशेष […]Read More
नोएडा, दि. 28 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी उत्तर प्रदेशातील जेवर येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हे सध्या भारतातील सर्वात मोठे आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे विमानतळ आहे. 4 टप्पे पूर्ण झाल्यावर हे आशियातील सर्वात मोठे विमानतळ बनेल. पंतप्रधान मोदींनी जनसभेदरम्यान लोकांना इस्रायल-अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटाशी एकजुटीने […]Read More
मुंबई, दि. 28 : एकेकाळी जगातील सर्वात मोठी मोबाइल कंपनी असलेल्या नोकियाने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी जगभरात तब्बल 14 हजार कर्मचाऱ्यांना कमी करणार असून याचा थेट परिणाम भारतावरही होणार आहे. भारत नोकियासाठी महत्त्वाचा बाजार असून येथे 17 हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात. जागतिक कपातीमुळे अनेक भारतीय कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे. कंपनीची भारतातील […]Read More