mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

या राज्यात ९ दिवस मद्यविक्रीवर बंदी

कोलकाता, दि. २१ : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मद्यबंदीच्या आदेशामुळे राजकीय आणि व्यापारी वर्तुळात नवा वाद पेटला आहे. विशेष म्हणजे, ज्या भागात पहिल्या टप्प्यात मतदान नाही, तिथेही मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नव्या आदेशानुसार, 20 एप्रिलपासूनच राज्यात मद्यविक्री आणि सेवा देण्यावर निर्बंध लागू झाले आहेत. 23 […]Read More

मराठवाडा

‘लातूर पॅटर्न’चे शिल्पकार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन

लातुर, दि. २१ : लातूरमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाची छाप सोडणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे सर्वेसर्वा आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. डॉ. गोपाळराव पाटील हे मूळचे बालरोगतज्ज्ञ होते. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करताना अनेक रुग्णांना आधार दिला. विशेषतः ग्रामीण भागातील गरीब रुग्णांसाठी ते ‘देवदूत’ ठरले होते. […]Read More

महानगर

मराठी सक्तीच्या विरोधात 15 लाख रिक्षाचालक जाणार संपावर

मुंबई, दि. 21 : 1 मे पासून राज्यातील रिक्षावाल्यांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात आले असून भाषा न आल्यास त्याचा परवाना रद्द होणार आहे. या सक्ती विरोधात आक्रमक भूमिका घेत रिक्षावाल्यांनी संपाचे हत्यार उगारले आहे. मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियन या रिक्षाचालकांच्या सर्वात मोठ्या संघटनेने सरकारच्या या निर्णयाविरोधात बंड पुकारला आहे. 4 मे पासून राज्यातील 15 […]Read More

ट्रेण्डिंग

ओव्हरटाइमसाठी कर्मचाऱ्यांना मिळणार दुप्पट मोबदला

मुंबई, दि. 21 : नवीन लेबर लॉ (New Labour Law) अंतर्गत सरकारने कर्मचाऱ्यांच्या बाजूने मोठा निर्णय घेतला आहे. आता कोणत्याही कर्मचाऱ्याने त्याच्या ठराविक वेळेपेक्षा जास्त काम केल्यास, कंपनीला त्याला ‘डबल वेज’ म्हणजेच सामान्य पगाराच्या दुप्पट दराने पैसे द्यावे लागणार आहेत. कंपन्यांकडून होणारे कर्मचाऱ्यांचे शोषण थांबवण्यासाठी ओव्हरटाइम मोजण्याच्या पद्धतीत मोठे बदल करण्यात आले आहेत. जर तुम्ही […]Read More

ट्रेण्डिंग

खाशाबा जाधवांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याचे न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली, दि. 21 : स्वातंत्र्योत्तर भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ देण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने केंद्र सरकारला याबाबत महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. 4 मे 2026 पूर्वी सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आदेश देत न्यायालयाने या प्रकरणात स्पष्ट भूमिका घेतली […]Read More

ऍग्रो

देशातील खत उत्पादनात २५% घट

नवी दिल्ली, दि. २१ : इराण युद्धामुळे मार्च महिन्यात भारताच्या खत उत्पादनात जवळपास एक चतुर्थांश घट झाली. वाणिज्य मंत्रालयाच्या मते, मार्च २०२५ च्या तुलनेत मार्च २०२६ मध्ये खत उत्पादनात २४.६% घट झाली. खत उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर मध्य-पूर्वेतील युद्धाचा परिणाम झाला आहे. भारताच्या शेतीसाठी महत्त्वाचे असलेले युरिया खत तयार करण्यासाठी नैसर्गिक वायूचा वापर […]Read More

ट्रेण्डिंग

युद्धामुळे झालेल्या नुकसानासाठी UAE ने अमेरिकेकडे मागितली आर्थिक गॅरंटी

अबूधाबी, दि. २१ : इराण विरोधात अमेरीका आणि इस्राइलने पुकारलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. याची भरपाई आता अमेरिकेला करावी लागणार आहे. UAE ने युद्धासाठी अमेरिकेला जबाबदार धरलं आहे. युद्धाची सुरुवात अमेरिकेनं केलेली असल्यानं त्यांनीच युद्धाचा खर्च उचलावा, अशी मागणी यूएईनं केली आहे. २८ फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या युद्धात आखाती देशांचं प्रचंड नुकसान झालं […]Read More

मनोरंजन

स्मार्टफोनमध्ये होणार हे महत्त्वाचे बदल

मुंबई, दि.२० : गेल्या काही वर्षांपासून कंपन्यांनी मोबाईलमध्ये बदलू शकणारी बॅटरी देणं बंद केलं आहे. म्हणजे एखाद्याची इच्छा असेल तरी ते बॅटरी बदलू शकत नव्हते. 2027 ला नियम लागू झाल्यानंतर कंपन्यांना असे मोबाईल तयार करावे लागतील ज्याची बॅटरी सहजपणे बदलता येईल. याशिवाय फोनमध्ये अशी बॅटरी द्यावी लागेल जी जास्त काळ चालेल आणि जास्त चार्ज सायकलला […]Read More

महानगर

या दिवशी मुंबई विमानतळ 6 तास बंद राहणार

मुंबई, दि. २० : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) 7 मे 2026 रोजी धावपट्टीच्या देखभालीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या नियोजित कामामुळे 7 मे रोजी सकाळी 11:00 ते संध्याकाळी 17:00 या सहा तासांच्या कालावधीत विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या बंद राहतील. या वेळेत विमानांची उड्डाणे आणि लँडिंग पूर्णपणे थांबवण्यात येईल. पावसाळ्यात कोणताही धोका निर्माण होऊ […]Read More

अर्थ

RBI ने हटवले रुपयाच्या व्यापारावरील निर्बंध

नवी दिल्ली, दि. २० : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने 20 एप्रिल रोजी रुपयाची अस्थिरता रोखण्यासाठी परकीय चलन डीलर्स (फॉरेक्स डीलर्स) वर लादलेले काही निर्बंध मागे घेतले आहेत. आता डीलर्स ऑफशोर नॉन-डेलिवरेबल फॉरवर्ड मार्केट (NDF) मध्ये पुन्हा पोझिशन्स घेऊ शकतील. RBI ने हे पाऊल उचलण्यापूर्वी काही दिवसांपूर्वीच गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी संकेत दिले […]Read More