mmcnews mmcnews

महानगर

उपनगर पालकमंत्री एँड आशिष शेलार यांनी मध्य रेल्वेच्या ट्रॅक मध्ये

मुंबई, दि 31 पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होणार नाही यासाठी समन्वयाने काम करा, ब्लेम गेम करीत बसू नका, मान्सून पुर्व कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री तथा राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज दिले. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भांडूप दरम्यान उपनगरीय रेल्वेतून प्रवास करुन […]Read More

राजकीय

पागडीच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा प्रश्न येत्या एक-दीड महिन्यात मार्गी

पागडीच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा प्रश्न येत्या एक-दीड महिन्यात मार्गी मुंबई दि ३१– स्वयंपुनर्विकास म्हणजे फार मोठी टेक्नॉलॉजी नाही. विकासकावर अवलंबून न राहता रहिवाशांनी स्वतःची इमारत स्वतः उभी केली पाहिजे. दक्षिण मुंबईतील पागडीच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा प्रश्न येत्या एक-दीड महिन्यात मार्गी लावू, असा शब्द भाजपा विधानपरिषद गटनेते तथा मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या २,६५२ सरकारी बहिणी ठरल्या अपात्र

मुंबई, दि. ३१ : राज्य सरकारने मोठ्या उत्साहाने आणलेल्या लाडकी बहिण योजनेमुळे राज्यातील लाखो माताभगिनींना आर्थिक आधार मिळत आहे, हे खरे असले तरीही अनेकजण याचा गैरफायदा घेतानाही दिसून येत आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली होती. या योजनेत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख […]Read More

राजकीय

कृषीमंत्री म्हणतात, कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी

पुणे, दि. ३१ : राज्यभरातील शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठे नुकसान झालेले असताना त्यांना मदतीचा हात देण्या ऐवजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे बेताव विधाने करत असल्याने संताप व्यक्त होत आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतमालाच्या प्रचंड नुकसानीनंतर शेतकरी मदतीच्या अपेक्षेने सरकारकडे पाहतोय. नुकत्याच सिन्नर दौऱ्यात त्यांनी नुकसानग्रस्त शेती पाहताना “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर […]Read More

कोकण

केतकीबनाचा विध्वंस ठरतोस विनाशकारी वादळास कारण

दापोली, पाडले दि. ३१ ( प्रबोध लिमये ) : पाच वर्षांपूर्वी झालेल्या निसर्ग निसर्गचक्रीवादळातून कोकण किनारट्टीवरील शेतकरी नुकतेच सावरू लागले आहेत. मात्र दापोली तालुक्यातील आडे,पाडले, केळशी, आंजर्ले किनारपट्टीवर शेतकरी बांधवांवर आता दरवर्षीच अल्पकालिन परंतु अत्यंत विनाशकारी वादळाची टांगती तलवार आहे. चार दिवसांपूर्वी काही मिनिटांसाठीच झालेल्या भयंकर वादळाने पाडले गावातील अनेकांच्या घरांचे छप्पर उडून गेले आहे […]Read More

ट्रेण्डिंग

पर्यावरणतज्ज्ञ वाल्मीक थापर यांचे निधन

नवी दिल्ली, ३१ : भारताचे प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ आणि व्याघ्रसंवर्धन कार्यकर्ते वाल्मिक थापर (७३ ) यांचे आज सकाळी निधन झाले. ते गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. आज दुपारी दिल्लीतील लोदी इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. व्याघ्रसंवर्धन क्षेत्रातील योगदानवाल्मिक थापर यांनी पाच दशकांहून अधिक काळ व्याघ्रसंवर्धनासाठी समर्पित केला. त्यांनी राजस्थानच्या रणथंभोर राष्ट्रीय […]Read More

कोकण

स्वतंत्र कोकण राज्य झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही …संजय कोकरे

मुंबई, दि 31स्वतंत्र कोकण राज्य झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशी माहिती स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले स्वप्नातील जनतेच्या आकांक्षा स्वप्निल निराशा या सगळ्या समुद्र विद्यार्थी वैचारिक परंपरांची उभारतेची असली तरी लोकांचे सर्व क्षेत्रात अंध पतन झालेले आहे. […]Read More

राजकीय

“महिला नेतृत्वाची प्रेरणा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई, त्यांचा आदर्श संपूर्ण देशासाठी

मुंबई, दि. ३१ :– पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दीनिमित्त चर्चगेट, मुंबई येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी माजी आमदार आणि समाजसेवक प्रकाश शेडगे, बालहक्क आयोगाच्या माजी अध्यक्ष सुशीबेन शहा, शिवसेना दक्षिण […]Read More

महानगर

पुण्यश्लोक “अहिल्यादेवींवर” नर्मदेचा जलाभिषेक

ठाणे, दि. ३१ :– देशभरातल्या प्रमुख मंदिरांच्या जिर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 300 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. धनगर प्रतिष्ठान व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात असलेल्या अहिल्यादेवी यांच्या मूर्तीवर नर्मदेच्या जलाने अभिषेक करण्यात आला. आहिल्यादेवी यांचे वंशज इंदोरच्या होळकर संस्थानचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील […]Read More

ट्रेण्डिंग

‘दख्खनी राणी’ होणार ९५ वर्षांची, जाणून घ्या तिचा रंजक प्रवास

पुणे, दि. ३१ : मुंबई-पुणे प्रवासाचा ऐतिहासिक आणि प्रतिष्ठेचा दुवा असलेली “डेक्कन क्वीन” एक्सप्रेस उद्या १ जून २०२५ रोजी आपल्या ९६ व्या वर्षात प्रवेश करणार आहे. आपल्या ९५ वर्षांच्या यशस्वी सेवेनंतर, ही ट्रेन अद्याप प्रवाशांच्या मनात अढळ स्थान टिकवून आहे. १ जून १९३० रोजी मुंबई आणि पुणे यांच्यातील दोन प्रमुख शहरांना जोडण्यासाठी “डेक्कन क्वीन” ची […]Read More