mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

गिरिश महाजनांना ‘गेट आऊट’ म्हणणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल

मुंबई, दि. 24 : मुंबईतील वरळी परिसरात भाजपच्या जनआक्रोश मोर्चादरम्यान वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या एका महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांना अडवून त्यांना Get Out अशा शब्दांत खडेबोल सुनावले होते. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने या महिलेविरोधात वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लोकसभेत महिला […]Read More

देश विदेश

आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील सात खासदार भाजपात, पक्षाला धक्का

नवी दिल्ली, दि. २४ : देशभरातील विविध पक्षांच्या आमदार खासदारांना आपल्या गोटात सामील करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भारतीय जनता पक्षाने आज आप पक्षाच्या राज्यसभेतील ७ खासदारांना आपल्या गळाला लावले आहे. आम आदमी पक्षाच्या १० राज्यसभा खासदारांपैकी सात जण भाजपमध्ये सामील होणार आहेत. पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी शुक्रवारी दुपारी ४ वाजता एका पत्रकार परिषदेत ही […]Read More

देश विदेश

ट्रम्प यांचे भारताला नरक द्वार म्हणण्यावर घुमजाव

वॉशिग्टन डीसी, दि. २४ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बेताल वक्तव्य करण्यात माहीर आहेत. त्यात आज त्यांनी भारताबाबत संतापजनक विधान केले आहे. त्यांनी भारताला आधी नरक म्हटलं होतं. त्यावरून ट्रम्प यांच्यावर टीका होऊ लागल्यानंतर नेहमी प्रमाणे घुमजाव करत त्यांनी आता ‘ भारत एक महान देश आहे, त्याच्या प्रमुखपदी माझे चांगले मित्र आहेत’ , असे विधान […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

आषाढी वारीच्या पालखी मार्ग सुविधेत महत्त्वाचे बदल

मुंबई, दि. २४ : पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी देहू, आळंदी व सासवड येथून निघणाऱ्या संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्यांच्या मार्गावरील रस्ते, मुक्कामस्थळे व सुविधा यांचा आढावा घेतला. “पालखी सोहळा हा जगातील सर्वात शिस्तबद्ध धार्मिक सोहळा असून रस्ते, पाणीपुरवठा व आरोग्य सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहता कामा नये. सर्व यंत्रणांनी समन्वयाने […]Read More

अर्थ

या AI मुळे बँकिंग प्रणालीवर सायबर हल्ल्याचा धोका

नवी दिल्ली, दि. २४ : अर्थमंत्री निर्मला सीतारामन बँकांच्या प्रमुखांसोबत आयोजित केलेल्या उच्चस्तरीय बैठकीत अँथ्रोपिकच्या ‘क्लॉड मिथॉस’ Claude Mythos AI मॉडेलमुळे बँकिंग क्षेत्राला होणाऱ्या संभाव्य धोक्यांवर चर्चा करण्यात आली. हे AI मॉडेल इतके प्रगत आहे की हॅकर्स त्याचा वापर दशकांपासूनच्या अज्ञात त्रुटी शोधून आर्थिक क्षेत्रावर सायबर हल्ले करण्यासाठी करू शकतात. अर्थमंत्री सीतारामन यांनी बँकांना त्यांच्या […]Read More

कोकण

आठवड्यातून तीन दिवस दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू सेवा

मुंबई, दि. 24 : उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी मोठी सोय करून ठेवली आहे. रेल्वे प्रशासनाने यंदा प्रथमच उन्हाळी सुट्टीकरिता चिपळूण-दिवा अनारक्षित मेमू स्पेशल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. १ मेपासून ही स्पेशल मेमू कोकणवासियांच्या सेवेत दाखल होणार आहे. आठवड्यातून शुक्रवार, शनिवार आणि रविवारी धावणाऱ्या स्पेशलच्या ७ जूनपर्यंत फेऱ्या धावणार आहेत. जादा विशेष गाड्या चालवण्याची […]Read More

शिक्षण

MBBS च्या विद्यार्थ्याला वसतिगृह शुल्क चुकवल्याने तब्बल १९ लाखांचा दंड

मुंबई, दि. 24 : मुंबई मनपाच्या नायर रुग्णालयातील MBBS च्या विद्यार्थ्याने ३ लाख ४३ हजार १०० रुपये वसतिगृह शुल्क भरले नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला चक्क १९ लाख ४५ हजार ६९९ रुपये दंडासह २२ लाख ८१ हजार ६९९ रुपये ठोठावला आहे. याबाबतची नोटीस बजावल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, प्रशासनाची कार्यवाही योग्य नसून प्रशासनाने योग्य […]Read More

ट्रेण्डिंग

या राज्यात ९ दिवस मद्यविक्रीवर बंदी

कोलकाता, दि. २१ : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मद्यबंदीच्या आदेशामुळे राजकीय आणि व्यापारी वर्तुळात नवा वाद पेटला आहे. विशेष म्हणजे, ज्या भागात पहिल्या टप्प्यात मतदान नाही, तिथेही मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नव्या आदेशानुसार, 20 एप्रिलपासूनच राज्यात मद्यविक्री आणि सेवा देण्यावर निर्बंध लागू झाले आहेत. 23 […]Read More

मराठवाडा

‘लातूर पॅटर्न’चे शिल्पकार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन

लातुर, दि. २१ : लातूरमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाची छाप सोडणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे सर्वेसर्वा आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. डॉ. गोपाळराव पाटील हे मूळचे बालरोगतज्ज्ञ होते. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करताना अनेक रुग्णांना आधार दिला. विशेषतः ग्रामीण भागातील गरीब रुग्णांसाठी ते ‘देवदूत’ ठरले होते. […]Read More

ट्रेण्डिंग

मराठी सक्तीच्या विरोधात 15 लाख रिक्षाचालक जाणार संपावर

मुंबई, दि. 21 : 1 मे पासून राज्यातील रिक्षावाल्यांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात आले असून भाषा न आल्यास त्याचा परवाना रद्द होणार आहे. या सक्ती विरोधात आक्रमक भूमिका घेत रिक्षावाल्यांनी संपाचे हत्यार उगारले आहे. मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियन या रिक्षाचालकांच्या सर्वात मोठ्या संघटनेने सरकारच्या या निर्णयाविरोधात बंड पुकारला आहे. 4 मे पासून राज्यातील 15 […]Read More