पुणे, दि. १२ : राज्यात निर्माण झालेल्या LPG गॅस टंचाईची झळ आता शालेय विद्यार्थ्यांनाही बसू लागली आहे. शालेय पोषण आहार योजना आता अडचणीत आली आहे. पुणे जिल्ह्यासह अनेक भागांमध्ये शालेय पोषण आहार योजनाही महिला बचत गटांमार्फत राबवली जाते. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. मात्र पोषण आहार बनवण्यासाठी आवश्यक असलेला कमर्शियल गॅस […]Read More
पुणे, दि. १२ : पुण्याच्या शान असणाऱ्या ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरात आज दुपारी अचानक अग्नीतांडव पाहायला मिळाले. वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या नजीक असलेल्या मोकळ्या जागेत ही आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. वाड्याच्या तटबंदीजवळ साठलेला कचरा, पालापाचोळा आणि तेथे पडलेल्या वाळलेल्या लाकडांनी अचानक पेट घेतल्यामुळे आगीचा भडका उडाला. भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या ऐतिहासिक वास्तूजवळून धुराचे […]Read More
मुंबई, दि. १२ : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी परिवहन विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार टॅक्सी, रिक्षा, ॲप आधारित प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांमध्ये “क्यूआर कोड” बसविण्यात येणार आहे. यावरून वाहन चालकाचे नाव, नंबरसहित गाडीचे ठिकाणही प्रवाशाच्या निकटवर्तीयांना समजू शकणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील तीन महिन्यात करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सरनाईक […]Read More
मुंबई, दि. १२ :युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती वापरासाठीच्या LPG सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने तसेच सरकारने सिलिंडर बुक करण्याची मर्यादा वाढवल्याने त्रस्त झालेले नागरिक आता इंधनाचे पर्यांयी मार्ग शोधत आहेत. यामुळे इन्डक्शनच्या मागणीत मोठी वाढ झाली असून या कंपन्यांचे शेअर्स तेजीत आले आहेत. इंडक्शन कंपन्यांच्या शेअर्समध्ये १५% वाढ झाली आहे. या कंपन्यांमध्ये टीटीके प्रेस्टीज, गांधी माथी अप्लायन्सेस […]Read More
मुंबई, दि. १२ : इराण युद्धामुळे देशभर निर्माण झालेल्या नैसर्गिक वायूच्या टंचाईमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. एरवी प्रत्येकवेळी शहरीभागांना झुकते माप देणाऱ्या सरकारने आता घरगुती गॅस पुरवठ्याबाबतही ग्रामीण भागाआधी शहरीलोकांनाच प्राधान्य दिले आहे. नव्या नियमानुसार शहरी भागात 25 दिवसांचे अंतर ठेवून घरगुती वापरासाठीचा LPG बुकिंग करता येईल. तर ग्रामीण ग्रामीण भागात आता तब्बल 45 दिवसांनंतरच […]Read More
मेलबर्न, दि. १० : आशियाई कपमधून बाहेर पडल्यानंतर इराणच्या महिला फुटबॉल संघातील पाच खेळाडूंना ऑस्ट्रेलियाने मानवतावादी व्हिसा देऊन आपल्या देशात राहण्याची परवानगी दिली आहे. गेल्या आठवड्यात दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी इराणच्या संघाने आपले राष्ट्रगीत गायले नव्हते. यानंतर त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. रविवारी गोल्ड कोस्ट स्टेडियमबाहेर शेकडो लोकांनी संघाच्या समर्थनार्थ “सेव्ह अवर गर्ल्स” […]Read More
मुंबई, दि. १० : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विधान परिषदेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ (लवकर या-लवकर जा) ही विशेष योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेअंतर्गत मुंबई महानगरातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांना सकाळी ९.१५ ते ९.४५ या वेळेत […]Read More
मुंबई दि १० : त्रिपुरा येथील माणिक्य राजघराण्यातील सदस्य व तेलंगणाचे माजी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी जिष्णु देव वर्मा यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]Read More
मुंबई, दि. १० : RTE प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारने लादलेली एक किलोमीटर अंतराची किचकट अट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगित केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, या अटीमुळे ज्या पालकांना अर्ज भरता आले नव्हते, त्यांच्यासाठी उच्च न्यायालयाने अर्जाची मुदत ३ दिवसांनी वाढवून दिली […]Read More
नवी दिल्ली, दि. १० : इराणच्या हॉर्मुझ जलमार्गातून होणारा गॅस पुरवठा ठप्प झाल्यानंतर भारत सरकारने आता देशभरात ‘अत्यावश्यक वस्तू कायदा 1955’ लागू केला आहे. हे पाऊल उचलले आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांनी व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर सध्या बंदी घातली आहे. या बंदीमुळे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स बंद होण्याची […]Read More