चंद्रपूर दि ११ :- चंद्रपूर जिल्ह्यातील हरदोना खुर्द इथं भूकंपाचे धक्के जाणवले आहेत . 3.4 रेक्टर स्केलचा भूकंप झाल्याची नॅशनल सेंटर ऑफ सिसमोलॉजीने माहिती दिली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे. सायंकाळी ४ वाजून २२ मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. 3.4 रेक्टर स्केलवर याची नोंद झाली आहे अशी माहिती नॅशनल सेंटर ऑफ सिसमोलॉजीकडून […]Read More
मुंबई, दि. ११ : राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच बिगुल अखेर वाजलं आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये थेट सरपंचपदासाठी 471 आणि 3120 सदस्य रिक्त जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. सध्या गावोगावी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे. ग्रामपंचायत सदस्यपदांच्या तसेच सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी मतदान होणार आहे. 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे संबंधित […]Read More
पुणे, दि. ११ : १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. दरवर्षी या निमित्ताने डीजे सह मोठ्या जल्लोषात राज्यभर मिरवणूका काढल्या जातात. मात्र यावर्षी ऐतिहासिक निर्णय घेत पुणे शहरात यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘नो डीजे’ म्हणून साजरी केली जाणार आहे. पुण्यातील प्रमुख दलित संघटना, […]Read More
जामनगर, दि. ११ : रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी जागतिक वन्यजीव संरक्षण संस्था, ‘वनतारा’ ने जामनगरमध्ये ‘वनतारा युनिव्हर्सिटी’ सुरू करण्याची घोषणा केली. अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखाली हे विद्यापीठ भारताला जागतिक शिक्षण आणि संवर्धन केंद्र बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे विद्यापीठ वन्यजीव संवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञानासाठी समर्पित असलेले जगातील पहिले एकात्मिक जागतिक विद्यापीठ ठरणार […]Read More
मुंबई, दि. ११ : यंदाच्या IPL सिझनमध्ये मैदानावर सहजपणे वावरणारा रोबो डॉग चंपक विशेष आकर्षणाचा विषय ठरला आहे. राजस्थान रॉयल्सनं IPL 2026 मध्ये आणखी एक विजय मिळवला. त्यांनी ६ विकेट राखून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव केला. त्यामुळे अर्थातच RR फॅन्स सध्या खुश आहेत. यातच एक अजब घटना घडली. रोबो डॉग चक्क राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडूंची […]Read More
मुंबई, दि. 11 : देशातील पहिली नॉन एसी बंद दरवाज्याची लोकल लवकरच मध्य रेल्वे मार्गावर धावणार आहे. मुंब्रा स्थानक परिसरात ९ जून २०२५ मध्ये सीएसएमटी-कर्जत आणि कसारा-सीएसएमटी लोकलमधून १३ प्रवासी पडले. दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर धावत्या लोकलमधून लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला. यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी […]Read More
पुणे प्रतिनिधी : “क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ मरणोत्तर प्रदान करण्यात यावा, यासाठी केंद्र सरकारकडे विशेष आग्रह धरला जाईल,” अशी ग्वाही खासदार ज्योती वाघमारे यांनी आज येथे दिली. महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित अभिवादन […]Read More
बुलडाणा दि ११ – कोकणचा हापूस आंबा अशी ओळख असलेल्या या हापूस आंब्याची लागवड रानमळावर करून बुलडाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पाण्याचे योग्य नियोजन करून सेंद्रीय पद्धतीने आमराई फुलवली आहे. पारंपरिक शेती परवडत नसल्याने काळाच्या गरजेनुसार बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील प्रगतिशील शेतकरी सतीश गुप्त यांनी त्यांच्या पाच एकर खडकाळ शेत जमिनीवर आंब्याची लागवड करण्याचं ठरवलं आणि […]Read More
मुंबई प्रतिनिधी, दि. ११ : महाराष्ट्र अक्युपंकचर कॉन्सिलमध्ये बसविण्यात आलेले प्रशासक आणि रजिस्ट्रार हे मोठ्या प्रमाणात कौन्सिल मध्ये बेबंदपणे हुकूमशाही करत आहेत. महाराष्ट्र ॲक्युपंक्चर कौन्सिलमधील प्रशासकीय अनागोंदी आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा आता मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर पोहोचला आहे.*कौन्सिलची निवडणूक होणे बाकी आहे. ॲक्युपंक्चर कौन्सिलमधील एक असणारे डॉ रुमी बेरामजी याचीच प्रशासक म्हणून नेमण्याचा हास्यास्पद प्रकार महाराष्ट्र […]Read More
नाशिक दि ११ : जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पंचाळे -शहा रस्त्यावर रात्री दोन वाजेच्या सुमारास ट्रक व पिकअप यांच्यात जोरदार धडक होऊन पिकप कार पेटली. यात दोन महिला व दोन पुरुष यांचा होरपळून मृत्यू झाला. पंचाळे येथून काहीजण पिकअप गाडीने जागरण गोंधळासाठी गेल्याची समजते रात्री परत येत असताना पंचाळे- शहा रस्त्यावर पंचाळे गावापासून दोन […]Read More