mmcnews mmcnews

महानगर

अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी उल्हासनगरमध्ये ‘एक खिडकी योजना’

मुंबई, दि. १८ : उल्हासनगरमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्य सरकार आता ‘एक खिडकी योजना’ (Single Window System) सुरू करणार आहे. विधानसभा अधिवेशनात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ही माहिती दिली. या प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या किंवा निष्क्रियता दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे […]Read More

देश विदेश

भारताने इराणला पाठवली वैद्यकीय मदत

नवी दिल्ली,दि. 18 : अमेरिका आणि इस्राइलने इराण विरुद्ध पुकारलेल्या भीषण युद्धामध्ये अद्याप तटस्थ भूमिका घेणाऱ्या भारत सरकारने आता इराणला वैद्यकीय मदत पाठवली आहे. भारताकडून वैद्यकीय मदतीचा पहिला टप्पा आज इराणला पोहोचला. यात औषधे व आवश्यक वैद्यकीय साहित्य पाठवण्यात आले. ही मदत इराणी रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली. इराणच्या दूतावासाने सोशल मीडियावर संदेश देत […]Read More

पर्यावरण

राज्यात वाहनांवरील पर्यावरण कर झाला दुप्पट

मुंबई, दि. 18 : वाहन खरेदी करताना आता अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. महाराष्ट्र मोटार वाहन कर विधेयकात सुधारणा करण्यात आली असून पर्यावरण कर म्हणून आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. विधिमंडळामध्ये महाराष्ट्र मोटार वाहन कर विधेयक 2026 मध्ये सुधारणा करण्यात आली असून एकमताने मंजुरी दिली आहे. राज्यात पर्यावरण संरक्षण, औद्योगिक विकास साधण्यासाठी हे विधेयक […]Read More

ट्रेण्डिंग

अतिरिक्त शुल्क न मोजताही मिळेल विमानात आवडीची सीट

नवी दिल्ली, दि. १८ : नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या नवीन नियमानुसार, प्रवाशांना पसंतीची जागा मिळवण्यासाठी आता विमान कंपनीला अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. सध्या कंपन्या अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी पसंती शुल्क आकारतात. त्यामुळे हवाई प्रवास अधिक महाग झाला होता. हे लक्षात घेऊन DGCA ने विमान कंपन्यांना किमान ६०% जागांवरील असे शुल्क माफ करण्याचे निर्देश दिले आहेत. […]Read More

देश विदेश

केदारनाथ मंदीर प्रवेशासाठी गैरहिंदूंना द्यावे लागणार सनातनी असल्याचे प्रतिज्ञापत्र

रुद्रप्रयाग, दि. 18 : उत्तराखंडातील बद्रीनाथ–केदारनाथ मंदिर समितीने (BKTC) नवा नियम लागू केला आहे. या नियमानुसार गैरहिंदूंना मंदिरात प्रवेश करण्यासाठी ‘मी सनातनी आहे’ असे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. या निर्णयामुळे बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान चर्चेत आली आहे कारण ती बाबा केदारनाथाची भक्त असून अनेकदा दर्शनासाठी जात असते. आता तिला देखील केदारनाथाच्या दर्शनासाठी आता […]Read More

विदर्भ

रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान माकडाऐवजी माणसालाच टोचलं इंजिक्शन

उमरखेड, दि. १८ : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात माकडाच्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान पिसाळलेल्या माकडाला बेशुद्ध करण्यासाठी वन विभागाने झाडलेले इंजेक्शन माकडाला लागण्याऐवजी थेट तिथे उभ्या असलेल्या एका नागरिकाला लागले. या घटनेनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती, तसेच माकडाच्या […]Read More

क्रीडा

२८-२९ मार्चला महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

सोलापूर, दि. १७ : येथे २८ आणि २९ मार्च रोजी चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार असून निर्झरा केअर फाऊंडेशन, सोलापूर या संस्थेकडे स्पर्धेचे संयोजनपद देण्यात आले आहे. या स्पर्धेत ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक खेळाडू सहभागी होणार असून महिला महाराष्ट्र केसरी किताबासाठी भाग्यश्री फंड ही प्रमुख दावेदार आहे. यापूर्वी तिने तीन […]Read More

ट्रेण्डिंग

धुरंधर 2 – ॲडव्हान्स बुकिंगमध्येच सर्व शोज हाऊसफुल

मुंबई, दि. १७ : आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर- १ च्या प्रचंड यशानंतर त्याचा दुसरा भाग ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या प्रदर्शित व्हायला आता दोन दिवस राहिले आहेत. ॲडव्हान्स बुकिंगमध्येच या चित्रपटाचे सर्व शोज हाऊसफुल झाले आहेत. जगभरातील ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शनच्या बाबतीत रणवीर सिंहचा हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडत आहे. ‘धुरंधर 2’चे लाखो तिकिट्स विकले […]Read More

महानगर

जागतिक वारसा स्थळ असलेल्या घारापुरी बेटावर कचऱ्याचे ढिग

मुंबई, दि. १७ : मुंबईच्या अगदी नजिक समुद्रात वसलेले घारापुरी अर्थात एलिफंटा हे जागतिक वारसा स्थळ सध्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यामुळे त्रस्त झाले आहे. काल राबवण्यात आलेल्या एका विशेष स्वच्छता मोहिमेत ५०० मीटरच्या परिघातून २.५ टन कचरा हटवण्यात आला. या मोहिमेने मुंबई आणि आसपासच्या सागरी प्रदूषणाची भयावह स्थिती पुन्हा एकदा समोर आणली आहे. वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेच्या […]Read More

शिक्षण

10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला

सांगोला, दि. १७ : दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे पेपर सुरक्षित ठेवणारी ‘स्ट्राँग रूम’ फोडून भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरून नेल्याची धक्कादायक घटना सांगोला विद्यामंदिर प्रशालेत उघडकीस आली आहे. गुरूवारी होणाऱ्या भूगोलाच्या पेपरच्या गोपनीयतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असून, आता बोर्ड काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या पेपर […]Read More