Month: September 2023

पर्यटन

भंडारदऱ्याच्या पाण्याने अंब्रेला धबधबा पुन्हा प्रवाहित…

अहमदनगर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यटनस्थळा पैकी प्रसिद्ध असलेल्या अंब्रेला धबधब्यामधून पाणी सोडण्यात आले असून अम्ब्रेला धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या अंब्रेला धबधब्यातून पाणी सोडण्याची मागणी शेंडी येथील नागरीकांसह इतर पर्यटकांनी मागणी केली होती. शनिवारी आणि रविवारी अम्ब्रेला फॉल सोडणार धबधब्याचे दर्शन होणार असून […]Read More

ऍग्रो

जोरदार पाऊस, पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

छ. संभाजीनगर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात रात्री पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून या जोरदार पावसामुळे उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहीती समोर येत आहे. गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पाऊस नसल्याने जिल्ह्याची वाटचाल दुष्काळा कडे सुरू झाली असताना रात्री सोयगाव तालुक्यात पडलेल्या पावसामुळे शेतातील उभे पिके […]Read More

महानगर

गौरी गणपती विसर्जन थाटात

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):संपूर्ण कोकण , मुंबई, सिंधुदुर्ग आणि राज्यभरात आज गौरी गणपतीचे विसर्जन थाटामध्ये सुरू आहे . हे रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे. या विसर्जनाला सुरुवात सायंकाळी चार वाजल्यानंतर सुरू झाली. गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते तर गौरीचे प्रतीकात्मक स्वरूपात विसर्जन केले जाते . गौरी आवाहनाच्या दिवशी कळशी मधून आणलेल्या तेरडा , […]Read More

विदर्भ

ढगफुटी सदृश्य पाऊस २ महिलांचा मृत्यू ; १४ जनावरे दगावली

नागपूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):शनिवारी रात्री २ ते पहाटे ५ वाजेपर्यंत शहरात विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे सकल भागात पावसाचे पाणी शिरले. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या सतर्कतेने एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने दुपारपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आली. विविध ठिकाणी बचावकार्याद्वारे ४०० नागरिकांना सुरक्षित स्थळी […]Read More

महिला

किरण बेदी: पहिल्या महिला IPS अधिकारी

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):किरण बेदी या भारतीय कायद्याच्या अंमलबजावणीतील अग्रणी आहेत आणि पारंपारिकपणे पुरुषप्रधान क्षेत्रात महिलांचे अडथळे तोडण्याचे प्रतीक आहेत. 1972 मध्ये ती पहिली महिला भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी बनली आणि दिल्लीतील कारागृह महानिरीक्षक यासह विविध आव्हानात्मक कामांमध्ये सेवा दिली. किरण बेदी यांना तुरुंग व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या प्रयत्नांसाठी आणि कम्युनिटी पोलिसिंगसाठीच्या त्यांच्या […]Read More

महिला

अरुंधती रॉय: द लिटररी ल्युमिनरी

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):अरुंधती रॉय एक ख्यातनाम भारतीय लेखिका, निबंधकार आणि कार्यकर्ती आहे जी तिच्या शक्तिशाली कथाकथन आणि विचार करायला लावणाऱ्या निबंधांसाठी ओळखली जाते. 1997 मध्ये मॅन बुकर पारितोषिक जिंकणाऱ्या “द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज” या तिच्या पहिल्या कादंबरीद्वारे तिने आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली. रॉय यांच्या लेखनात सामाजिक असमानता, राजकारण आणि मानवी स्थिती यासारख्या […]Read More

Uncategorized

गूळ पराठा, आजीच्या मायेची आठवण

, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):लहानपणी साखरेपासून बनवलेला गोड पराठा जवळपास सर्वांनीच खाल्ला असेल. बरेच लोक मोठे झाल्यावरही ते खाण्याची इच्छा सोडू शकत नाहीत. आजींनी बनवलेला गोड पराठा तोंडाला वेगळाच गोडवा देत असे. साखर आणि गुळापासून बनवलेला गोड पराठा आजही सर्व वयोगटातील लोकांना आवडतो. तुम्हालाही मिठाई खाण्याचे शौकीन असेल तर यावेळी तुम्ही मिठाईऐवजी गोड पराठा […]Read More

महानगर

दादरच्या हिंदू कॉलनीत लागलेल्या आगीत, ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यू

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):हिंदू कॉलनीमधील बहुमजली इमारतीला शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास आग लागली. या आगीत धुरामुळे इमारतीमधील रहिवासी सचिन पाटकर (६०) यांचा गुदमरून मृत्यू झाला.दादर पूर्व परिसरातील हिंदू कॉलनीमधील गल्ली क्रमांक २ येथील १५ मजली रेन ट्री इमारतीत शनिवारी सकाळी आग लागली. इमारतीच्या १३ व्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीमुळे इमारतीत धूर […]Read More

महानगर

छत्तीसगडचा आगामी मुख्यमंत्री हा आदिवासीच असेल : प्रकाश आंबेडकर

रायपूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्तीसगडमध्ये आदिवासींची लोकसंख्या 32 टक्के असूनही, आदिवासींना त्यांचा फायदा तर सोडा उलट त्यांचे सातत्याने नुकसान होत आलेले दिसून येते. आदिवासींना काँग्रेस आणि भाजपने कायम तुच्छतेने वागवत इथल्या आदिवासींना कायम आपल्या हक्कापासून वंचित ठेवले आहे. पण आता नाही ! इथून पुढे छत्तीसगडचा आगामी मुख्यमंत्री हा आदिवासीच असेल अशी घोषणा वंचित […]Read More

विदर्भ

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

नागपूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):जिल्ह्यात आज मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार झालेल्या पावसामुळे नागपूर शहरातील तसेच ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपूर शहरातील अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाल्याने शेजारी असलेल्या वस्तीमध्ये पाणी शिरले तसेच अनेकांच्या घरात देखील पाणी शिरले. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या भागात नागरिकांना वाचविण्यासाठी नावेचे सहकार्य घेण्यात आले. झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात […]Read More