Month: August 2023

ट्रेण्डिंग

चांद्रयान- ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर, भारताने घडविला इतिहास

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील आजवरची सर्वांत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक कामगिरी आज इस्रोने पार पाडली आहे. इस्रोचं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं आहे. चांद्रयान-3 चे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आहे. चंद्राच्या या भागावर वाहन उतरवणारा भारत हा पहिला […]Read More

देश विदेश

हे आहे चांद्रयान-३ च्या लँडीगसाठी आजचा दिवस निवडण्याचे महत्त्व

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्रोच्या चांद्रयान-३ चे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग करणारा आजचा दिवस म्हणजेच २३ ऑगस्ट इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जाणार आहे. कोट्यवधी भारतीयांनी आज चांद्रयानाचे यशस्वी लँडींग एखाद्या सणाप्रमाणेच साजरा केले आहे. निर्धारित वेळेत चांद्रयान ३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची ऐतिहासिक कामगिरी पार पाडल्याचे टिव्ही स्क्रिनवर पाहणे हा रोमहर्षक क्षण […]Read More

देश विदेश

चांद्रयान ३ मोहिमेमध्ये विदर्भाचा खारीचा वाटा

बुलडाणा, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चांद्रयान ३ ने आज अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडींग केले आहे. या ऐतिहासिक कामगिरीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगावने महत्त्वाचे योगदान दिले आहे. अखिल देशवासियांसाठी अभिमानास्पद ठरलेल्या या मोहिमेत बुलडाणा जिल्हयातील खामगाव एमआयडीसीतील विकमशी फॅब्रिक्स प्रा. लि. मध्ये निर्माण झालेल्या थर्मल शिल्डचा वापर चांद्रयानमध्ये करण्यात आला आहे. विकमशी फॅब्रिक्सने […]Read More

महानगर

मोहोळ जवळ अपघातात 4 महिला भाविकांचा मृत्यू

मोहोळ, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मोहोळजवळ झालेल्या अपघातात चार महिला भाविकांना जीव गमवावा लागला. मोहोळजवळील यावली गावाजवळ बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मालवाहू ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत चार जणांना आपला जीव गमवावा लागला तर आणखी सहा जण जखमी झाले. रांजणगाव येथील महिला भाविकांचा जत्था कारने तुळजापूरकडे निघाला असताना पुणे सोलापूर महामार्गावर यावली […]Read More

Uncategorized

निम्म्यापेक्षा जास्त सांडपाणी प्रक्रियेविना मुळा-मुठेत

पुणे, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शहरातील निम्म्याहून अधिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता मुळा-मुठा नदीत सोडले जात असल्याने नदी प्रदूषित होऊन पाण्याला दुर्गंधी येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. शिवाय, पाण्यात हानिकारक पदार्थांच्या उपस्थितीमुळे जैवविविधतेलाही धोका निर्माण झाला आहे. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सध्या नऊ प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांमध्ये दररोज 477 एमएलडी पाणी […]Read More

पर्यटन

प्राचीन कार्ला, बेडसे आणि भाजा लेण्यांमधून भटकंती करा

कामशेत, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईहून सहज उपलब्ध असलेले, कामशेत अभ्यागतांना त्याच्या विलक्षण मोहिनी आणि नैसर्गिक सौंदर्याने अनोखे अनुभव देण्याचे वचन देते. तुम्‍हाला येथील नयनरम्य गावे आणि त्‍यांच्‍या पारंपारिक कच्च्या घरांच्‍या प्रेमात पडल्‍याचे आढळेल. कामशेत हे ट्रेकर्स आणि पॅराग्लायडिंग प्रेमींमध्ये देखील आवडते आणि लोणावळ्यापासून फक्त 16 किमी अंतरावर आहे. प्रसिद्ध कोंडेश्वर मंदिर आणि पुढे […]Read More

करिअर

पटना हायकोर्ट येथे स्टेनोग्राफर पदांवर भरती

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पाटणा उच्च न्यायालयाच्या वतीने स्टेनोग्राफर पदांसाठी अर्ज प्रक्रिया उद्या म्हणजेच २४ ऑगस्ट रोजी बंद होणार आहे. ज्या उमेदवारांना या भरतीमध्ये सहभागी व्हायचे आहे आणि त्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी उद्यापर्यंत ऑनलाइन माध्यमातून अर्ज करावेत. Patna High Court Recruitment for Stenographer Posts पदांची संख्या: 51 अर्ज शुल्क अनारक्षित, BC, […]Read More

ट्रेण्डिंग

चंद्रयान मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा

मुंबई दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे चंद्रयानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त भारतीयांचं आणि शास्त्रज्ञांचं अभिनंदन केले. भारताच्या चांद्रयानाचं विक्रम हे लँडर यशस्वीरित्या उतरल्यानंतर मुख्यमंत्री […]Read More

Lifestyle

दुधी भोपळ्याची साले कचरा म्हणून टाकू नका, पौष्टिक चटणी बनवा

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दुधी भोपळ्याची भाजी बनवताना बहुतेक लोक तिची साले फेकून देतात, पण निरुपयोगी समजली जाणारी दुधी भोपळ्याची साले पौष्टिकतेच्या बाबतीत कमी नाहीत. पौष्टिक दुधी भोपळ्याच्या सालींपासूनही चवदार चटणी बनवता येते. ही चटणी लंच किंवा डिनरसोबत सर्व्ह करता येते. जर तुम्ही दुधी भोपळ्याची साले निरुपयोगी मानत असाल, तर यावेळी त्यांना फेकून […]Read More

महानगर

बातम्या देताना ‘निवाडे’ देण्याची भूमिका टाळली पाहिजे

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) राज्यात अलीकडच्या काळात झालेले पत्रकारांवरील हल्ले अतिशय निंदनीय असून, हल्लेखोर कितीही प्रभावशाली असतील तरीही त्यांना कायद्यानुसार योग्य शासन झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोठेही स्थान नाही असे राज्यपालांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणार ‘आचार्य […]Read More