mmcnews mmcnews

Breaking News

मुंबई किनारा मार्ग २०२४ च्या मध्यापर्यंत कार्यान्वित

मुंबई, दि. 25 (मिलिंद लिमये):  मुंबईच्या किनारपट्टीवर समुद्रात भर घालून तयार करण्यात येणारा किनारा मार्ग पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता असून साडे दहा किलोमीटरच्या या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना टोल आकारणी होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. मुंबईत पश्चिम भागात होणारी मोठी वाहतूक कोंडी लक्षात घेता या किनारा मार्गाची आखणी मुंबई महानगरपालिकेने केली असून मरीन लाइन्स […]Read More

देश विदेश

अखेर छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव झालेच

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : औरंगाबाद आणि उस्मानाबाद ही नावे बदलण्याचा वर्षानुवर्षे भिजत राहिलेला पेच आता सुटला आहे. औरंगाबाद चे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने आज मंजुरी दिली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत माहिती दिली आणि पंतप्रधान नरेंद्र व केंद्रीय मंत्री […]Read More

Lifestyle

झुडियोच्या स्वस्ताईमागचे हे आहे रहस्य

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ब्रॅंडेड कपडे वापरणं ही तरुणाईची क्रेझ सर्वश्रुत आहे.पण ब्रॅंडेड कपडे म्हटले की त्याच्या किंमती बघूनच धडकी भरते आणि ही आपल्या बजेट फ्रेंडली खिशाला अगदीच न परवडणारी गोष्ट आहे. पण याच सगळ्या तरुणांच्या अडचणींना समजून घेणारा झुडियो ब्रॅंड म्हणावा लागेल.झुडियोच्या कपड्यांची किंमत बघता लोकांमध्ये यांच्या स्वस्त किमतीबाबत अनेक चर्चा आहेत.असा […]Read More

महानगर

विधानभवनात मराठी भाषा गौरवदिनी साहित्याची ज्ञानयात्रा

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कविकुलगुरू कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विधानमंडळातील मराठी भाषा समितीतर्फे ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यावर आधारित “मराठी साहित्याची ज्ञानयात्रा” या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, […]Read More

महानगर

पोलीस हवालदाराची आत्महत्या

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भायखळा तुरूंगाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिसाने स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली . या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.श्याम वरगडे असे या पोलीस हवालदाराचे नाव असून ताडदेव येथील सशस्त्र विभागात कार्यरत आहे. वारघडे यांची नियुक्ती भायखळा जेलच्या गेटवर होती. गुरुवारी रात्री ८.२० वाजता वरगडे यांनी एसएलआरमधून […]Read More

महानगर

१७ व्या कामगार साहित्य संमेलनाचा शुभारंभ ग्रंथ दिंडीने

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ढोल ताशांच्या निनादात आणि ज्ञानोबा… तुकाराम .. जय जय राम कृष्ण हरी….. गजरात १७ व्या कामगार साहित्य संमेलनाचा शुभारंभ ग्रंथ दिंडीने करण्यात आला. मिरज येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ग्रंथ दिंडीस प्रारंभ झाला. कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश खाडे आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल […]Read More

महानगर

करमुसे प्रकरणात पुन्हा तपास करा , पोलिसांना आदेश

ठाणे, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ठाण्यातील इंजिनियर अनंत करमुसे मारहाण प्रकरणात पोलिसांनी येत्या तीन महिन्यांत पुन्हा तपास करावा असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे करमुसे यांनी अशी मागणी केली होती. संभाजी भिडे गुरुजी यांच्या शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते असणाऱ्या आणि ठाण्यात राहणाऱ्या करमुसे यांना जितेंद्र आव्हाड मंत्री असताना त्यांच्या बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण करण्यात आली […]Read More

महाराष्ट्र

खंजिरी भजनातून केली जनजागृती

यवतमाळ, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती यवतमाळ येथे संपन्न झाली. यानिमित्त संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित झालेले सुप्रसिद्ध कीर्तनकार संदीपपाल महाराज यांनी आपल्या खंजिरी कीर्तनातून प्रबोधन केले.यावेळी संदीपपाल महाराज यांनी स्वच्छता अभियान , साक्षरता तथा अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी विषयाबाबत अतिशय नेमक्या शब्दात जनजागृती करून प्रबोधन केले. Public awareness done through Khanjiri […]Read More

देश विदेश

UN मध्ये रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याचा प्रस्ताव मंजुर

न्यूयॉर्क,दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रशिया-युक्रेन युद्धाला आज एक वर्ष पूर्ण झाले. संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी (दि.२३) रात्री उशिरा युक्रेनमध्ये शांतता व रशियन लष्कराच्या माघारीविषयी एक प्रस्ताव सादर करण्यात आला. तो दोन तृतीयांश मतांनी पारिति झाला. 141 देशांनी प्रस्तावाचे समर्थन केले. भारत, चीन व पाकसह 32 देशांनी संयुक्त राष्ट्रातील या प्रस्तावावरील मतदानात सहभाग […]Read More

ट्रेण्डिंग

कणेरी मठात ५४ गायींचा अचानक मृत्यू, ३० गायी गंभीर

कोल्हापूर,दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील कणरी मठामध्ये ५० हून अधिक गायींचा मृत्यू झाल्याची आणि ३० गायी गंभीररित्या आजारी असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत लोकोत्सव सुरू आहे.मठावर हजारोंच्या संख्येने गायी असून सध्या जनावरांचे प्रदर्शन सुरू असल्यामुळे ही मोठ्या संख्येने जनावरे आणण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More