मुंबई, दि २६सिटू,इंटक,एचएमएस,भारतीय कामगार सेना, आयटक आदी संयुक्त कृती समितीच्या लढ्यात उतरलेल्या संघटनांच्या वतीने,आझाद मैदानावरील सभेत केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी देशातील २९ कामगार कायदे रद्द करून,चार लेबर कोड एक तर्फी लागू केल्या आहेत.त्याचा काळा कायदा असा उल्लेख करून आजच्या सभेत तिव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे.कामगार कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीने आज आझाद मैदान येथे […]Read More
ठाणे, दि २६ आ. केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे नवीन पुलाचे काम लवकरच.. माजिवडा-लोढा भागातील नाल्यावरील सुमारे २५ वर्षे जुना पुल जीर्ण झाला असून येथील वाढत्या लोकसंख्येनुसार आमदार संजय केळकर यांनी केलेली नवीन पुलाची मागणी मान्य करण्यात आली आहे. लवकरच नवीन पुलाच्या कामास सुरुवात होणार असल्याने परिसरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. बुधवारी आमदार संजय […]Read More
मुंबई, दि २६आम्ही निवडणुकीपुरतं काम करत नसून संपूर्ण वर्षभर काम करत असतो आणि यापुढे देखील काम करत राहणार असे जाहीर प्रतिपादन शिवसेनेचे विभाग प्रमुख विजय दाऊ लिपारे यांनी भायखळा येथील घोडपदेव परिसरातील विविध कामांच्या लोकार्पण प्रसंगी केले. ते पुढे म्हणाले काही लोकं हे निवडणुकीपुरते येत असतात आणि निवडणुकीमध्ये मोठमोठी आश्वासन देतात आम्ही हे करू आम्ही […]Read More
मुंबई, दि. २६ : गेल्या सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत असणारे कोकणचे सुपुत्र श्रीरंग सुर्वे यांना ‘कोकण रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे अध्यक्ष संजय कोकरे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. कोकणच्या दृष्टीने प्रतिष्ठित असलेल्या पुरस्काराची घोषणा करताना श्रीरंग सुर्वे यांनी त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या समाजसेवेची नोंद घेतल्याचे त्यांनी आवर्जून […]Read More
मुंबई, दि २६भारतीय संविधानाला यावर्षी २०२५ ला ७५ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस राष्ट्रीय चर्मकार संघाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना एकत्र करून धारावी येथील संत रोहिदास मार्गावरील संविधान चौक येथील स्तंभ व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान अर्पण प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली अर्पण केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आपण […]Read More
मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा 2026 च्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 ऐवजी 22 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यभर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) […]Read More
यवतमाळ, दि २६ कोळसा खाणी आणि वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजना करुन वणी प्रदूषणमुक्त केले जाईल. तसेच पांढरकवडा येथे एमआयडीसी सुरु करुन बेरोजगारीचा प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. विदर्भातील वणी, पांढरकवडा आणि घाटंजी नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वणी आणि […]Read More
मुंबई, दि २६ महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान दिले आहे. हजारो वर्षांच्या गुलामगिरीचे जोखड झुगारून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. महिलांसह सर्वांना मतदानाचा अधिकार दिला आहे. आरक्षण दिले आहे पण आज याच संविधानावर घाला घातला जात आहे. देशातील मनुवादी विचाराचे सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपवण्याचा […]Read More
मुंबई, दि २६बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील शक्ती वाघाचा (वय ९ वर्षे सहा महिने) दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२.१५ मिनिटांनी मृत्यू झाला. ‘शक्ती’चा मृत्यू श्वसननलिकेत हाड अडकल्याने झाला नसून, न्यूमोनिया बाधा झाल्यानंतर श्वसन प्रणाली बंद झाल्याने त्याचा मृत्यू ओढवला आहे, असे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान […]Read More
मुंबई, दि २६भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कारणाने बुधवार, दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून गुरूवार, दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत एकूण १४ प्रशासकीय विभागांमध्ये पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात लागू राहणार आहे. तानसा धरणातून भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी २७५० मिलीमीटर […]Read More