Month: May 2025

देश विदेश

JNU ने तोडला तुर्कीच्या विद्यापीठासोबतचा करार

नवी दिल्ली, दि. १४ : भारत-पाक संघर्षामध्ये पाकची पाठराखण करणाऱ्या तुर्कीच्या विरोधात देशभर वातावरण तापले आहे. सोशल मिडियावर तुर्कीच्या पर्यटनावर बहिष्कार घालण्याची मोहिम सुरु आहे. त्यानंतर आता जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाने तुर्कीतील एका विद्यापीठासोबतचा करार मोडीत काढला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (JNU) तुर्कीच्या इनोनू विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार रद्द केला आहे. जेएनयूने एक्स वर लिहिले – आम्ही […]Read More

ट्रेण्डिंग

स्वदेशी ड्रोन काउंटर ‘भार्गवास्त्र’ ची चाचणी यशस्वी

भुवनेश्वर, दि. १४ : भारतीय लष्कराच्या संरक्षण क्षमतेत मोठी भर घालणाऱ्या ‘भार्गवास्त्र’ या स्वदेशी काउंटर-ड्रोन प्रणालीची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. ही प्रणाली सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड (SDAL) ने विकसित केली असून, ती भविष्यातील ड्रोन हल्ल्यांना रोखण्यासाठी प्रभावी उपाय ठरणार आहे. ही अत्याधुनिक प्रणाली ओडिशातील गोपाळपूर येथील सीवर्ड फायरिंग रेंजमध्ये चाचणीसाठी वापरण्यात आली. भारतीय […]Read More

राजकीय

ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो लाईन-9 च्या ट्रायल रनला सुरुवात

मुंबई दि १४ — मुंबई महानगर प्रदेशासाठी (MMR) मेट्रो लाईन-9 च्या पहिल्या टप्प्याच्या ट्रायल रनला औपचारिकपणे सुरुवात झाली. या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा कार्यान्वित होण्याच्या दिशेने आज महत्वाचं पाऊल उचललं गेलं. मेट्रोच्या या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते सुरुवात पार पडली. यावेळी मेट्रोची तांत्रिक […]Read More

महाराष्ट्र

राज्यातील सरकारी रुग्णालयातील रुग्णवाहिका ठप्प होणार

मुंबई, दि 14राज्यातील सरकारी रुग्णालये अत्याधुनिक करत गोरगरीब जनतेला चांगल्या सुविधा देण्यासाठी सरकार पावले टाकत आहे. मात्र या रुग्णालयातील कंत्राटी कामगार व १०८ रुग्णवाहिका चालक समान काम समान वेतन ही मागणी घेऊन आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. सेवा सुरू ठेवत प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन सुरू आहे. मात्र सरकारने जर गांभीर्याने विचार करत आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी […]Read More

देश विदेश

स्वातंत्र्याची घोषणा करत बलुचिस्तानची भारतात उच्चायुक्तालय उघडण्याची विनंती

नवी दिल्ली, दि. १४ : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धस्थिती असताना दुसरीकडे पाकला अंतर्गत संघर्षाने फाळणीची स्थिती निर्माण झाली आहे. पाकच्या बलुचिस्तान प्रांताने पाकमधुन वेगळे होण्यासाठी वेगवान कारवाई केली आहे. बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला केला आणि त्यांना क्वेट्टा सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर आता बलोच लिबरेशन आर्मीने स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा केली आहे. बलोच नेता मीर […]Read More

पर्यटन

भारतीय पर्यंटकांचा तुर्की, अझरबैजान पर्यटनावर बहिष्कार

नवी दिल्ली, दि. १४ : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाक विरोधात सुरु केलेल्या ताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर तुर्की आणि अझरबैजान या देशांनी पाकची बाजू घेत भारताचा निषेध केला होता. याचे दुष्परिणाम आता या दोन्ही देशांना सहन करावे लागणार आहेत. भारतीय पर्यटकांनी या दोन देशांना अद्दल घडवण्याचे ठरवले असून सोशल मीडियावर या देशांच्या पर्यटनावर बहिष्कार घालण्याचे आवाहन […]Read More

देश विदेश

भारताने चीन विरोधात केला डिजिटल स्ट्राइक

नवी दिल्ली, दि. १४ : भारत पाक संघर्षात नेहमीच पाकची पाठराखण करणाऱ्या चीनने ऑपरेशन सिंदूरबाबत देखील अपप्रचार केला आहे. याची गंभीर दखल घेत भारताने आज चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्स आणि शिन्हुआच्या X हॅण्डलवर भारतात बंदी घातली आहे. चीनकडुन या माध्यमांद्वारे भारतीय लष्कराबाबत सातत्याने तथ्यहीन आरोप केले जात होते. यानंतर भारतीय दूतावासाकडून त्यांना कडक शब्दांत […]Read More

राजकीय

महाराष्ट्रात ५,१२७ कोटींची थेट परकीय गुंतवणूक; २७,५१० रोजगाराच्या संधी

मुंबई, दि. १४ :– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन तसेच ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यात आज महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उद्योग सचिव डॉ.पी.अन्बळगन आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सचे अध्यक्ष आर.के.नारायणन यांच्यात हा करार स्वाक्षरीत झाला. यावेळी उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी […]Read More

ऍग्रो

डाळिंबाची बाग वाचवण्यासाठी कुसुम सोलर योजनेचा फायदा.

जालना दि १४–जिल्ह्यातील अंबड तालुक्यात याही वर्षी भीषण पाणी टंचाई आहे.विहिरींनी तळ गाठल्याने त्यातच विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकऱ्यांना पिकांसाठी पाण्याचे नियोजन करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.रात्री बेरात्री लाइट आली की शेतात जाऊन मोटार चालू करण्यासाठी पळावे लागत आहे.दिवसभर उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने मोसंबी,डाळिंबाच्या बागा मान टाकू लागल्या आहेत. जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील शेतकरी […]Read More

महाराष्ट्र

ज्येष्ठ पोलीस निरीक्षक एक लाख रुपयांची लाच घेताना पकडला

मुंबई: दिनांक 14शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक बापूराव मधुकर देशमुख यांना मंगळवारी रात्री त्यांच्याच पोलीस स्टेशनमध्ये एक लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली.याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे. १५ ऑगस्ट २०२४ रोजी शिवाजीनगर मधील एका शाळेत काही लोक कुलूप तोडून जबरदस्तीने घुसले. शाळेच्या एका ट्रस्टीने त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशन व चॅरिटी कमिशनर यांच्याकडे तक्रार […]Read More