Month: October 2024

ऍग्रो

पूरग्रस्त महाराष्ट्राला केंद्राकडून 1,492 कोटींचा अग्रिम वितरित

मुंबई, दि. २ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिवृष्टी तसेच पूरामुळे बाधित, देशातील 14 राज्यांना केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून 5 हजार 858 कोटी 60 लाख रुपयांचा अग्रिम निधी वितरीत केला असून त्यापैकी सर्वाधिक 1 हजार 492 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले आहेत.यासाठी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यानी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार […]Read More

महिला

इतर मुलींना संन्यासी बनण्यास प्रोत्साहित का करता? मद्रास उच्च न्यायलयाचा

सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या ‘इशा फाऊंडेशन’बाबत गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा चालू आहे. भारतासह जगभरात अनुयायी असणाऱ्या इशा योगा केंद्राविरोधात एका निवृत्त प्राध्यापकानं मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याबाबत न्यायालयात रीतसर सुनावणी चालू आहे. वासुदेव यांनी स्वतःच्या मुलीचे लग्न करून तिचे जीवन स्थिर केले आहे, पण ते इतर मुलींना संन्यासी बनण्यास प्रोत्साहित का […]Read More

ट्रेण्डिंग

कंपनी असावी तर अश्शी! नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला परत कामावर

टेक इंडस्ट्रीतील दिग्गज कंपनी Google ने आपल्या एका माजी कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेतले आहे. विशेष म्हणजे, यासाठी कंपनीला मोठी रक्कम मोजावी लागली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस(Ai) जीनियस म्हटल्या जाणाऱ्या या व्यक्तीचे नाव नोम शजिर आहे. गुगलवर रागावून त्याने नोकरीचा राजीनामा दिला होता. आता गुगलने त्याला पुन्हा कामावर घेण्यासाठी तब्बल 2.7 बिलियन डॉलर्स, म्हणजेच सुमारे 22 हजार […]Read More

ऍग्रो

पर्यावरण संवर्धनाबरोबर शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी बांबू शेती ठरणार कल्पवृक्ष

मुंबई दि.1(एमएमसी न्यूज नेटवर्क): ग्लोबल वॉर्मिंग व पर्यावरणाची होत असलेली हानी थांबवण्यासाठी बांबू चे झाड खूप महत्वाची भूमिका बजावणार असून बांबू आता कल्पवृक्ष ठरणार आहे. शेतकरी आत्महत्या व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीही बांबू शेती फायद्याची ठरणार आहे अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी मंगळवारी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. […]Read More

महानगर

हवाई सेवेच्या धर्तीवर एसटीच्या ई- शिवनेरी बस मध्ये “शिवनेरी सुंदरी”….

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :- मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातीथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार असून, प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे असे प्रतिपादन […]Read More

महानगर

हरित लवादाकडून ठाणे मनपाला १०२ कोटी रुपये दंड

पुणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देसाई खाडीच्या हद्दीत येत असलेल्या उल्हास नदीच्या पात्रात प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे महापालिकेला तब्बल १०२.४ कोटी नुकसान भरपाई देण्याचे आदेश पुणे हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. पर्यावरणीय हानीसाठी ही दंडाची रक्कम ठाणे महापालिकेला भरावी लागणार आहे. मुंब्रा येथील सामाजिक कार्यकर्ते आरिफ इराकी […]Read More

देश विदेश

3 ऑक्टोबरपासून रंगणार T-20 महिला विश्वचषक स्पर्धा

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला टी-20 विश्वचषक 2024 UAE (दुबई)मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. 3 ऑक्टोबरपासून या महिला टी-20 विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाने तीन वेळा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. यंदा ऑस्ट्रेलिया आणि भारत यांना अंतिम सामन्याचे प्रतिस्पर्धी मानले जात आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात खेळवला जाणार […]Read More

देश विदेश

शास्त्रज्ञांनी तयार केले स्वप्न रेकॉर्ड करणारे मशिन

टोकियो, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वप्नामध्ये दिसणाऱ्या विविध घटना, व्यक्ती, प्रसंग यांबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. काहीवेळा आपल्याला जागे झाल्यावर स्वप्न आठवतात. तर काहीवेळा आठवत नाहीत. जगभरातील शास्त्रज्ञ स्वप्नांच्या दुनियेला वैज्ञानिक कसोट्यांवर उलगडण्याचा प्रयत्न करत असतात. AI च्या मदतीने ही स्वप्न आता रेकॉर्ड करता येणार आहेत. जपानमधील शास्त्रज्ञांनी स्वप्न रेकॉर्ड करणारे […]Read More

राजकीय

आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ राज्य सरकारविरोधात न्यायालयात

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवून देशाचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंना खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांना शासकीय नोकरी देणे ही जबाबदार शासनाचे कर्तव्य मानले जाते. मात्र अनेकदा खेळाडू मैदान गाजवत असतात तो पर्यंतच त्यांना महत्त्व दिले जाते. त्यानंतर शासनाकडून योग्य ते सहकार्य होत असल्याचे दिसत नाही. असाच प्रकार आंतरराष्ट्रीय रोईंगपट्टू दत्तू भोकनळच्या […]Read More

महिला

सोशल मिडियाच्या अतिवापरामुळे भारतीय महिला आळशी, WHO चा अहवाल, पुरूषांचे

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या सोशल मिडियाचा वापर खूप वाढला आहे. अनेक गोष्टी यामुळे शक्य झाल्या आहेत. ऑनलाईन कामे करणे सोपे झाले आहे. मात्र इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबवर रील, व्हिडिओ पाहण्यात अनेकजण आपला खूप वेळ घालवतात. यात महिलांचे प्रमाण जास्त असल्याचं आणि त्यामुळे त्या आळशी झाल्याचं एका संशोधनात म्हटलं आहे. यात पुरूषांचे प्रमाण […]Read More