Month: July 2024

ट्रेण्डिंग

ओडीशामध्ये क्षेपणास्त्र चाचणीसाठी १० हजार लोकांचे तात्पुरते स्थलांतर

भुवनेश्वर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओडिशातील बालासोर येथे आज क्षेपणास्त्राची चाचणी होणार असून त्यासाठी 10 गावांतील 10 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. क्षेपणास्त्राची चाचणी बालासोरच्या चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्टिंग रेंज (ITR) च्या लॉन्च पॅड-3 वरून केली जाईल. याशिवाय डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने अद्याप क्षेपणास्त्राशी संबंधित कोणतीही माहिती […]Read More

देश विदेश

Google Map कडून शुल्कात मोठी कपात

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Goggle Map या लोकप्रिय App ची भारतीय बाजारपेठेतील मक्तेदारी आता हळूहळू कमी होत आहे. काही दिवसांपूर्वीच Ola ने Google Map चा वापर थांबवून स्वतःचे App विकसित केले आहेत. त्यानंतर आता Goggle Map ने व्यावसायिक खेळी खेळत भारतीय वापरकर्त्यांसाठी असलेल्या शुल्कात मोठी कपात केली आहे. Goggle Map ने आपल्या […]Read More

देश विदेश

BMW ची इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात दाखल

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध मोटर कंपनी BMW ने भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्रात धमाकेदार एन्ट्री करत CE 04 ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व वेगवेगळ्या सुविधांनी सज्ज असलेल्या या स्कूटरची एक्स शोरूम किंमत १४.९० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. सध्या ही स्कूटर सिंगल व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पूजा खेडकरला वैद्यकीय प्रमाणपत्र देणारे एक डॉक्टर ठरले निर्दोष….

पुणे, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :यूपीएससीकडून कारवाई करण्यात आलेली वादग्रस्त ट्रेनी आयएएस पूजा खेडकर हिच्याबद्दल आणखी एक माहिती पुढे येत आहे. पुजाने जे प्रमाणपत्र पिंपरी चिंचवडच्या वायसीएम हॉस्पिटलमधून मिळवले होते, ते प्रमाणपत्र देणारे डॉक्टर तपासात निर्दोष सापडले आहेत . त्या प्रमाणपत्रावर तिला ना शिक्षणात लाभ घेता येत होता ना नोकरीत. त्यामुळे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर […]Read More

राजकीय

मंत्री अब्दुल सत्तार हाजीर हो…..

छ. संभाजीनगर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील सिल्लोड न्यायालयात दाखल फौजदारी याचिका क्रमांक 461/2023 मध्ये दिवाणी तथा फौजदारी न्यायालय सिल्लोड यांनी राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांना समन्स बजावण्याचे आदेश दिले आहेत. काल न्यायालयामार्फत हे समन्स जारी करण्यात आले आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांना न्यायालयात हजर होऊन नियमित जामीन घ्यावा लागणार आहे. या प्रकरणातील […]Read More

महानगर

केंद्रात काँग्रेस पक्षाचं सरकार आल्यावर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणार

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी काँग्रेस पक्षाने सातत्याने मागणी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने देखील यासाठी पाठपुरावा केला होता. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, खासदार प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जाची मागणी संसदेत केली. संसदेमध्ये या मागणीसाठी महाविकास आघाडीने सातत्याने आवाज उठवला आहे. परंतु भाजपाचे […]Read More

गॅलरी

औदुंबर येथील श्री दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी

सांगली, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृष्णा आणि कोयना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ गतीने होत आहे. काल सायंकाळ पासून सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथिल श्री दत्त मंदीरात कृष्णा नदीचे  पाणी शिरले. तर आज मंदिराच्या गाभा-यात पाणी गेले आहे. यामुळे पुजार्यांकडून गुरू नामाच्या गजरात मंदिराला प्रदक्षिणा घालून देव […]Read More

खान्देश

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जळगावात पाऊस…

जळगाव, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जळगाव शहरासह जिल्हाभरात सकाळपासूनच मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली असून शहरातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा तर या पावसामुळे शेतीला देखील फायदा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसह नागरिकांना चांगल्या पावसाची अपेक्षा होती. आज सकाळपासून जिल्हाभरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच सकाळपासून […]Read More

महानगर

तानसा तलाव आज भरुन ओसंडून वाहू लागला

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी तानसा तलाव आज भरुन ओसंडून वाहू लागला. आज दुपारी ४ वाजून १६ मिनिटांनी हा तलाव ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. यापूर्वी २० जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता. तर आज त्यापाठोपाठ […]Read More

महानगर

वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा उद्यापासून सुरू होणार

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात वनवा पेटू नये. महाराष्ट्र शांत रहावा. सलोखा टिकून रहावा या दृष्टिकोनातून आम्ही 25 तारखेपासून आरक्षण बचाव यात्रा सुरू करत आहोत. उद्या चैत्यभूमीपासून ही यात्रा सुरू होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, […]Read More