mmcnews mmcnews

विदर्भ

शेतक-यांना शाश्वत शेतीकडे वळविण्यासाठी ‘मिशन’

अमरावती, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, आहार व जीवनशैलीतील बदल यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊन आजार वाढले. जगाला आता पुन्हा पौष्टिक तृणधान्य व नैसर्गिक शेतीची गरज भासू लागली आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्राला शाश्वत शेतीकडे नेण्यासाठी शासनाकडून ‘मिशन’ राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज केले. कृषी विभाग […]Read More

महानगर

20 वर्ष जुनी इमारत तडकली…सुदैवाने जीवितहानी नाही …

ठाणे, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डोंबिवली पूर्वेकडील निळजे लोढा हेवन परिसरातील शांती उपवन कॉम्प्लेक्स मधील एका इमारतीला भला मोठा तडा गेल्याची घटना शनिवारी रात्री घडली. इमारतीमधील रहिवाशांना जोरदार आवाज झाला त्यामुळे तात्काळ इमारतीमधील रहिवाशांनी इमारती बाहेर धाव घेतली त्यामुळे जीवित हानी टळली. शांतीवन ही कॉम्प्लेक्स सुमारे 22 वर्षे जुनी आहे या कॉम्प्लेक्स मध्ये 240 कुटुंब […]Read More

कोकण

सचिन धर्माधिकारी यांना डी. लिट प्रदान

नवी मुंबई,दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संचालक सचिन धर्माधिकारी यांना आज राजस्थान येथील जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवी (डी. लिट्.) प्रदान करण्यात आली. वाशी येथील एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री महाराष्ट्रभूषण आप्पासाहेब धर्माधिकारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]Read More

देश विदेश

जगातील बेस्ट सँडविचच्या यादीत वडापाव १३ व्या स्थानी

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील सर्वसामान्यांचे आवडते स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव. धावपळीच्या आयुष्यात अनेकांच्या पोटाला आधार देणारा आणि खिशाला परवडणारा आपला आवडता चटकदार वडापाव आता जागतीक क्रमवारीत जाऊन पोहोचला आहे. जगातील बेस्ट सँडविचच्या यादीत वडापाव १३ वे स्थान मिळाले आहे. टेस्ट अॅटलास (Taste Atlas) या संस्थेने जगातील सर्वश्रेष्ठ खाद्यपदार्थांची रॅंकीगसाठी […]Read More

महानगर

मुंबईत हापूस आंब्याची आवक वाढली

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणच्या हापूस आंब्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या चार दिवसांपासून नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत हापूसची आवक वाढली आहे. दिवसाला साधारण दहा हजारहून अधिक पेट्या बाजारात दाखल होत आहेत. आवक वाढल्याने दर काही प्रमाणात कमी होण्याची शक्तया वर्तवण्यात येत आहे. सध्या हापूस आंबा २ हजार ते ७ […]Read More

शिक्षण

12 वीचा पेपर शिक्षकाने फोडला, या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचले

दादर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली होती. झी २४ तासने सर्वप्रथम ही बातमी दिली होती. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यानंतर साखरखेर्डा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पाच आरोपींना अटक केली आहे. कलम 420, 120 बी, आणि […]Read More

आरोग्य

ICMR चा सावधगिरीचा इशारा , H3N2 व्हायरसच्या रुग्णांत वाढ

नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून थंडी आणि उन्हाळा असे टोकाचं हवामान देशातील बहुतांश भागात दिसून येत आहे. त्यामुळे इन्फ्लूएंझा (फ्लू)च्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीसह देशातील बहुतेक भागांमध्ये H3N2 विषाणूचा उद्रेक दिसून येत असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने स्पष्ट केले आहे H3N2 प्रादुर्भावाची लक्षणे […]Read More

विदर्भ

राम मंदिराला 100 वर्ष पूर्ण, राम झुला येथे दिव्यांची सजावट

नागपूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 4 मार्च 1923 रोजी नागपूरात पोद्दारेश्वर राम मंदिराची स्थापना करण्यात आलेली होती. नागपूर शहरातील प्रसिद्ध असलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्य मंदिर नागपुरातील प्रसिद्ध असलेल्या रामझुलाच्या पुलावर काल दिव्यांची आकर्षक रोषणाई, सजावट करण्यात आली होती.100 years of Ram temple, decoration of lamps at Ram Jhula मंदिराच्या बाजूला असलेल्या […]Read More

मराठवाडा

कांदा खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको

बीड, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीड जिल्ह्यातल्या कड्यामध्ये कांदयाला भाव मिळावा आणि नाफेडची खरेदी तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले.Stop the road for demand to start buying onion आष्टी तालुक्यातील कडा येथे शिवसंग्राम पक्षाकडून अहमदनगर – बीड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कांदयाला भाव मिळावा,नाफेडची खरेदी तात्काळ सुरू करण्यात यावी यासह अन्य […]Read More

मराठवाडा

माजी केंद्रीय मंत्र्याच्या भावाने केली आत्महत्या

लातूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाने आत्महत्या केली असून स्वतः वर गोळी झाडून घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे . चंद्रशेखर पाटील चाकूरकर वय 81 हे लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात राहत होते..ते शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत भाऊ आहेत ..दररोज ते सकाळी फिरायला बाहेर जात असत.. […]Read More