Month: February 2026

राजकीय

डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही;

मुंबई दि २५ :एसटी महामंडळाच्या डिझेल खरेदीसंदर्भातील निविदा प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा कडक इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला. काही कंपन्यांकडून माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवून निविदा प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले असून, अशा प्रयत्नांना अजिबात भीक घातली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्री […]Read More

राजकीय

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३% वाढ

मुंबई दि २५ : राज्य शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात येणार आहे. यासंदर्भात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधान परिषदेत निवेदन सादर केले. मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी […]Read More

राजकीय

मानखुर्द-शिवाजीनगरमधील विषारी हवेमुळे जनजीवन विस्कळीत

मुंबई: मानखुर्द-शिवाजीनगर आणि मुंबईतील विषारी हवेला कचऱ्याचे ढीग, डंपिंग ग्राउंड आणि बायो-वेस्ट कंपन्यांइतकीच सरकारही जबाबदार आहे. सतत वाढणाऱ्या प्रदूषणामुळे येथील रहिवाशांचे सरासरी वय घटून केवळ ३९ वर्षे उरले आहे, तरीही सरकार कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे. सरकारच्या नजरेत गरिबांच्या जिवाची काहीच किंमत नाही का? असा सवाल करत समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आसिम आझमी […]Read More

राजकीय

राज्यात बेकायदा किडन्या विक्रीप्रकरणात विशेष चौकशी पथक स्थापन

मुंबई दि. २५ : राज्यातील एकोणीस नाही तर नऊ लोकांच्या किडन्या बेकायदेशीर पणे काढण्याच्या घटना घडल्या आहेत, त्यावर सखोल चौकशी करण्यात येत आहे, सर्व संबंधित लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना अतुल भातखळकर यांनी उपस्थित केली होती त्यावर विजय वडेट्टीवार, अर्जुन खोतकर, योगेश सागर यांनी […]Read More

राजकीय

चंद्रपुरात लोहखनिज खाणीसाठी वनविभागाची परवानगी नाहीच

मुंबई दि २५ : चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी तालुक्यातील लोहारडोंगरी येथील वनविभागाची कोणतीही जागा लोहखनिज खाणीसाठी देण्यात आलेली नाही, कोणालाही वन विभागाने अद्याप मंजुरी दिलेली नाही असा खुलासा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत केला. याबाबतचा प्रश्न अस्लम शेख यांनी उपस्थित केला होता. यावर नितीन राऊत, आदित्य ठाकरे यांनी उपप्रश्न विचारले. राज्य वन्यजीव मंडळाने या लोहखनिज प्रकल्पाला […]Read More

महानगर

कोकणातील आंबा बागायतदारांना तातडीने नुकसान भरपाई द्या – आमदार सुनिल

मुंबई, दि २४कोकणच्या सुप्रसिद्ध हापूस आंबा ला राज्य फळाचा दर्जा देण्यात आला आहे, ही अभिमानाची बाब असली तरी शासनाच्या विद्यमान नियमांनुसार २२ नाशवंत फळांना हमीभाव देता येत नाही आणि त्या यादीत हापूस आंब्याचा समावेश करण्यात आला आहे. हा निकष आंबा पिकाला लागू करणे अन्यायकारक असून आंबा पिकाला हमीभाव देण्यासाठी शासनाने तातडीने विशेष निर्णय घ्यावा अशी […]Read More

ट्रेण्डिंग

एलिफंटा लेण्यांची स्वयंचलित डिजिटल ऑडिओ टूर

युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेल्या घारापुरी (एलिफंटा) लेण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) एक अभिनव भेट दिली आहे.या ऐतिहासिक लेण्यांची माहिती आणि त्यांचे प्राचीन महत्त्व अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आता ‘स्वयंचलित डिजिटल ऑडिओ टूर’ (Self-guided Digital Audio Tour) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या मुंबई मंडळाने सुरू केलेला […]Read More

मनोरंजन

जगप्रसिद्ध पॉप स्टार शकीरा पुन्हा भारत दौऱ्यावर

मुंबई, दि. 24 : आपल्या ठराविक शैलीतील डान्स आणि आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी जगप्रसिद्ध पॉप स्टार आणि ग्रॅमी पुरस्कार विजेती गायिका शकिरा पुन्हा एकदा भारतात येत आहे. शकिरा एप्रिल महिन्यात मुंबई आणि दिल्लीत भव्य कॉन्सर्ट करणार आहे. ‘फीडिंग इंडिया’ या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने आणि झोमॅटोच्या ‘डिस्ट्रिक्ट’ प्लॅटफॉर्मच्या सहकार्याने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. […]Read More

देश विदेश

प्रहार – नवीन राष्ट्रीय दहशतवादविरोधी धोरण जाहीर

नवी दिल्ली, दि. २४ : देशाची अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे धोरण जाहीर केले आहे. गृह मंत्रालयाने देशाचे नवीन राष्ट्रीय दहशतवादविरोधी धोरण आणि रणनीती जाहीर केली असून, याला ‘प्रहार’ (PRAHAAR) असे नाव देण्यात आले आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये दहशतवादाचे स्वरूपही बदलत असून, त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हे व्यापक धोरण तयार करण्यात […]Read More

ट्रेण्डिंग

केरळ राज्याचे नाव आता बदलणार

थिरुवनंतपुरम, दि. २४ : केरळ राज्याचे नाव आता लवकरच बदलणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून केरळ राज्याचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळाने, आज ‘केरळ’ या राज्याच्या नावात बदल करून ते ‘केरलम ’ असे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या मंजुरीनंतर भारताचे राष्ट्रपती ‘केरळ (आल्टेरेशन ऑफ नेम ) बिल , 2026’ हे विधेयक […]Read More