Month: February 2026

अर्थ

चहा निर्यातीत भारताचा नवा विक्रम

मुंबई, दि. ९ : करोडो भारतीयांचे सर्वांधिक पसंतीचे पेय म्हणजे चहा. आपल्या देशात तयार होणाऱ्या चहाचे सर्वाधिक ग्राहक भारतीयच आहोत. मात्र आता भारताने चहा निर्यांतीत एक मोठा विक्रम केला आहे. भारताची चहा निर्यात २०२५ मध्ये सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. ही वाढ प्रामुख्याने इराण आणि इराकमधून होणारी मोठी खरेदी आणि चीनकडून वाढती मागणी यामुळे झाली. भारतीय चहा […]Read More

शिक्षण

त्रिभाषा धोरणावरील जाधव समितीचा अहवाल सरकारला सादर

मुंबई, दि. ९ : महाराष्ट्रातील शाळांसाठी त्रिभाषा धोरण तयार करण्यासाठी गेल्या वर्षी स्थापन केलेल्या नरेंद्र जाधव समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. अर्थशास्त्रज्ञ-शिक्षणतज्ञ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील या बहुसदस्यीय समितीची स्थापना राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP) नुसार शाळांसाठी त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीला अंतिम रूप देण्यासाठी करण्यात आली होती. […]Read More

महानगर

उपनगरी मार्गावर लवकरच वंदे मेट्रो एसी लोकल

मुंबई, दि. 9 : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गाववरील प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित करण्यासाठी लवकरच आधुनिक वंदे मेट्रो एसी लोकल धावणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने अत्याधुनिक लोकल गाड्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण 238 नवीन रेक्स तयार करण्याची योजना आहे. या गाड्या विशेष डिझाईन, आधुनिक सुविधा आणि आरामदायी प्रवास लक्षात घेऊन तयार केल्या […]Read More

महानगर

पाणी स्वच्छता कर्मचारी आंदोलन घोषणांनी आझाद मैदान दणाणले..

मुंबई ता. ९: मुंबई येथे आझाद मैदानावर पाणी स्वच्छता कर्मचारी यांचे आंदोलनातील घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.महाराष्ट्र राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत स्वच्छ भारत मिशन व जल जीवन मिशन या योजनेमध्ये काम करणारे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कंत्राटी कर्मचारी यांचे मागील सुमारे पाच महिन्यापासून प्रलंबित मागण्यासाठी शासनाने मानधन दिलेले नाही. महाराष्ट्र न्याय प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

भारतीय संस्कृती जगभर प्रसिद्ध करण्यासाठी’ फॅशन वर्ल्ड टुर”चा पुण्यातून शुभारंभ

पुणे, दि ९: भारतीय परंपरा, संस्कृती आणि वारसा जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने कशिश फाउंडेशन आणि एफ स्टुडिओ इंटरनॅशनल तर्फे आयोजित ‘ फॅशन वर्ल्ड टुर”चा शुभारंभ कोथरूड , पुणे येथे करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे सौंदर्य, परंपरा आणि पौराणिक वारसा आंतरराष्ट्रीय मंचावर सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे ७५ पेक्षा अधिक […]Read More

राजकीय

भाजपा – महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांचा स्पष्ट कौल

मुंबई दि ९ : 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समिती निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी राज्यभरात क्रमांक एकचा पक्ष ठरला असून, या निकालांमधून भाजपा – महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांनी स्पष्ट पसंती दिली आहे. 12 जिल्हा परिषदांपैकी सर्व ठिकाणी भाजपा आणि महायुतीचीच सत्ता येणार असून 125 पंचायत समित्यांपैकी 50 पेक्षा अधिक ठिकाणी भाजपा सत्ता स्थापन करेल, […]Read More

महानगर

विक्रोळीतील संत श्री गजानन महाराज प्रकटदिन सोहळा भक्तिभावात संपन्न

मुंबई, दि ९घाटकोपर – विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर क्र. 2 मधील हुतात्मा रवींद्र म्हात्रे मैदानावर संत श्री गजानन महाराज (शेगाव) यांचा प्रकटदिन सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. संत श्री गजानन महाराज (शेगाव) सेवा मंडळ, विक्रोळी यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सकाळी महाराजांच्या प्रतिमेची विधीवत स्थापना व पूजाविधी पार पडला. दिवसभर भाविकांनी […]Read More

आरोग्य

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार पुर्वीप्रमाणे

मुंबई, दि 9: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार हे शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २३ ऑगस्ट २०२३ च्या शासन निर्णयान्वये अन्वये निशुल्क करण्यात आलेले असून ते आजही पूर्वीप्रमाणेच नि:शुल्क आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने 16 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या नागरिकांच्या सनदेमधील परिशिष्ठ-तीन मध्ये सेवा सुविधा पुरविण्यासाठी 6 जून 2015 च्या शासन […]Read More

राजकीय

हा तर भ्रष्टाचाराचा एक्सप्रेसवे! स्मार्ट सिटी नको, निदान एक्सप्रेसवे तरी

पुणे दि ९ : मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटून तब्बल ३० तास वाहतूक ठप्प राहिली. या कोंडीमुळे विशेषतः महिला, लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांचे हाल झाले. धक्कादायक बाब म्हणजे घटनेला पाच दिवस उलटूनही वाहतूक अजून पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. या घटनेतून एक्सप्रेसवेवरील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेचा पूर्ण अपयश समोर आले असून, अशा प्रसंगी जबाबदारी […]Read More

महानगर

मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यास काँग्रेस नगरसेवकांचे प्राधान्य, बीएमसीतील बँक ठेवीची श्वेतपत्रिका

मुंबई, दि 9 मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते अश्रफ आझमी यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी आज महानगरपालिकेतील पक्ष कार्यालयाची पाहणी करून कार्यालयाचा ताबा घेतला. या कार्यालयात वास्तूदोष असल्याचे सांगत शिंदेसेनेने ते नाकारले होते, वास्तूदोष हा ज्याचा त्याचा भावनेचा प्रश्न आहे, काँग्रेस पक्षासाठी मात्र सर्वसामान्य मुंबईकरांचे हित महत्वाचे आहे. कार्यालयाची दिशा महत्वाची नाही तर विकासाची दिशा […]Read More