Month: February 2026

महानगर

वंदे भारत एक्सप्रेस मध्ये होणारा मराठी वरील अन्याय दूर करणार

मुंबई, दि. १७: अहमदाबाद येथून मुंबई सेंट्रल येथे येणाऱ्या ‘वंदे भारत’ या सुपरफास्ट वातानुकूलित एक्स्प्रेस मध्ये जी उद्घोषणा करण्यात येते त्यात यापुढे मराठी भाषेवर अन्याय होऊ देणार नाही, मराठी भाषेत सर्वप्रथम उद्घोषणा करण्यात येईल, यासाठी उद्याच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात येईल असे निःसंदिग्ध आश्वासन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज […]Read More

महानगर

स्वच्छता व अतिक्रमण निर्मूलन मोहिमांचे सकारात्मक परिणाम

मुंबई, दि १७ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सखोल स्वच्छता मोहिमेचे तसेच फेरीवाला-मुक्त रस्ते व पदपथ धोरणाचे सकारात्मक व प्रत्यक्ष परिणाम आता नागरिकांना प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. सातत्यपूर्ण व काटेकोर अंमलबजावणीमुळे विविध प्रशासकीय प्रभागांतील रस्ते पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ, नीटनेटके व सुशोभित स्वरूपात दिसून येत आहेत. घनकचरा व्यवस्थापन (SWM) अधिक प्रभावीपणे राबविल्याने सार्वजनिक ठिकाणी कचरा साचण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी […]Read More

राजकीय

भाजपाने राज्यातील वातावरण बिघडवले, शिवप्रेमींची दिलगीरी

मुंबई, दि. १७ : भाजपाने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला, सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला व त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण […]Read More

महानगर

बंद बेस्ट इलेक्ट्रिक खांबामुळे शॉर्ट् सर्किट आणि अपघातात वाढ

मुंबई, दि १७करी रोड येथील महादेव पालव मार्गावरील ब्रिजवर बेस्ट खांबा अर्धवट अवस्थेमध्ये असल्यामुळे येथे शॉर्ट सर्किटमुळे मोठ्या प्रमाणात अपघातात वाढ होत आहे. या मार्गावर पुढे तर रोडचे मध्य रेल्वेचे स्थानक असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच या ठिकाणी असणारे पदपथ हे अत्यंत अरुंद असल्यामुळे आणि या पोलच्या वायरी बाहेर आल्या असल्यामुळे नागरिकांचा […]Read More

राजकीय

दादांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करा…

मुंबई दि. १७ – दादांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन […]Read More

ट्रेण्डिंग

कोणाचीही वैयक्तिक माहिती लीक करणे हा ठरेल गुन्हा

मुंबई, दि. १६ : आजच्या डिजिटल युगात व्यक्तीची वैयक्तिक माहिती ही सर्वात महत्त्वाची संपत्ती मानली जाते. मोबाईल नंबर, आधार कार्ड, बँक खाते तपशील, वैद्यकीय नोंदी किंवा सोशल मीडिया डेटा यांचा गैरवापर होणे म्हणजे थेट व्यक्तीच्या गोपनीयतेवर आघात होणे. भारतीय कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक माहिती परवानगीशिवाय लीक करणे हा गंभीर गुन्हा ठरतो. भारतामध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियम […]Read More

शिक्षण

शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देणाऱ्या प्रमाणपत्रांना स्थगिती

मुंबई, दि. 16 : एरव्ही महिनोमहिने फाईल्स धुळखात ठेवणाऱ्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांना अगदी ताबडतोबीने ७५ फाईल्स तत्काळ हातावेगळ्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गंभीर बाब म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय दुखवटा जाहीर झाल्याच्या काळात अल्पसंख्याक खात्याशी संबंधित राज्यातील ७५ शिक्षण संस्थांना फायलींवर सह्या करून अल्पसंख्यांक दर्जा दिल्याचे समोर […]Read More

ट्रेण्डिंग

या राज्यात आदिवासींनी उभारली कंपनी

चेन्नई, दि. १६ : तामिळनाडूतील निलगिरीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या १०० हून अधिक आदिवासी गावांनी एकत्र येऊन आदिमलाई ही कंपनी स्थापन केली आहे. कंपनीने महिलांच्या सहभागावर विशेष लक्ष दिले आहे. कंपनीच्या 60 कर्मचाऱ्यांपैकी 52 महिला आहेत. ही कंपनी नीलगिरीतील अनेक गावांना जोडून काम करत आहे. यात एकूण 1,809 भागधारक आहेत. यापैकी बहुतेक ग्रामीण आणि आदिवासी समुदायातील आहेत, […]Read More

पर्यटन

काश्मीरमधील १४ पर्यटनस्थळे पुन्हा खुली

श्रीनगर, दि. १६ : पहलगाम हल्ल्यानंतर बंद झालेली काश्मीरमधील पर्यटन स्थळे आता पुन्हा उघडण्यात येत आहेत. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी केंद्रशासित प्रदेशातील बंद असलेली 14 पर्यटन स्थळे पुन्हा उघडण्याची घोषणा केली. लेफ्टनंट गव्हर्नर म्हणाले की, संपूर्ण सुरक्षा आढावा आणि चर्चेनंतर मी काश्मीर आणि जम्मू विभागातील आणखी पर्यटन स्थळे पुन्हा उघडण्याचे आदेश दिले आहेत. […]Read More

शिक्षण

या राज्यात सुरू होतय पहिलं AI विद्यापीठ

अमरावती, दि. १६ : आंध्र प्रदेश सरकारने देशातील पहिले AI विद्यापीठ उभारण्याचे ठरवले आहे. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती येथे १९ फेब्रुवारीला ‘AI’ विद्यापीठाचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आंध्र सरकारचे माहिती तंत्रज्ञान सचिव भास्कर कटमनेनी यांच्या मते, हे विद्यापीठ आयआयटी आणि आयआयआयटी यापेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. […]Read More