Month: February 2026

महानगर

महापालिका समिती वाटपामध्ये नगरसेविका वनिता नरवणकर यांना डावलले.

मुंबई, दि १९ महापालिकेतील वैधानिक समित्यांच्या नव्या वाटपात नवनिर्वाचित शिवसेना नगरसेविका वनिता नरवणकर यांना एकाही समितीवर स्थान न मिळाल्याने शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाची चर्चा पुन्हा रंगली आहे.दक्षिण मुंबईतून शिवसेना शिंदे गटाच्या फक्त दोनच नगरसेविका निवडून आल्या त्यातील एक नगरसेविका यामिनी जाधव यांची स्थायी समितीवर वर्णी लागली असून दुसऱ्या निवडून आलेल्या वनिता नरवणकर यांची कोणत्याही समिती वर […]Read More

विदर्भ

अकोल्यात साकारली शिवाजी महाराजांची 30 हजार स्क्वेअर फूट रांगोळी

अकोला दि १९ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना म्हणून अकोल्यातील अकोट येथील श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पांडे व चतुर्भुज आर्टचे संचालक अनिल काळे यांच्या संकल्पनेतून ३०,००० स्क्वेअर फूट रांगोळी काढून महाराजांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. १५ विद्यार्थ्यांनी सहा दिवसाच्या अथक परिश्रमातून ही प्रतिमा साकारली आहे. पाच […]Read More

राजकीय

रस्ता रुंदीकरण, पाणी प्रश्नांवर नगरसेवकांची बैठक

नवनिर्वाचित नगरसेवकांनी पालिका अधिका-यांना विचारला जाब मुंबई, दि. १८ – भांडुप विधानसभेतील नागरी समस्या सोडविण्यासाठी पालिका उपायुक्त संतोषकुमार धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भांडुप मधील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक तसेच सर्व विभागातील पालिका अधिकारी उपस्थित होते. पाणी, सुलभ शौचालय, रस्ता रुंदीकरण या सारख्या विषयांवर जोरदार चर्चा करण्यात आली. भांडुप […]Read More

ट्रेण्डिंग

मृत व्यक्तीचा मोबाइल नंबर, सोशल मीडिया अकाऊंट्स वापरल्यास होणार कडक

मुंबई, दि. 18 : काही जण मृत नातेवाईकांचा सोशल मीडिया अकाऊंटसुद्धा स्वत: चालू ठेवतात, त्यात अपडेट्स टाकत असता. परंतु कायदेशीरदृष्ट्या हे अत्यंत चुकीचं आहे. यासाठी तुम्हाला 3 ते 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंडात्मक शिक्षा होऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याचा मोबाइल नंबर, व्हॉट्सअॅप अकाऊंट, ईमेल अॅड्रेस, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्रोफाइल्स वापरणं बेकायदेशीर आहे. […]Read More

ऍग्रो

नाशिकमधील द्राक्ष उत्पादक संकटात

नाशिक, दि. 18 : जिल्ह्यातील द्राक्षबागांवर नैसर्गिक वातावरणातील बदलाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात ढगाळ वातावरण असून सकाळी थंडी आणि ढगाळ हवेच्या कारणामुळे दुपारी उन्हाचा तडाखा बसत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे द्राक्षांवर थेट परिणाम होऊन त्यांचे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही प्रभावित होत आहेत. शेतकऱ्यांच्या मते, गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या […]Read More

महानगर

कोस्टल रोडवरील गाण्यामुळे रहिवासी त्रस्त

मुंबई,दि. १८ : मोठा गाजावाजा करून गेल्या आठवड्यात मुंबई कोस्टल रोडवर अत्याधुनिक परदेशी तंत्र वापरून ‘जय हो’ या गाण्याचा ट्रॅक सुरू करण्यात आला. ताशी 70 किमी वेगाने या रस्त्यावरून वाहन नेल्यास ‘जय हो’ ची धून ऐकू येण्याचे कुतूहल लगेचच ओसलले आहे. कारण या सतत वाजणाऱ्या गाण्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. ब्रीच कँडीच्या रहिवाशांकडून या […]Read More

मनोरंजन

अभिनेता प्रसाद ओकच्या कामगिरीचा विश्वविक्रम

मुंबई, दि. १८ : अभिनय कारकीर्दीची 25 वर्षे पूर्ण करत असतानाच प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक याने एक जागतीक विक्रम केला आहे. प्रसाद ओकने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये प्रसाद म्हणतोय की, ‘१३ मे २०२२ यादिवशी धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा सिनेमा किती यशस्वी झाला हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्या […]Read More

ट्रेण्डिंग

मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार e-vitaraलाँच

मुंबई, दि. १८ : Maruti Suzuki ने आपली पहिली इलेक्ट्रिक कार ई-विटारा भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ई-विटारा 49kWh आणि 61kWh च्या दोन बॅटरी पॅक पर्यायांसह आली आहे. कंपनीचा दावा आहे की, कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 543 किलोमीटरपेक्षा जास्त धावते. इलेक्ट्रिक SUV मध्ये 360 डिग्री कॅमेरा, एअरबॅग आणि लेव्हल-2 ॲडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टिम (ADAS) […]Read More

देश विदेश

राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक

मुंबई, दि. १८ : राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या १० राज्यांमधील ३७ जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. एप्रिल २०२६ मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातून सर्वाधिक ७ जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. १६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल आणि त्याच […]Read More

महानगर

बृहन्मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी व विविध समित्यांसाठी उमेदवारी अर्ज

मुंबई, दि १८बृहन्मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी श्री. प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी श्रीमती राजेश्री शिरवडकर, सुधार समिती अध्यक्षपदासाठी श्रीमती संध्या दोशी (सक्रे) यांनी आपले उमेदवारी अर्ज महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे यांच्याकडे आज दाखल केले. तर, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट) समितीसाठी श्रीमती तृष्णा विश्वासराव यांनी आपला उमेदवारी अर्ज ‘बेस्ट’चे सह सचिव […]Read More