Month: January 2026

राजकीय

अस्मितेचे राजकारण, २५ वर्षांची सत्ता, तरीही मराठी माणूस मुंबईतून हद्दपार….

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मराठी माणसांच्या अविरत कष्टांतून देशाची आर्थिक राजधानी म्हणून नावारूपाला आलेले हे शहर. आज याच मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वावर धोक्यात आले आहे. गेली जवळपास २५ वर्षे मुंबई महानगरपालिकेवर (BMC) शिवसेनेची आणि पर्यायाने उद्धव ठाकरे यांची सत्ता राहिली, त्या काळात मराठी माणसाची प्रगती झाली की अधोगती? याबाबत […]Read More

महानगर

विजयाचा निर्धार!

मुंबई, दि 8युवासेनाप्रमुख शिवसेना नेते मा. श्री आदित्यसाहेब ठाकरे यांनी प्रभाग क्र. ११४ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार राजूल संजय पाटील यांना व शाखेला भेट दिलीया भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश, आत्मविश्वास निर्माण झाला आणि सर्वांनी विजयाचा निर्धार केला.भांडुपमध्ये सुद्धा आम्ही जिंकणार कारण हा लढा केवळ निवडणुकीचा नाही, […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पर्यावरण तज्ञ डॉ माधवराव गाडगीळ यांचे निधन…

पुणे दि ८ : ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचं बुधवारी दि ७ जानेवारी रोजी रात्री प्रदीर्घ आजारपणामुळे पुण्यात निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते. माधव गाडगीळ यांचे पुत्र सिद्धार्थ गाडगीळ यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. पुण्यातल्या डॉ. शिरीष प्रयाग यांच्या रूग्णालया त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार चालू होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. […]Read More

राजकीय

ठाण्यासह एमएमआर क्षेत्राच्या विकासाकरीता कटीबद्ध…

ठाणे दि ८ : ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण एमएमआर क्षेत्रातील मुलभुत गरजांसह दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या वाहतुक कोंडी, कचरा आणि पाणी पुरवठयाच्या समस्यांवरील कृतीशील आराखड्याचे सविस्तर विवेचन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणेकरांना आश्वस्त केले. राजकारण विषयक कमी पण पर्यावरणपुरक विकासाचे व्हीजन मांडुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी भविष्यातील शहरांची रूपरेषा आकडेवारीसह उलगडली. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र […]Read More

राजकीय

अंबरनाथ मधील बारा काँग्रेस नगरसेवक अखेर भाजपात

ठाणे दि ८ : अंबरनाथ नगरपालिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या 12 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या नगरसेवकांना येत्या दोन ते तीन दिवसात भाजपात प्रवेश दिला जाईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. हे सर्व नगरसेवक अंबरनाथच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपात प्रवेश करत असल्याचेही त्यांनी […]Read More

देश विदेश

आता हा देश ताब्यात घेण्याचा अमेरिकेचा कावा

मुंबई, दि. ७ :अमेरिकेने व्हेनेझुएलामधील लष्करी हस्तक्षेपानंतर आता ग्रीनलँडवर दावा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या घडामोडींमुळे युरोप व NATO देशांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली असून डेन्मार्कने याला थेट विरोध दर्शविला आहे.व्हेनेझुएलामध्ये लष्करी कारवाई केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड या खनिजसंपन्न बेटावर दावा करण्याची इच्छा पुन्हा व्यक्त केली आहे. व्हाईट हाऊसने दिलेल्या निवेदनानुसार, […]Read More

महानगर

एजिस लॉजिस्टिक कंपनीतील कामगारांना भरघोस पगारवाढ

मुंबई, दि. ७ :कामगार चळवळीसमोर मिळालेले रोजगार टिकवणे अशी अनेक आव्हाने असतांनाही मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने माहुल येथील एजिस लॉजिस्टिक लिमिटेड कंपनीतील कामगारांना १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२६ असा तीन वर्षांसाठी भरघोस पगारवाढीचा करार केला आहे. या करारामुळे कामगारांना कमीत कमी ६१६८ रुपये तर जास्तीत जास्त ८६०० रुपये […]Read More

राजकीय

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आयोगाचे आदेश

मुंबई, दि. ७ : महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत.महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान व मतमोजणीची तयारी आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात सर्व 29 […]Read More

राजकीय

हि मुंबई वाचविण्याची लढाई आहे, उमेदवारांची नाही – सचिन अहिर

मुंबई, दि. ७ – बंडखोरांना मतदान करणे म्हणजे भाजपाला मतदान करण्यासारखे आहे. ही लढाई उमेदवारांची नसून मुंबईला वाचविण्याची लढाई आहे. असे वक्तव्य शिवसेना उपनेते, आमदार सचिन अहिर यांनी भांडुप मध्ये केले. शिवसेना (उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षा (शिवशक्ती) च्या प्रभाग क्रमांक ११४ च्या उमेदवार राजुल पाटील यांच्या प्रचारासाठी सचिन […]Read More

महिला

पालघरमध्ये आदिवासी महिलेची ३ लाखांना विक्री, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पालघर, दि. ७ : काही वर्षांपूर्वीच ठाणे जिल्ह्यातून वेगळा झालेल्या आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यात पोलिसांनी लग्नाच्या बहाण्याने २० वर्षीय आदिवासी महिलेला ३ लाख रुपयांना विकल्याच्या आणि तिचा छळ केल्याच्या आरोपावरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती आज एका अधिकाऱ्याने दिली. कातकरी समाजाच्या या […]Read More