मुंबई, दि. १९ : बिहार सरकारने दिल्लीतील ‘बिहार भवन’च्या धर्तीवर आता मुंबईतही ‘बिहार भवन’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासकीय कामकाज आणि जनकल्याणाला चालना देण्यासाठी ही ३० मजली अत्याधुनिक इमारत उभारली जाणार असून, जागेची निश्चिती आणि बजेट मंजुरी पूर्ण झाली आहे.बांधकाम विभागाचे सचिव कुमार रवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे भवन मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एल्फिन्स्टन इस्टेट परिसरात […]Read More
मुंबई, दि. १९ : १५ जानेवारीला पार पडलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तब्बल १,००,३२७ मतदारांनी ‘NOTA’ (यापैकी कुणीही नाही)** हा पर्याय निवडला. एकूण ५४.७६ लाख मतदारांपैकी हे प्रमाण १.८३% इतके आहे. २०१७ मध्ये ही संख्या ८७,६२३ होती. सर्वाधिक NOTA मतांची नोंद:** सर्वात कमी NOTA मतांची नोंद:** एकूण मतदानाचा टक्का ५२.९४% इतका नोंदवला गेला असून, NOTAचा वापर […]Read More
मुंबई, दि १९- मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपांइं महायुतीचा महाविजय झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे नेतृत्व राजकीय करिष्मा करणारे नेतृत्व आहे. रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष ज्यांच्यासोबत जातो त्यांनाच सत्ता मिळते. रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळेच मुंबईत महायुतीचा महाविजय झाला आहे असा दावा रिपब्लिकन पक्षाच्या […]Read More
नवी दिल्ली, दि. १९ : भारत आणि संयुक्त अरब अमिराती UAE यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांना अधोरेखित करणारी एक महत्त्वपूर्ण घटना आज घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉल मोडून स्वतः दिल्ली विमानतळावर जाऊन UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांचे स्वागत केले. साधारण दोन तासांच्या या अल्पकालीन दौऱ्याने जागतिक स्तरावर उत्सुकता निर्माण केली आहे. […]Read More
मुंबई, दि १९मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 208 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रमाकांत रहाटे आणि शिंदे सेनेचे विजय लिपारे हे रिंगणात होते. रमाकांत रहाटे हे गेले तीन टर्म या प्रभागात नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत.त्यांनी प्रभागात कामे देखील केलेली आहेत. त्यातच मराठी बहुल वस्ती असलेल्या या भागात ठाकरे यांना मनसेची साथ मिळाल्याने मराठी माणूस एकत्र […]Read More
मुंबई, दि १९चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यामुळे नागरिक हैराण झाले असून हे खड्डे त्वरित बुजवावे अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहे. हे खड्डे एवढे मोठे आहेत की या खड्ड्यांमध्ये दुचाकीची चाक अडकून मोठ्या प्रमाणात अपघात वारंवार घडत आहेत. तसेच या खड्ड्यांमध्ये घाणीचे पाणी साचून चाकरमान्यांच्या अंगावर उडून कपडे खराब […]Read More
पालघर, दि. १९ : वसई किनाऱ्यापासून सुमारे ६६ नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात गेल्या दहा दिवसांपासून एक रहस्यमय गोलाकार रिंगण दिसून येत आहे. मासेमारी करून परत येणाऱ्या स्थानिक मच्छिमारांच्या निदर्शनास ही विचित्र घटना आली असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. वसई, विरार भागातून मोठ्या संख्येने बोटी मासेमारीसाठी […]Read More
बिजींग, दि. १९ : काही वर्षांपूर्वी जगातील सर्वांधिक लोकसंख्येचा देश म्हणून प्रसिद्ध असलेल्या चीन चा जन्मदर आता गंभीररित्या घसरला आहे. चीन सरकारने आज जाहीर केले की, 2025 मध्ये 79.2 लाख मुलांचा जन्म झाला, तर 2024 मध्ये ही संख्या 95.4 लाख होती. तर 2025 मध्ये मृतांची संख्या वाढून 1.13 कोटी झाली. 1949 मध्ये आधुनिक चीनच्या स्थापनेपासून […]Read More
मुंबई, दि १९आशयसंपन्न कथा असलेल्या मराठी चित्रपटांमध्ये आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला मन आतले मनातले हा चित्रपट १३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. सूर्य फिल्म वर्ल्ड प्रस्तुत “मन आतले मनातले” या चित्रपटाची निर्मिती सुरेन महापात्रा यांनी केली आहे. सुरेन महापात्रा यांनी […]Read More
मुंबई, दि १९महापालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेनेच्या महायुतीच्या विकासाच्या धोरणाला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत मुंबईतील मतदारांनी महायुतीला भरभरून कौल देत उबाठा सेनेला त्यांची जागा दाखवून दिली आहे. जनमताचा आदर राखत मुंबई महापालिकेचा महापौर महायुतीचा होणार आहे आणि महायुतीचा भगवा फडकणार आहे. ज्या दिवशी मुंबई महापालिकेचा महापौर महायुतीचा होईल तो दिवस मुंबईकरांसाठी सुवर्ण दिवस असणार […]Read More