Month: November 2025

पर्यावरण

अन्नपदार्थ नद्या आणि तलावांमध्ये फेकण्यास पूर्णपणे बंदी

मुंबई, दि. ५ : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) जप्त केलेले, नाकारलेले आणि कालबाह्य (Date Expired) झालेले अन्नपदार्थ नद्या, तलाव किंवा खुल्या भागात टाकण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. मंगळवार, ४ नोव्हेंबर रोजी, FSSAI ने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आयुक्तांना एक आदेश जारी केला. या सूचनांमध्ये असे म्हटले आहे की विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेचे पर्यवेक्षण […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात १ लाख २५ हजार दिव्यांची आरास

पुणे दि ५ : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात कळसापासून गाभा-यापर्यंत सुमारे १ लाख २५ हजार दिव्यांनी संपूर्ण मंदिर सजविण्यात आले. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबतच मोबाईल कॅमे-यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, […]Read More

महानगर

मत्स्योत्पादन मंत्री नितेश राणे मच्छीमार बांधवांच्या हिताबद्दल काहीही बोलत नाहीमिल्टन

मुंबई, दि ५पर्ससीन मासेमारीला मत्स्यखात्यातील भ्रष्ट अधिकारी अभय देत असल्याने सरकारी तिजोरीची बेमालुमपणे लूट सुरू असल्याचा आरोप करीत पर्ससीन, एलईडी मासेमारीची विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी करण्याची मागणी ‘पारंपरिक मच्छिमार संरक्षण समिती’ने केली आहे. ‘एकेकाळी पर्ससीन बोटीवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अंगावर ‘बांगडा फेक’ आंदोलन करणारे कोकणचे आमदार नितेश राणे मत्स्यमंत्री झाल्यानंतर पारंपरिक मच्छिमारांच्या […]Read More

महानगर

बेस्ट उपक्रमाने स्वमालकीच्या बस गाड्या कायमस्वरूपी राखाव्यातशशांक राव, बेस्ट वर्कर्स

मुंबई, दि ५मुंबई महापालिकेच्या बेस्ट बस उपक्रमाने स्वमालकीच्या ३,३३७ बसगाड्या कायमस्वरूपी राखाव्यात या ११ जून २०१९ रोजी बेस्ट वर्कर्स युनियन सोबत झालेल्या कराराचे पालन केले गेले नाही.२०१८नंतर एकही स्वमालकीची बेस्ट बस विकत घेतली नाही. त्यामुळे ७५ वर्षानंतर आजघडीला बेस्ट उपक्रमाकडे स्वमालकीच्या केवळ २५१ बस गाड्या आहेत. सेवानिवृत कर्मचाऱ्यांची १ कोटींच्यावर ग्रॅच्युइटीची रक्कम पालिकेत थकीत आहे, […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

श्याम ग्लोबल टेक्नोवेंचर्स कडून ‘इंटेलीपार्क’ – स्पेस सेविंग स्मार्ट पार्किंग

पुणे, दि ५मुंबई, पुणे सारख्या महानगरांतील पार्किंग समस्या सुटण्यास नवी दिशा पुणे :वेगाने वाढणारे शहरीकरण आणि मर्यादित जागा यामुळे देशातील महानगरांमध्ये पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. प्रत्येक कुटुंबाकडे एकापेक्षा अधिक वाहने असताना, पार्किंगसाठी जागा कमी पडते आहे. या आव्हानाला उत्तर देण्यासाठी श्याम ग्लोबल टेक्नोवेंचर्स प्रा. लि. ने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘इंटेलीपार्क – स्पेस […]Read More

गॅलरी

वरळी नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे कला प्रदर्शन

मुंबई, दि ५: वारसा व निसर्गावर आधारित टेक्सचर्स अँड टोन्सची कला प्रदर्शनी वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे भरवण्यात आली आहे. एकसारख्या व्यावसायिक शिस्तीने कार्य करणारे दोन सर्जनशील कलावंत डॉ. सुलोचना गावडे आणि डॉ. हर्ष ठक्कर, येत्या 5 नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे होणाऱ्या ‘टेक्स्चर्स अँड टोन्स’ […]Read More

महानगर

कुलाबा कॉजवे परिसरातील ६७ अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात निष्कासन कारवाई.

मुंबई, दि ५ कुलाबा कॉजवे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मंगळवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागाकडून निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ६७ अनधिकृत फेरीवाल्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात आले. अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे आणि नागरी नियमांचे पालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात कारवाई केली जात […]Read More

शिक्षण

पिंपरी चिंचवड विद्यापीठात ‘अचिव्हर्स डायलॉग्स – पुणे एडिशन’ चे आयोजन

पुणे, दि ५पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे भारत आणि युनायटेड किंगडम, इंग्लंड शैक्षणिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने, नॅशनल इंडियन स्टुडंट्स अँड अल्युमनी युनियन, यूके (एनआयएसएयू) आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अचिव्हर्स डायलॉग्स – पुणे एडिशन’ हा विशेष कार्यक्रम गुरुवारी (दि.६ नोव्हेंबर) सकाळी […]Read More

विदर्भ

अवकाळी पावसाने कापसाचे नुकसान, शेतकरी पुन्हा संकटात

चंद्रपूर दि ५ :- चंद्रपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मोंथा चक्रीवादळासह आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोडणीला आलेला कापूस पावसामुळे भिजून खाली पडत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात धान, कापूस, सोयाबीन ,तूर खरीप पिके घेतली जातात. आधीच सोयाबीनच्या पिकाचे नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांना आता कापसाच्याही नुकसानीचा फटका बसला आहे. भिजलेल्या कापसाला […]Read More

राजकीय

AMRUT योजनेचा आढावा बैठकीस उपस्थिती.

दिल्ली, दि ५दिल्लीमध्ये गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार विषयक स्थायी समितीच्या बैठकीस ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील हेउपस्थित होते, या बैठकीचे अध्यक्षपद श्री मगुंटा श्रीनिवासुलु रेड्डी जी यांनी भूषवले.या बैठकीत AMRUT योजनेचा आढावा घेण्यावर चर्चा झाली, विशेषतः नागरी पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर भर देण्यात आला.ML/ML/MSRead More