Month: November 2025

पश्चिम महाराष्ट्र

वंदे मातरम् हे आपल्यासाठी मातृगीत

पुणे, दि ७ वंदे मातरम् गीताने स्वातंत्र्य लढ्यात लढणाऱ्यांसाठी ताकद दिली त्यामुळेच ते प्रेरणा गीत आहेच, तसेच फाशीवर जाणाऱ्यांना आत्मबळ दिले त्यामुळे ते बलिदान गीत सुध्दा आहे, तसेच ते युध्द गीत आहे, समर गीत आहे, एकता गीत, अभिमान, आणि भारतमातेला वंदन करणारे मातृगीत सुध्दा आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री एँड […]Read More

महानगर

कर्तव्यात हलगर्जीपणा करणारे परतवाडा आगार व्यवस्थापक निलंबित

मुंबई, दि ७कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल अमरावती विभागातील परतवाडा आगार व्यवस्थापक जीवन दत्तात्रय वानखेडे यांना एसटी महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांनी निलंबित केले आहे. याबरोबरच त्यांची विभागीय चौकशी करून त्यात ते दोषी आढळल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे.अमरावती विभागातील परतवाडा आगाराचे आगार व्यवस्थापक हे दिवसभर आपल्या कर्तव्यावर उपस्थित न राहता […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

बोपोडीतील शासकीय दूध डेअरीची जागा खासगी व्यक्तीच्या नावे करण्याचा धक्कादायक

पुणे, दि ७ बोपोडी परिसरातील शासकीय दूध डेअरीची जागा खासगी व्यक्तीच्या नावे करण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थांमध्ये प्रचंड संताप आहे. सरकारी मालमत्तेवर खासगी स्वार्थासाठी डल्ला मारला जात असल्याची ही घटना पुणे शहरातील महसूल विभागातील भ्रष्ट आणि बेजबाबदार कारभाराचे आणखी एक उदाहरण ठरत आहे. दरम्यान, पुणे शहराचे तहसीलदार श्री. यवले यांना […]Read More

राजकीय

‘वंदे मातरम्’ च्या 150 व्या वर्षपूर्ती उत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, दि. 7 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे “वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभर केल्या जाणाऱ्या उत्सवाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले […]Read More

महानगर

‘वंदे मातरम गीताची सार्धशताब्दी, ‘राजभवनात ‘वंदे मातरम्’चे सूर निनादले’

मुंबई दि ७ : बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम् या गीताच्या सार्धशताब्दी निमित्त आज (दि. ७ नोव्हे.) राजभवन येथे संपूर्ण ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, एडीसी अभयसिंह देशमुख यांसह राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व जवानांनी ‘वंदे मातरम’चे सामूहिक गायन केले. सर्व […]Read More

विदर्भ

जमीन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे

नागपूर, दि.७ – पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमिनीची खरेदी करण्यात आली,त्यावर स्टॅम्प ड्यूटी माफ करण्यात आली आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांना यातील काहीच माहित नव्हते? या जमीन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. एखाद प्रकरण झालं, ते अंगलट आले की उपमुख्यमंत्री अजित […]Read More

राजकीय

बिहार निवडणूकीत पहिल्या टप्प्यात 64.46  टक्के मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं आहे. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 जागांवर मतदान झालं. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात मतदान वाढलं आहे. पहिल्या टप्प्यात 64.46 टक्के मतदान झालं आहे. बिहारमध्ये गेल्या निवडणुकीवेळी पहिल्या टप्प्यात 121 जागांवर 55.81 टक्के मतदान झालं होतं. विकासशील इन्सान पार्टीचे मुकेश साहनी यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी […]Read More

राजकीय

जमीन घोटाळ्याच्या आरोपामुळे अजित पवार कुटुंबीय अडचणीत ?

पुणे, दि. ६ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच सुपुत्राला पार्थ पवार हे पुण्यातील उच्चभ्रू कोरेगावमधील महार वतनाच्या जमिनीवरून चांगलेच अडचणीत आले आहेत. महार वतनाची 40 एकर जमीन तब्बल 1800 कोटींची ही जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये ढापल्याचा आरोप पार्थ पवार यांच्यावर होत आहे. जमीन खरेदीवेळी त्यांना २०-२२ कोटींचा मुद्रांक शुल्क माफ झाल्याचा आरोपही होत […]Read More

महानगर

मध्य रेल्वेच्या मोटरमन्सनी केले आंदोलन, वाहतूक ४५ मिनिटे ठप्प

मुंबई, दि. ६ : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोटरमन आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी अचानक काम थांबवून आंदोलन सुरू केले. प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी 5:50 वाजल्यापासून लोकल सोडण्यात आलेल्या नव्हत्या, ज्यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या युनियनने पुकारलेल्या या संपामुळे लोकलसेवा सुमारे 45 […]Read More

महानगर

सेंट्रल रेल्वेच्या मोटरमनचे आंदोलन

मुंबई, दि ६सेंट्रल रेल्वेच्या मोटरमनांनी रिक्त पदांमुळे वाढलेल्या कामाच्या ताणाव आणि गैरवर्तनाच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे त्यांनी ओव्हरटाईम करण्यास नकार दिला असून, त्यामुळे मुंबईतील लोकल रेल्वे सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक गाड्या उशिरा धावल्या असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हे आंदोलन “वर्क-टू-रूल” स्वरूपाचे आहे — म्हणजेच मोटरमन फक्त नियमांनुसारच […]Read More