Month: November 2025

विदर्भ

सोयाबीनला चांगला दर, बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक….

वाशीम दि १२ : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी आणि मंगळवारी सोयाबीनची विक्रमी आवक झाली असून, त्यामुळे बाजार परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे. या अभूतपूर्व आवकेमुळे मोजणी आणि लोडिंग प्रक्रियेत मोठा विलंब होत असल्याने आज (बुधवार) खरेदी प्रक्रिया पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भात बाजार समितीकडून व्यापारी, हमाल-मजूर आणि […]Read More

विदर्भ

भंडारा जिल्ह्यात वन विभागाच्या वतीने पक्षी सप्ताह साजरा….

भंडारा दि १२ : भंडारा जिल्ह्यात वन विभागाच्या वतीने पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.जिल्ह्यातील तलावांवर जाऊन पक्षी संदर्भात नागरिकांना जनजागृती करण्यात येत आहे. पक्षी सप्ताहच्या माध्यमातून नागरिक, विद्यार्थी यांना सोबत घेत जंगलात पक्ष्यांची ओळख पटवली जात आहे. या पक्षी सप्ताहात अनेक सामाजिक संघटनांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे.ML/ML/MSRead More

ऍग्रो

मुबलक पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल….

जालना दि १२ : मुबलक पाणीसाठ्यामुळे यंदा जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल ऊस लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. गत दोन वर्षांपासून तालुक्यात खरीप आणि रब्बी हंगामातील कापूस, मूग, सोयाबीन, तूर आणि मका यांसारख्या पिकांचे शेवटच्या टप्प्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. सततच्या अनियमित पावसामुळे शेतकरी संकटात सापडले होते. मात्र, यंदाच्या धुवाधार पावसामुळे घनसावंगी […]Read More

राजकीय

बिहार निवडणूकीच्या एक्झिट पोलचा कल NDA च्या बाजूने

नवी दिल्ली, दि. 11 : बिहार विधानसभेच्या 242 जागांसाठी आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 67.14 टक्के मतदान झाले. बिहार विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले आहे आणि आता सर्वांनाच निकालाचे वेध लागले आहेत. एक्झिट पोलमध्ये निकालाचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. बिहारमध्ये […]Read More

महानगर

अलिबाग -विरार प्रवास होणार ९० मिनिटांत

मुंबई, दि. ११ : अनेक वर्षांपासून रखडलेला विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) 126 किमी लांबीच्या या रस्त्याच्या प्रकल्पासाठी पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. अलिबाग विरार हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यावर विरार ते अलिबाग दरम्यानचा प्रवासाचा वेळ 4 तासांवरून अंदाजे 90 मिनिटांपर्यंत कमी होईल. MSRDC ने […]Read More

अर्थ

या’ 8 बँका देत आहेत FD वर सर्वाधिक व्याज

मुंबई, दि. ११ : भारतात मुदत ठेवी (Fixed Deposit – FD) हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. गुंतवणूकदारांना निश्चित व्याजदराने स्थिर परतावा मिळतो, त्यामुळे जोखीम न घेता हमखास उत्पन्न मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी ही योजना आदर्श ठरते. बँका, पोस्ट ऑफिस, लघु वित्त बँका (SFB) आणि नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFC) यांच्याकडून एफडी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. […]Read More

ट्रेण्डिंग

Gen Z चे क्रिप्टो गुंतवणुकीला प्राधान्य

मुंबई,दि. ११ : भारताच्या क्रिप्टो बाजारपेठेत मोठा बदल घडला आहे. Gen Z म्हणजेच १८ ते २५ वयोगटातील तरुणांनी प्रथमच मिलेनियल्सना मागे टाकून क्रिप्टो गुंतवणुकीत आघाडी घेतली आहे. CoinSwitch च्या Q3 2025 अहवालानुसार, या वयोगटातील गुंतवणूकदारांचा हिस्सा ३७.६% इतका आहे, तर मिलेनियल्स (२६–३५ वर्षे) यांचा हिस्सा ३७.३% आहे. यामुळे भारतातील डिजिटल गुंतवणुकीचे चित्र अधिक तरुण झाले […]Read More

महानगर

शासकीय कार्यालयांनी थकवला BMC चा ₹१८०० कोटींचा मालमत्ता कर

मुंबई, दि. ११ : मुंबईतील विविध शासकीय कार्यालयांनी मुंबई महापालिकेचा तब्बल १८०० कोटी ३३ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला असून त्यामुळे महापालिकेच्या महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. कर भरण्याकडे सरकारी यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. जकात बंद झाल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य आधार मालमत्ता कर राहिला आहे. मात्र अनेक शासकीय संस्था हा […]Read More

देश विदेश

दिल्ली स्फोटाचा तपास आता NIA च्या हाती

नवी दिल्ली, दि. 11 : काल संध्याकाळी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या परिसरात झालेल्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या घटनेत किमान ९ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. ही घटना अपघात नसून आत्मघाती हल्ला असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणेने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर तपासाची सूत्रे राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवण्यात आली […]Read More

महानगर

तंत्रज्ञानाच्या नव्या युगात – ‘एआय’चा वाढता प्रभाव

मुंबई, दि. ११ : ‘एआय’ म्हणजे केवळ संगणकाचा वापर नव्हे, तर मानवी मेंदूच्या विचारसरणीचे तंत्रज्ञानरूप आहे. ‘एआय’ चा वापर कौशल्यपूर्ण केला तर अधिक सुलभपणे काम करता येऊ शकते, असे मत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी यांनी व्यक्त केले.मंत्रालय येथे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात वृत्तपत्र, […]Read More