Month: November 2025

मनोरंजन

8 नवे चित्रपट आणि सीरिज OTT वर दाखल

मुंबई, दि. १४ : या विकेंडला ओटीटी प्लॅटफॉर्मवर कॉमेडी, ड्रामा, अॅक्शन, सस्पेन्स, थ्रिलरसह अनेक मजेदार चित्रपट आणि सीरिज रिलीज झाल्या आहेत. त्यामुळे शनिवार रविवार तुम्ही घरबसल्या मनोरंजनाचा मोठा आनंद घेऊ शकता. जॉली एलएलबी 3 (Jolly LLB 3) : ‘जॉली एलएलबी 3’ हा कॉमेडी कोर्टरूम ड्रामा असणारा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. […]Read More

मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन

मुंबई, दि. १४ : चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल यांचे आज वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. १९४०-५० च्या दशकातील त्या एक लोकप्रिय अभिनेत्री होत्या. साधेपणा आणि प्रभावी अभिनय यामुळे त्यांनी चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले होते. त्यांना श्रावण, विदूर, राहुल अशी तीन मुले आहेत. कामिनी कौशल यांनी शहीद (Shaheed,), नदीया के पार, शबनम, आरजू […]Read More

राजकीय

बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग व ज्ञानेश कुमारांचे, मतचोरी व

मुंबई, दि. १४ : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सर्व श्रेय निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचे आहे. मतचोरी, बोगस मतदान आणि SIR च्या माध्यमातून विरोधकांचे मतदार वगळण्याने भाजपा व मित्रपक्षाचा विजय झाला आहे, असे म्हणत बचेंगे तो और भी लढेंगे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. महाराष्ट्र […]Read More

महानगर

सहकाराची अभेद्य ताकद मुंबईसह राज्यात निर्माण करूया

मुंबई दि १४ – सहकाराची ताकद काय आहे, संघटन आणि ताकद ज्यावेळी दिसते त्याचवेळेला सरकार, यंत्रणा ही आपल्या प्रश्नांकडे बघत असते. तशा प्रकारची सहकाराची अभेद्य ताकद मुंबईसह महाराष्ट्रात निर्माण करूया असे प्रतिपादन महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि स्व. वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था […]Read More

राजकीय

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा

मुंबई, दि.१४ : प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आणि त्याचे महत्व लक्षात घेऊन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता चार दिवसीय कार्यशाळा हा नवा उपक्रम राबवला आहे. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी विशेष एआय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे. राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असेल. याचबरोबर महाराष्ट्र […]Read More

राजकीय

खरडलेल्या शेतजमिनीसाठी मिळणार माती, गाळ, मुरूम, कंकर मोफत !

​मुंबई, दि. १४ :​ अतिवृष्टी व पुरामुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीला पूर्वस्थितीत आणण्यासाठी लागणारी माती, गाळ, मुरूम, कंकर मोफत पुरवण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. याबाबतचे परिपत्रक महसूलविभागाने आज जारी केले. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुरामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन पुन्हा लागवडी योग्य व सुपीक करण्यासाठी लागणाऱ्या माती, गाळ, मुरूम, […]Read More

महानगर

स्टार महाराष्ट्र अवॉर्डचा येत्या 18 नोव्हेंबर रोजी रवींद्र नाट्य मंदिर

मुंबई, दि १४~ महाराष्ट्र राज्य ही भूमी इतिहास घडविणाऱ्या आणि राष्ट्र घडविणाऱ्या रत्नांची भूमी आहे. कला संस्कृती साहित्य सर्व क्षेत्रात समृद्ध असणारी ही भूमी आहे. संतांचा आणि महापुरुषांचा आदर्श घेऊन चालणारी महाराष्ट्र ही सर्वार्थाने समृद्ध भूमी आहे. शिक्षण कला साहित्य पत्रकारिता पोलिस प्रशासन समाजसेवा विज्ञान अध्यात्म योग क्रीडा नाट्य सिनेमा आणि राजकारण सहकार अशा विविध […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

भविष्य निर्वाह निधी क्षेत्रीय आयुक्तांना पुणे यांना दर्जाहीन सेवेबद्दल १०,०००

मुंबई, दि १४भविष्य निर्वाह निधी (EPF) विभागाच्या निष्काळजीपणामुळे आणि सेवेतील कमतरतेमुळे जिल्हा ग्राहक प्राधिकरणाने दिलेल्या आदेशाविरोधातील अपील राज्य ग्राहक आयोगाने ( Maharashtra State Consumer Disputes Redressal Commission Mumbai) यांनी फेटाळले असून, अपीलकर्त्यास म्हणजेच भविष्य निर्वाह निधी आयुक्त यांना १०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई श्री. अविनाश रामचंद्र नातु (माजी कामगार, बी.ए.बी. अँग्रो लिमिटेड […]Read More

राजकीय

भायखळा येथे पार पडला विविध नगरी कामांचा शुभारंभ

मुंबई, दि १४भायखळा येथील जुन्या मलनिःसारण वाहिन्या अतिशय खराब झाल्या होत्या. त्यांची दुरूस्ती करण्याची फार गरज होती . त्या अनुषंगाने आमदार मनोज जामसुतकर यांच्या आमदार निधीतून राम नगर, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग येथील मलनि:सारण वाहिन्यांची चेंबरसहित दुरुस्ती कामाचा शुभारंभ नुकताच पार पडला.स्थानिक नागरिकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले हे काम हाती घेण्यात आले […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू व आद्यक्रांतीगुरू वीर लहुजी

पुणे, दि १४पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू व आद्यक्रांतीगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटचे अरविंद शिंदे यांच्या हस्ते आज काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘पं. जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले […]Read More