पुणे, दि. 13 : “महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कृषी पदवीधरांनी फार मोठी उंची गाठली आहे. अनेक उद्योजक, राजकारणी, बांधकाम व्यावसायिक, प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ कृषी पदवीधर आहेत. कृषी पदवीधरांनी केवळ शासकीय नोकरी न पकडता उत्तम शेती करून व शास्त्रीय पद्धतीने शेती करून स्वतः उदाहरण निर्माण करणे गरजेचं आहे. शेती हा केवळ व्यवसाय नाही, तर आपल्या संस्कृतीचा श्वास […]Read More
मीरा-भाईंदर दि १३ : मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा मिळाला असला तरी मीरा -भाईंदर महानगरपालिकेतील शासकीय कामकाज हे इंग्रजी भाषेत होत असल्याचे आणि जाणीवपूर्वक मराठी भाषेचा अवमान महानगरपालिका करत असल्याची बातमी एका वृत्तपत्रातून छापण्यात आली होती. या बातमीवर ठोस भूमिका घेत परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी आता मीरा -भाईंदर महानगरपालिका आयुक्तांना पत्र देत […]Read More
मुंबई, दि १३ : या वर्षीचा 20वा आंतरराष्ट्रीय त्रिपिटक चैटिंग समारोह प्रथमच महाबोधी महाविहार परिसरात, बोधगया येथे 2 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2025 दरम्यान पार पडणार आहे. यामध्ये जगभरातून बौद्ध उपासक-उपासिका आणि भिक्षु सहभागी होतील.हे आयोजन लाइट ऑफ बुद्धधर्म फाउंडेशन इंटरनॅशनल (LBDFI) द्वारा आंतरराष्ट्रीय त्रिपिटक सुत्तपाठ परिषद (ITCC) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. या […]Read More
पुणे, दि १३: श्री श्री श्यामा काली पूजा, पुणे शहरच्या वतीने ‘सार्वजनिक काली पूजा उत्सव 2025’चे आयोजन येत्या 20,21 व 22 ऑक्टोबर 2025 ,दरम्यान R.C.M. गुजराती स्कूल, फडके हौद चौक, पुणे येथे करण्यात आले आहे. आहे. यावर्षी या प्रतिष्ठित उत्सवाला 25 वर्षे पूर्ण होत असून या निमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात […]Read More
मुंबई, दि. १3 – घाटकोपर येथील कचरा पेटी हटविण्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला असून बांधकाम व्यवसायिकाला फायदा मिळावा म्हणुन पालिकेचे अधिकारी नियमांचे उल्लंघन करण्यास मागेपुढे पाहत नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत पालिकेच्या एन विभागाचे सहाय्यक आयुक्तांकडे खा. संजय दिना पाटील यांनी तक्रार केली आहे. घाटकोपर येथील पालिकेच्या एन विभागीय कार्यालयाच्या मागे एका इमारती बाहेर असलेली […]Read More
वाशीम दि १३ : वाशीम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने मदत जाहीर केली असली तरी ती तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. विशेषतः मालेगाव व रिसोड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे संत्र्याच्या झाडांवरील फळांची गळती होऊन बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे मृग व […]Read More
मुंबई, दि १३ : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. मात्र 15 ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहे. या तारखेपासून किमान 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपार नंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे. सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वात अधिक […]Read More
रत्नागिरी, दि.१२ : मंडणगड येथे झालेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीमधून समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात न्याय मिळेल, या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्नशील रहाल. जेणेकरुन बाबासाहेबांचे सामाजिक आणि आर्थिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली. मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन […]Read More
ठाणे दि. १२ – जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से) यांची बदली जिल्हाधिकारी, जळगाव या पदावर करण्यात आली असून, त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे (भा.प्र.से) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. रोहन घुगे यांनी दि. ८ ऑक्टोबर, २०२५ रोजी मध्यान्होत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे या […]Read More
मुंबई, दि. ११ : मुंबईतील कबुतरखान्यावरून निर्माण झालेला वाद काहीसा शमला असताता आता पुन्हा या प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जैन मुनी नीलेशचंद्र यांनी आज ‘शांतिदूत जनकल्याण पक्षाची घोषणा केली. विशेष म्हणजे हा पक्ष आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे.जैन समाजाचे चिन्ह हे शांतिदूत कबुतर आहे. कबुतरांविरोधात जे आहेत, त्यांच्याशी आमचा […]Read More