Month: October 2025

क्रीडा

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता विश्वविजेता होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी भारतीय महिला संघ विश्वविजेता झाल्यास आपण एक काम करणार असल्याचं वचन दिलं आहे. जर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 जिंकला तर […]Read More

ट्रेण्डिंग

उद्यापासून बदलणार Aadhaar Card बाबतचे हे नियम

नवी दिल्ली, दि. ३१ : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) 1 नोव्हेंबर 2025 पासून आधार अपडेटच्या नियमांमध्ये मोठे बदल करणार आहे. नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाइल नंबर किंवा ईमेल यासारखी माहिती बदलण्यासाठी आता लोकांना आधार केंद्रांवर जाण्याची गरज भासणार नाही. नवीन प्रणाली इतकी सोपी आणि डिजिटल असेल की ही सर्व कामे आता घरबसल्या ऑनलाइन करता […]Read More

देश विदेश

ब्रिटनचे राजा चार्ल्स यांनी भावाला काढले घराबाहेर

इंग्लंड. दि. ३१ : ब्रिटनचे राजा चार्ल्स यांनी त्यांचा धाकटा भाऊ अँड्र्यू याच्याकडून राजकुमारपद काढून घेतले आहे आणि त्यांना त्यांच्या विंडसर येथील घरातून बाहेर काढले आहे. बकिंगहॅम पॅलेसने गुरुवारी ही घोषणा केली की, जेफ्री एपस्टाईन घोटाळ्याशी संबंधित अँड्र्यूच्या संबंधांमुळे ते राजघराण्याला त्याच्यापासून दूर ठेवू इच्छितात. आतापर्यंत प्रिन्स अँड्र्यू ‘प्रिन्स अँड्र्यू, ड्यूक ऑफ आर्क’ म्हणून ओळखले […]Read More

आरोग्य

दिल्लीत पायाच्या अंगठ्याचे हातावर यशस्वी प्रत्यारोपण

दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांनी एका २० वर्षीय व्यक्तीच्या तुटलेल्या पायाच्या अंगठ्यातून एक नवीन अंगठा पुन्हा तयार केला आहे. एका रस्ते अपघातात त्या व्यक्तीचा डावा पाय गुडघ्याखाली कापण्यात आला होता आणि डावा अंगठा पूर्णपणे कापला गेला होता. त्यानंतर डॉक्टरांनी पायाचा अंगठा कापला आणि तो तरुणाच्या डाव्या हाताला पुन्हा जोडला. हे एका दुर्मिळ शस्त्रक्रियेद्वारे साध्य झाले. […]Read More

शिक्षण

NCERT पुस्तकांमध्ये AI आणि आयुर्वेदाचा समावेश

नवी दिल्ली, दि. ३१ : NCERT आता शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये दोन मोठे बदल करणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि संगणक तंत्रज्ञान (सीटी) हे तिसरीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले जातील. सहावी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आयुर्वेदावरील धडे जोडली जातील.हे बदल २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमात समाविष्ट केले जातील. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत मुलांना भविष्यासाठी तयार करण्यासाठी इयत्ता तिसरीच्या […]Read More

महानगर

वरळी कोळी महोत्सवात संस्कृती, परंपरेची मेजवानी

मुंबई, दि. ३१ समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा, थंड हवेची झुळूक आणि सोबतच गरमागरम झिंगा फ्राय, बोंबील, झणझणीत तिखले, भरलेले खेकडे याचा आस्वाद घेण्याची संधी वरळी कोळी महोत्सवात खवय्यांना घेता येणार आहे. वरळीत ‘कोळी खाद्य महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या काळात वरळी सी फेस, स्वर्गीय बिंदुमाधव ठाकरे चौकासमोर भव्य कोळी […]Read More

क्रीडा

देशातील पहिल्या व्यावसायिक सायकलिंग स्पर्धेची घोषणा

पुणे,दि. 31 : भारताच्या पहिल्या व्यावसायिक प्रो स्टेज एलीट पुरुष सायकलिंग स्पर्धा या आंतरराष्ट्रीय सायकलिंग इव्हेंटचे अधिकृत चिन्ह आणि शुभंकराचे अनावरण उत्साही नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले. या सोबतच पुणे ग्रँड टूर २०२६ या भारतातील पहिल्या जागतिक पातळीच्या सायकलिंग स्पर्धेची घोषणा करण्यात आली. ४३७ किमीच्या मार्गावर आधारित ही स्पर्धा पुणे जिल्ह्याच्या शहरी भाग, डोंगराळ परिसर आणि […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबईत लवकरच होणार कचऱ्यापासून ‘वीज निर्मिती प्रकल्प’

मुंबई, दि. ३१ : मुंबई शहरसह पूर्व व पश्चिम उपनगरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने देवनार डम्पिंग ग्राऊंड येथे ६०० टन प्रतिदिन क्षमतेचा कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून सुमारे सात मेगावॉट वीजनिर्मिती केली जाणार आहे.  मे २०२६ मध्ये सदर प्रकल्प कार्यान्वित करण्याचा मानस […]Read More

राजकीय

जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार

मुंबई, दि. ३१ : राज्यात ‘जिल्हा व्यवसाय सुधारणा कृती योजना 2025’ राबविण्यात येत आहे. 154 सुधारणांचा समावेश असलेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी 14 ऑगस्ट 2026 पर्यंत केली जाणार आहे. यात राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसाठी ‘चिंतन शिबिर’ आणि विभागीय बैठकांचे आयोजन करण्यात येणार असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्याधिकाऱ्यांना अधिक अधिकार प्रदान करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पहिली व्हिझकिड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा पुण्यात उत्साहात पार पडली

पुणे, दि ३१- पहिली व्हिझकिड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच पुण्यातील बी.एम.सी.सी. कॉलेज येथील टाटा हॉलमध्ये यशस्वीरीत्या संपन्न झाली. ही स्पर्धा बाकलीवाल ट्युटोरियल्स आणि किंग्स इंडियन चेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रभरातील तरुण खेळाडूंनी बुद्धिमत्ता, रणनीती उत्साह आणि ऊर्जेचा सुंदर संगम या स्पर्धेत दिसून आला आहे. एकूण ३१० खेळाडूंनी तीन गटांमध्ये १६, […]Read More