Month: September 2025

ऍग्रो

‘रेशीम विभाग आपल्या दारी’ अभियानातून रेशीम शेतीबाबत मार्गदर्शन…

वाशीम दि ८:– रेशीम संचालनालय, नागपूर अंतर्गत जिल्हा रेशीम कार्यालय, वाशीम मार्फत यंदा ‘रेशीम विभाग आपल्या दारी’ हे विशेष अभियान १ ते ३० सप्टेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. संचालक विनय मून यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात होत असून मागील दोन वर्षांपूर्वी नोंदणी करूनही काही कारणास्तव तुती लागवड किंवा रेशीम उद्योग सुरू न केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन […]Read More

राजकीय

वैचारिक सुंता झालेल्या संजय राऊत यांनी छत्रपतींचं नाव घेऊ नये

मुंबई दि ७ — औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते आणि ज्यांची वैचारिक सुंता झाली असे संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नये, असा जोरदार हल्ला नवनाथ बन यांनी चढवला आहे. नवनाथ बन म्हणाले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालतो. संघाच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करूनच केली जाते. डॉ. हेडगेवार […]Read More

राजकीय

बाप्पाच्या विसर्जनानंतर राऊत यांच्या बुद्धीचंही विसर्जन झालं का?

मुंबई दि ७ — “गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर राऊत यांच्या बुद्धीचंही विसर्जन झालं आहे का?” असा सवाल भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी उपस्थित केला. संजय राऊत आता हवेत बाण चालवू लागले आहेत. देवेंद्रजींच्या जाहिरातीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. खरं तर अशा जाहिराती सर्वसामान्य जनतेच्या प्रेमातून येतात. पण उद्धव ठाकरे आणि राऊत यांचा जनतेशी वा कार्यकर्त्यांशी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

एमआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या बाप्पाला निरोप

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या बाप्पाला निरोप पुणे, – ढोल-ताशांच्या गजरात आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या जल्लोषात एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. बुधवारी (ता. २७) रोजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते विधिवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांकडून यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. प्रतिष्ठापनेनंतर प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात […]Read More

ऍग्रो

राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ची अंमलबजावणी

कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, उत्पादित शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे. शेतीमध्ये उत्पादकता वाढविणे, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध पातळीवर अनेक उपाययोजना करत आहे. २३ मार्च २०२५ रोजी झालेल्या पाणी फाउंडेशनच्या वार्षिक कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रात सत्यमेव जयते फार्मर कपची घोषणा करण्यात आली. राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये राज्य शासन आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त […]Read More

देश विदेश

भारतीय हॉकी संघ आशिया कपाच्या अंतिम फेरीत

भारतीय पुरुष हॉकी संघाने आशिया कप 2025 मध्ये जबरदस्त कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. बिहारमधील राजगीर हॉकी स्टेडियमवर झालेल्या सुपर-४ सामन्यात भारताने चीनचा ७-० असा पराभव करत आपली ताकद सिद्ध केली. या सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. शिलानंद लाक्रा (४’) ने पहिल्या गोलने सुरुवात केली, त्यानंतर दिलप्रीत सिंग (७’), मंदीप सिंग (१८’), […]Read More

शिक्षण

राज्यातील सहा शिक्षकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

नवी दिल्ली,दि. ६ : शिक्षक दिनानिमित्त दिल्लीमध्ये आयोजित समारंभात महाराष्ट्रातील ६ शिक्षकांसह देशभरातील ८१ शिक्षकांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ ने शुक्रवारी सन्मान करण्यात आला. प्रमाणपत्र, रौप्य पदक आणि ५० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील शिक्षकांमध्ये शालेय शिक्षक डॉ. शेख मोहम्मद वक्रिउद्दीन शेख […]Read More

क्रीडा

टिम इंडिया आशिया कपमध्ये खेळणार विना प्रायोजक

भारतीय क्रिकेट संघ आशिया कप 2025 मध्ये एक ऐतिहासिक पाऊल उचलत प्रायोजकांशिवाय मैदानात उतरणार आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये जर्सीवर प्रायोजकांचे लोगो असणे हे सामान्य झाले असताना, यंदा भारतीय संघाची जर्सी फक्त “INDIA” आणि आशिया कपचा अधिकृत लोगो दाखवते. ही बाब क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. Dream11 हे भारतीय संघाचे मुख्य जर्सी प्रायोजक होते. मात्र भारत सरकारने […]Read More

विदर्भ

मराठा आरक्षणाच्या निर्णया विरोधात ओबीसी समाजाकडून महामोर्चाची घोषणा

नागपूर, दि. ६ : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आता सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी समाजाने महामोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. आज नागपूरात ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसचे विधानसभेतील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महामोर्चाची […]Read More

राजकीय

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचे परवाने रद्द करावे

मिरा-भाईंदर, दि. ६ :– व्यवसाय वृद्धीच्या नादात समाजातील मुलभूत मूल्ये पायदळी तुडवत, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व धर्मांध स्वरूपाच्या जाहिरातींमार्फत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रकार करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करून त्यांच्या बांधकाम परवान्यांवर गंडांतर आणावे, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी दिले आहेत. […]Read More