वाशीम दि ३०:– गणेशोत्सव म्हटलं की भव्य मूर्ती, आकर्षक सजावट आणि लाखो रुपयांच्या स्पर्धा डोळ्यांसमोर उभ्या राहतात. मात्र वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) येथील श्रीमंत बालहौसी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा साकारलेली गणेश मूर्ती वेगळेपणामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण हा बाप्पा कडधान्यांपासून बनवलेला आहे. कारंजा लाडच्या भाजीबाजारात बसवलेली ही सात फूट उंचीची मूर्ती तब्बल ३० […]Read More
मुंबई दि ३० — राज्य शासनाने ई-बाईक टॅक्सी धोरण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार संबंधित संस्थांनी परवाने काढून आपली ई -बाईक टॅक्सी सेवा सुरू करावी. तथापि, शासनाच्या आदेशाला न जुमानता परवान्या शिवाय अनाधिकृत पणे बाईक टॅक्सी सेवा सुरू असलेल्या रॅपिडो ,ओला, उबर या सारख्या कंपन्या वर मोटार परिवहन विभागामार्फत सातत्याने कारवाई सुरू राहील, अशी […]Read More
मुंबई, दि. ३० :– राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने दि. ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी […]Read More
चंद्रपूर दि ३०:- चंद्रपूर महाऔष्णिक वीजकेंद्रातील तिसऱ्या व चौथ्या क्रमांकांच्या संचात कोळसा हाताळणी विभागातील गॅन्ट्री तांत्रिक कारणामुळे कोसळल्याची घटना घडली. या अपघातामुळे तिसऱ्या संचातून सध्या वीजनिर्मिती बंद आहे,तर चौथा संच आधीपासूनच वार्षिक देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे थांबलेला आहे, अशी माहिती महाऔष्णिक केंद्राने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र कार्यक्षमता उत्कृष्ट ठेवतानाच सुरक्षिततेकडेही विशेष […]Read More
मुंबई, दि २९मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला सरकारने जर दोन दिवसात मनावर घेत आरक्षण दिले नाही तर पाणी पिण्याचे सोडणार असे सांगत सरकारला दोन दिवसाची मुदत दिली. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे की, दोन दिवसांत सरकारने मराठा समाजाला आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा. आडमुठेपणाची भूमिका सरकारने घेऊ […]Read More
मुंबई, दि 2९ मराठा आरक्षणासाठी हजारोंच्या संख्येने आंदोलनकर्ते आझाद मैदान परिसरात दाखल झालेले असताना, मूलभूत सुविधा न मिळाल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मैदानाजवळील सुलभ शौचालयात आंदोलनकर्त्यांकडून बेकायदेशीर वसुली सुरू असल्याचे चित्र दिसत होते. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलभ शौचालयाचा मालक गुप्ता नावाचा व्यक्ती आंदोलनकर्त्यांना “पैसे दिल्याशिवाय शौचालय वापरू देता येणार नाही” असा दादागिरीचा […]Read More
महाबळेश्वर, दि २९ ~ खाजगी उद्योग क्षेत्रातील कंपनी आणि शिक्षण क्षेत्रातील स्वायत्त विद्यापीठे आदी सर्व खाजगी क्षेत्रात अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण धोरण लागू करावे.खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे या मागणी साठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या 15 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय […]Read More
मुंबई: दि २९ मुस्लिम समाजाला शिक्षण, सुरक्षितता आणि सन्मान प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी मुस्लीम समाजाने प्रतिकात्मक राजकारणाच्या मर्यादा ओलांडून मुख्य प्रवाहात प्रभाव निर्माण करणे आवश्यक आहे, असे मत मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी व्यक्त केले. मुस्लीम समाजाकडे सर्व पक्षांनी संघटित मतपेढी म्हणून पाहिले. मात्र, समाजाची प्रगती आणि सुरक्षितता याकडे सर्वच प्रस्थापित […]Read More
मुंबई, दि. २९ : Hisense कंपनीने भारतात त्यांची नवीन UX ULED RGB Mini-LED TV सिरीज लाँच केली आहे. ही सिरीज 100 इंच आणि 116 इंच अशा दोन मोठ्या स्क्रीन साईजमध्ये उपलब्ध आहे. यातील सर्वात महागड्या 116 इंचाच्या मॉडेलची किंमत 29,99,999 रुपये आहे. या सर्वात महागड्या टीव्हीच्या किमतीत तुम्ही दोन महिंद्रा स्कॉर्पिओ एसयूव्ही (SUV) खरेदी करू […]Read More
पुणे, दि. २९ महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. सुमारे ७० एकर जागेवर पिंपरी-चिंचवड शहरात आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे, भारतीय व्यवस्थापन संस्थेची (आयआयएम) स्थापना होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोशी येथे आयआयएम कॅम्पससाठी जागेला मान्यता दिली आहे. त्यामुळे पुण्यात लवकरच भारतीय […]Read More