मुंबई, दि २९शिवसेना शाखा क्र. २१२ आणिअखिल भारतीय मराठा महासंघयांच्या सहकार्याने मुंबई सेंट्रल येथे सरकारी कार्ड शिबिर आयोजित केले होते. त्या शिबिरात पॅन कार्ड, आधार कार्ड, ई श्रम कार्ड, रेशन कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, उद्यम आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, निवडणूक कार्ड याअशा अनेक योजनांचा समावेश होता हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय मराठा […]Read More
मुंबई, दि २९ठाणे जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी ते लवकरात लवकर दाखल झाले पाहिजे यादृष्टीने कामाला गती द्यावी. हे रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असून अद्ययावत यंत्रसामुग्री घेतानाच १०७८ नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील सुरू करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दरम्यान, राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय […]Read More
नवी दिल्ली दि २९–राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडणे आणि मतदार यादीची छाननी करुन त्यातून बांग्लादेशी नागरिकांना वगळण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. राज्याचे उद्योग मंत्री व शिवसेना नेते उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, खासदार मिलिंद देवरा, माजी खासदार राहुल शेवाळे या शिष्टमंडळाने आज नवी दिल्ली येथे केंद्रीय […]Read More
पनवेल, दि २९: वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर, होर्डिंग्ज लावू नये तसेच वर्तमानपत्र प्रसिद्धी माध्यमांमध्ये जाहिरात देऊ नये, त्या ऐवजी सामाजिक उपक्रम आयोजित करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केले आहे.आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या आवाहनात पुढे सांगितले कि, दिनांक ०५ ऑगस्ट रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक भरभरून शुभेच्छा देत असतात आणि […]Read More
दि . २९/७/२०२५ • राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवणार. अभियानात अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय. एकूण १ हजार ९०२ पुरस्कार दिले जाणार. (ग्राम विकास विभाग) • ‘उमेद’- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १० जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) ची उभारणी करणार. राज्यातील ग्रामीण भागातील […]Read More
नाशिक दि २९– कांदा उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. कांद्याच्या मुद्द्यावर चर्चेसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला अधिकाऱ्यांनी वेळ न दिल्याने शेतकरी संतप्त झाले होते. या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर कांदा फेकून आपला रोष व्यक्त केला. तसेच थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर कांदे फोडून आपला निषेध व्यक्त केला. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा उत्पादक […]Read More
पुणे, दि २९: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पुणे शहरच्या वतीने सिहंगड पायथा, डोणजे या ठिकाणी एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नैतृत्वाखाली हे कार्यकर्ता शिबिर घेण्यात आले. एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर दोन सत्रामध्ये होते, पहिल्या सत्रात पक्ष संघटन व पक्ष बांधणी या विषया वर कार्यकर्त्यांनी आपले […]Read More
पिंपरी,: दि २९‘पिंची’ हा पिंपरी -चिंचवड मधील महिलांचा सर्वात मोठा समूह आहे, यांनी आयोजित केलेला मंगलागौर व नागपंचमी स्नेहमेळावा मोठ्या जल्लोषात, उत्साही आणि पारंपरिक वातावरणात नुकताच पार पडला. या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या प्रसंगी पिंपरी-चिंचवड परिसरातील असंख्य महिलांनी […]Read More
रत्नागिरी दि २९:– मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथे गॅस टँकर रस्त्याच्या बाजूला कलंडल्याने अपघातग्रस्त झाला. गॅस टँकरला झालेल्या अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. खबरदारी म्हणून मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा नजीकची दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अपघाताची माहिती मिळताच […]Read More
सांगली, दि. २८ : उद्या राज्यभर नागपंचमीचा सण साजरा होणार आहे. यामध्ये नागपूजेला विशेष महत्त्व असते. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा हे गाव नागपंचमीच्या उत्सवासाठी संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. या गावात जिवंत नागाची पकडून पूजा करण्याची प्रथा होती. ही अनोखी प्रथा पाहण्यासाठी अनेक जण या गावात नागपंचमीच्या दिवशी येत असतं. पण, या प्रथेला काही संघटनांनी आक्षेप […]Read More