Month: July 2025

राजकीय

फळपिक शेतकऱ्यांना ४ दिवसांचा ‘विमा’ दिलासा

मुंबई, दि. २ :– हवामान आधारित फळ पिक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्रसरकारने मुदतवाढ करून राज्यातील फळपिक शेतकऱ्यांना ४ दिवसांचा ‘विमा’ दिलासा दिल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योग्य समन्वयामुळे पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता ०६ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करता येणार असल्याचे कृषी मंत्री अॅड. […]Read More

महानगर

मुंबईतील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याची प्रक्रिया होणार सुलभ

मुंबई दि २ — मुंबईतील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग मध्ये रूपांतरित करण्यासाठी सध्याची प्रचलित क्लिष्ट पद्धती अधिक सोपी आणि सुटसुटीत केली जाईल, त्यासाठी मुंबईतील वरिष्ठ आमदारांशी चर्चा करण्यात येईल अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील प्रभू यांनी उपस्थित केली होती, त्यावर योगेश सागर, अतुल भातखळकर, सुधीर मुनगंटीवार आदींनी उपप्रश्न […]Read More

महानगर

सत्तारूढ आणि विरोधक भिडले, कामकाज तहकूब

मुंबई दि २ — आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षाने केलेल्या आरोपांना आज लोणीकर यांनी सभागृहात उत्तर दिलं, त्यावर विरोधकांनी घोषणा दिल्या त्यामुळे गोंधळ उडाला. त्याला सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी घोषणाबाजीने गदारोळ झाला त्यामुळे कामकाज दहा मिनिटे स्थगित झालं. आपण शेतकरी विरोधी नाही , असं वक्तव्य आपण केलंच नाही मात्र तरीही आपण शेतकऱ्यांची हजार […]Read More

महानगर

प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार रविंद्र चव्हाण यांनी स्वीकारला

मुंबई दि २– भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज बुधवारी महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविंद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली. यावेळी बावनकुळे यांनी रविंद्र चव्हाण यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, राजेश पांडे , […]Read More

महानगर

प्रभाग रचना करताना “आय टू आर” चा विचार करा –

ठाणे – उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेले तीन ते सहा वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, सन 2017 प्रमाणे प्रभाग रचना करण्यात येणार आहे. वाढते नागरीकरण आणि त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता, अशा पद्धतीची प्रभाग रचना अन्यायकारक ठरणार आहे..त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभागांची संख्या वाढवावी तसेच प्रत्येक महानगर पालिकेत अनुसूचित जातीच्या […]Read More

महानगर

शेतकऱ्यांवरील चर्चा नाकारल्याने विरोधकांचा दुसरा सभात्याग

मुंबई दि २ — शेतकरी आत्महत्या आणि बैलाच्या जागी स्वतःला जोताला जोडण्याचा शेताचा प्रयत्न यावर विरोधी पक्षांनी दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला त्यावर ही गंभीर स्थिती आहे त्यामुळे आताच शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करा अशी जोरदार मागणी विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी केली, ती अध्यक्षांनी नाकारली, उद्या स्वतंत्र प्रस्ताव द्या त्यावर चर्चा […]Read More

राजकीय

वीज कोसळण्याच्या घटनांपासून रोखण्यासाठी नवे ऍप…

मुंबई दि २ — राज्यात वीज कोसळण्याच्या घटनांपासून होणारे मृत्यू रोखण्यासाठी दामिनी आणि सचेत हे दोन ऍप केंद्र सरकारच्या IITM संस्थेने विकसित केले असून त्याव्यतिरिक्त आणखी एक आधुनिक ऍप विकसित करण्यात येत आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. सध्याच्या ऍप मधून चारशे किलोमीटर परिसरातील वीज कोसळण्याची माहिती मिळते मात्र आता […]Read More

ऍग्रो

सोयाबीन खरेदी प्रकरणी विरोधकांचा सभात्याग

मुंबई दि २– राज्यातील सोयाबीनची यंदा विक्रमी खरेदी करण्यात आली मात्र एका शेतकरी कंपनीने काही प्रमाणातील सोयाबीन गोदामात पोहोचवली नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली, या खरेदीसाठी संबंधित शेतकऱ्यांना पैसे देण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली, त्यावर विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती केली, त्यानंतर उत्तराने समाधान न झाल्यानं त्यांनी सभात्याग केला. […]Read More

राजकीय

भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वीकारलीबावनकुळे यांच्याकडून सूत्रे

मुंबई दि १ — भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादाची विचारधारा तसेच मोदी सरकारचे लोकोपयोगी निर्णय राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सामान्य माणसापर्यंत नेऊन पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांच्या साथीने पार पाडेन, असा निर्धार भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केला.वरळी डोम येथे प्रचंड उत्साहात पार पडलेल्या पक्षाच्या राज्य परिषदेच्या अधिवेशनात चव्हाण यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे […]Read More

ट्रेण्डिंग

ओव्हरटाईम करु नका, आरोग्य सांभाळा – इन्फोसिस प्रमुखांचा सल्ला

बंगळुरु, दि. १ : आठवड्यातून किमान ७० तास काम केले पाहिजे असे वक्तव्य करून खळबळ माजवणाऱ्या इन्फोसिस कंपनीच्या प्रमुखांनी आता आपल्या कर्मचाऱ्यांना केवळ निर्धारित वेळेतच काम करुन तब्येतीकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. कर्मचाऱ्यांनी ओव्हरटाईमही करू नये. इन्फोसिसमध्ये दुरस्थ पद्धतीने काम करणाऱ्यांनी कामाच्या वेळांचे तंतोतत पालन करावे व अधिक वेळ काम करणे टाळावे, असा सल्ला […]Read More