Month: July 2025

महानगर

बदलापुरमध्ये भाजप आमदाराच्या बंगल्याबाहेर गोळीबार

बदलापूर, दि. ३ : भाजप आमदार किसन कथोरे यांच्या बदलापूर शहरातील घराबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दोन गटात मोठा वाद झाला. या वादातून गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची काही दृश्य समोर आली आहे. दोन गटातील अपापसातील वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. या […]Read More

ट्रेण्डिंग

दीपिका पदुकोणला हॉलिवूडकडून विशेष सन्मान

अभिनेत्री दीपिका पदुकोणने भारतीय सिनेसृष्टीबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली वेगळे स्थान निर्माण केले आहे. याची दखल घेत दीपिकाचा ‘हॉलिवूड वॉक ऑफ फेम’ मध्ये समावेश करण्याचा मान मिळाला आहे. हा सन्मान मिळवणारी ती पहिली भारतीय सेलिब्रिटी ठरली आहे. २०२६ मध्ये ‘वॉक ऑफ फेम’वर सन्मानित होणाऱ्या कलाकारांच्या यादीत दीपिकाच्या नावाची अधिकृत घोषणा बुधवारी हॉलिवूडमधील एका पत्रकार परिषदेत करण्यात […]Read More

कोकण

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करण्याचा न्यायालयाकडून आदेश

मुंबई, दि. ३ : कोकणातील राजापूरच्या बारसू परिसरात हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या कातळशिल्पांचे जतन करा, या कातळशिल्पांचे जतन, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला चार कोटी ३२ लाखांचा निधी वापरा असे आदेशच मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले. तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी सुचीत केलेल्या १७ स्थळांव्यक्तीरिक्त अन्य स्थळे […]Read More

महानगर

येत्या दोन वर्षात एस टी चा चेहरामोहरा बदलून टाकू

मुंबई दि ३ — येत्या दोन वर्षात, एसटीचा चेहरा मोहरा बदलणार असून, पुढील पाच वर्षात, २५ हजार बस खरेदी केल्या जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत दिली. अर्धा तास विशेष चर्चेद्वारे, आमदार अनिल परब यांनी एसटी महामंडळाच्या दूरवस्थेविषयीचा मुद्दा उपस्थित केला. त्याला उत्तर देताना सरनाईक यांनी, एस टी महामंडळाच्या आर्थिक […]Read More

ट्रेण्डिंग

मायक्रोसॉफ्टच्या तब्बल ९ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

ब्लुमबर्गच्या एका अहवालानुसार जगप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्ट पुन्हा एकदा अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करणार आहे. या नोकरकपातीमुळे मायक्रोसॉफ्टच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 4 टक्के म्हणजे साधारण ९ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. यापूर्वी ब्लूमबर्गच्या अहवालातच मायक्रोसॉफ्टमध्ये जुलैमध्ये आणखी एक कर्मचारी कपात होऊ शकते असे म्हटले होते. अहवालात असे म्हटले होते की, या पावलामुळे कंपनीच्या Xbox डिव्हिजन […]Read More

आरोग्य

मुंबईतील सर्व कबूतरखाने एका महिन्यात होणार बंद

मुंबई, दि. ३ : मुंबईकरांच्या आरोग्यासाठी धोकादायक असणारे शहरात ठिकठिकाणी असलेले कबुतरखाने आता लवकरच बंद होणार आहेत. कबूतरखान्यांबाबत विशेष मोहिम हाती घेण्याबाबत मुंबई महापालिकेला आदेश देण्यात येतील असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. सध्या मुंबई महापालिकेच्या हद्दीत 51 कबूतरखाने आहेत. या ठिकाणी कबूतरांमुळे श्वसनविकार, दुर्गंधी व प्रदूषण वाढत असून, यावर नियंत्रण आवश्यक आहे. […]Read More

आरोग्य

डाॅक्टर दिनानिमित्त ‘रुग्ण मित्र स्नेह संवाद कार्यशाळा २.०’ उत्साहात संपन्न

मुंबई,दि ३– रुग्णसेवेत डाॅक्टरांचे योगदान आणि रुग्ण मित्रांच्या समन्वयात्मक भूमिकेला उजाळा देण्यासाठी, ‘रुग्ण मित्र स्नेह संवाद कार्यशाळा २.०’ चे आयोजन घाटकोपर येथील त्रिधा बॅनक्वेट हॉल येथे करण्यात आले. डाॅक्टर दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम “वाद नको, संवाद पाहिजे – समन्वयातून आरोग्य सेवेचा लाभ पाहिजे” या प्रेरणादायी विचारावर आधारित होता. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राज्यगीताने झाली. […]Read More

गॅलरी

*वारी म्हणजे काय? अजिंक्य राऊतने उलगडलं सार

पुणे, दि ३वारी म्हणजे केवळ चालणं नव्हे, तर चालता चालता स्वतःला शोधणं. श्रद्धेचा, सेवाभावाचा आणि सहअस्तित्वाचा जिवंत अनुभव म्हणजे वारी. यावर्षी अभिनेता अजिंक्य राऊत याने स्वतः पंढरपूरपर्यंतचा पाच दिवसांचा पायी प्रवास अनुभवला आणि हजारो भाविकांसोबत चालत वारीचा आत्मिक गोडवा प्रत्यक्ष अनुभवला. या प्रवासानंतर त्याने अतिशय साध्या शब्दांत वारीचं सार सांगितलं –“लादलं तर ओझं, स्वीकारलं तर […]Read More

गॅलरी

*नमित मल्होत्रा यांची ‘रामायण’ — जगातील सर्वात भव्य महाकाव्याचा आरंभ

पुणे प्रतिनिधी : सुमारे २.५ अब्ज लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली, ५,००० वर्षांपूर्वीची कथा आता नव्या रूपात साकारली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या सिने-प्रकल्पांपैकी एक ठरणाऱ्या नमित मल्होत्रा यांची ‘रामायण’ या दोन भागांच्या थरारक live-action सिनेमॅटिक युनिव्हर्सचा प्रास्ताविक भाग ‘रामायण: द इंट्रोडक्शन’ आज जागतिक स्तरावर सादर करण्यात आला. जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपटात्मक उपक्रमाच्या निर्मात्यांनी ‘रामायण: द […]Read More

ऍग्रो

खांद्यावर नांगर ठेवून शेती करणे हे व्हिजन महाराष्ट्र का…

मुंबई दि ३ — शेतकऱ्याला खांद्यावर नांगर घेऊन शेत नांगरावे लागत आहे हे व्हिजन महाराष्ट्र आहे का असा सवाल या शेतकऱ्यांच्या समस्यांवरील चर्चेची सुरुवात करताना भास्कर जाधव यांनी केला. मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने कोकणात आंबा आणि उन्हाळी भाताचं मोठं नुकसान झालं आहे, मासेमारी देखील लवकर बंद करावी लागली. मधल्या काळात पाऊस अचानक बंद झाला, […]Read More