Month: July 2025

ट्रेण्डिंग

राज्यस्तरीय टेनिसपटूची वडिलांकडून गोळ्या झाडून हत्या

गुरुग्राम, दि. १० : गुरुग्राममधील स्टार टेनिसपटू राधिका यादवची गोळी मारून हत्या करण्यात आली. अत्यंत भयंकर बाब म्हणजे राधिकाचे वडिल दीपक यादव यांनीच तिची हत्या केली आहे. ही घटना राधिका राहत असलेल्या सुशांत लोक-2 मधील निवास्थानावर झाली आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतलं असून या घटनेबाबत पुढील चौकशी सुरु आहे. वडील दीपक यादव यांनी वैध […]Read More

राजकीय

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी

मुंबई, दि.१०:– मतदार संख्या, मतदार केंद्र, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका घेण्यासंदर्भात नियोजन सुरू असून त्यासाठी 1 जुलै 2025 पर्यंत नावे नोंदविलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे नियोजन करण्यात येत आहे, त्यादृष्टीने तयारी करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे दिले. जिल्हा परिषदा, […]Read More

राजकीय

बहुचर्चित जनसुरक्षा विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर

मुंबई दि १० — देशाच्या लोकशाही आणि संविधानाला थेट आव्हान देऊन त्याविरोधी संघटन उभे करणाऱ्या शहरी नक्षलवादी आणि कडव्या डाव्या, माओवादी संघटनांवर बंदी घालण्यासाठी सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेल्या जन सुरक्षा विधेयकाला विधानसभेत बहुमताने मंजुरी देण्यात आली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य विनोद निकोले यांनी विरोध केल्याने विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले. कोणत्याही एका व्यक्तीला, राजकीय […]Read More

ऍग्रो

फळ विमा योजनेसाठी प्रत्येक गावात हवामान केंद्र…

मुंबई दि १० — प्रत्येक गावात वेगळे हवामान अंदाज केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे त्या गावाच्या आजूबाजूच्या वीस किलोमीटर परिसरातील हवामानाचा अंदाज त्यात दिसून येईल त्यातून फळ विमा योजनेला आवश्यक निकष लागू करणे सोपे होईल अशी माहिती कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली, याबाबची लक्षवेधी सूचना रोहित पाटील यांनी उपस्थित केली होती, त्यावर […]Read More

राजकीय

राज्यातील सुमारे पावणे दोन लाख शेतमजुरांना विमासंरक्षण…

मुंबई दि १० — राज्यातील एक कोटी पंचाहत्तर लाख शेतमजुरांसाठी विमा योजना लागू करण्यात येईल अशी घोषणा कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत केली. राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गेल्या तीन वर्षांत सर्वात जास्त रक्कम खर्च करण्यात आली आहे, शेतकऱ्यांच्या विविध योजनांवर तीन वर्षात सत्तर हजार कोटींची रक्कम खर्च करण्यात आली आहे अशी माहिती कृषि राज्यमंत्री […]Read More

राजकीय

घरांच्या नोंदणी करण्यासाठी महाआवास नावाने नवे ऍप…

मुंबई दि १० — प्रधानमंत्री आवास योजनेसह सर्व घर योजनांसाठी नोंदणी करण्यासाठी महाआवास नावाने अँप येत्या तीन महिन्यात विकसित करण्यात येत आहे, त्यावर नोंदणी करण्यात आलेल्या घरांची लॉटरी दर आठवड्यात काढण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना देवयानी फरांदे उपस्थित केली होती, त्यावर प्रवीण दटके यांनी उपप्रश्न विचारले. नाशिक […]Read More

गॅलरी

आटपाडीतील जमीन हडपप्रकरणी मुंबईत आझाद मैदानात विधवेचे आंदोलन.

मुंबई, दि १०विधवा महिला लाभार्थी पेन्शन सुरु करुन देतो असे आमिष दाखवून खरेदी पत्रावर अंगठ्याचे ठसे उमटून फसवणूक करुन सुमारे १७ एकर शेतजमीन हडपल्याने सांगली जिल्हयातील पडळकरवाडी (ता. आटपाडी) येथील वृद्धा विठाबाई बापू पडळकर (वय ८२) यांनी कुंटूबायासमवेत आझाद मैदानात शुक्रवारपासून आंदोलन सुरु केले आहे. विठाबाई पडळकर म्हणाल्या, विधवा पेन्शन सुरु करुन देतो असे आमिष […]Read More

राजकीय

गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव

मुंबई, दि. १०–100 वर्षाहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला “महाराष्ट्र राज्य महोत्सव” म्हणून आज घोषित करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी ही घोषणा विधानसभेत केली. विधानसभेत निवेदन करताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव 1893 साली लोकमान्य टिळकांनी सुरू केला, या उत्सवाची पार्श्वभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, […]Read More

गॅलरी

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे हे माझे परम कर्तव्य

मुंबई, दि १०विद्यार्थ्यांचा सत्कार करणे हे माझे परम कर्तव्य असून विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्यासाठी विशेष मेहनत करावी आणि आपले ध्येय गाठावे असे जाहीर प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात केले. ते पुढे म्हणाले.ही केवळ यशाची दखल नव्हे, तर पुढील वाटचालीसाठी दिलेली नवी ऊर्जा आहे. […]Read More

महानगर

खाजगीकरणा विरोधात म.न.पा. कामगार आंदोलनास उद्धव ठाकरेंचा पाठींबा !

मुंबई प्रतिनिधीबृहन्मुंबई महानगरपालिकेतील २२ विभागामध्ये एरीया बेस्ड नावाखाली सध्या कार्यरत असलेल्या कायम आणि कंत्राटी कामगार अशा १५ हजार कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात येत असल्यामुळे म.न.पा. मध्ये कार्यरत असलेल्या सर्व संघटना एकत्र येऊन संघर्ष समितीमार्फत तीव्र आंदोलन करणार आहेत. या संदर्भात अनेक राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निवेदन देण्यात आलेली आहेत. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उध्दव […]Read More