Month: July 2025

महानगर

MHADA कोकण मंडळाकडून 5,285 घरांसाठी लॉटरी

मुंबई, दि. १४ : म्हाडा कोकण मंडळाकडून ५ हजार २८५ घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. या लॉटरीसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या लॉटरीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. विविध योजने अंतर्गत ही लॉटरी काढली जाणार आहे. या लॉटरीमध्ये ७७ भूखंड असून तब्बल ५ हजार २८५ सदनिकांसाठी लॉटरी काढण्यात जाहीर करण्यात आली […]Read More

राजकीय

अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी मकोका कायद्यात सुधारणा

मुंबई, दि. १४ :–“अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी हे विधेयक निर्णायक ठरेल,” अशी ठाम भूमिका राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत मांडली. राज्यात वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कठोर पावले उचलण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम २०२५’ (मकोका) कायद्यात सुधारणा करण्याचे विधेयक आज विधानपरिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले. हे […]Read More

क्रीडा

अल्काराझला नमवून इटलीचा सिन्रर झाला विम्बल्डन विजेता

जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या जानिक सिन्नरने विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे. सिन्नरने पहिल्यांदाच हे विजेतेपद जिंकले आहे. विम्बल्डन चॅम्पियनशिपचे पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकणारा तो पहिला इटालियन खेळाडू बनला आहे. रविवारी रात्री लंडनमधील ऑल इंग्लंड क्लबच्या सेंटर कोर्टवर झालेल्या ३ तास ४ मिनिटे चाललेल्या सामन्यात इटलीच्या सिन्नरने स्पेनच्या कार्लोस अल्काराझचा ४-६, ६-४, ६-४, ६-४ […]Read More

देश विदेश

चीनने केली भारताची अडवणूक, हा देश आला मदतीला

नवी दिल्ली, दि. १४ : देशभर खरीपाचा हंगाम जोरात सुरु असताता युरीआ आणि डिएपी या महत्त्वाच्या खतांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. याला चीनने केलेली अडवणूक कारणीभूत ठरत आहे. भारतात डीएपी खताचा तुटवडा आहे. युरिया नंतर डीएपी हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वापरले जाणारे खत आहे. चीनने फॉस्फेटच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. डीएपी खत बनवण्यासाठी फॉस्फेट […]Read More

राजकीय

उज्वल निकम झाले राज्यसभेचे राष्ट्रपतीनियुक्त खासदार

नवी दिल्ली, दि. १४ : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. उज्ज्वल देवराम निकम यांच्यासोबतच अन्य तीन प्रतिष्ठित व्यक्तींचीही राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे आता त्यांना विशेष सरकारी वकील म्हणून काम करणे शक्य होणार नाही, […]Read More

राजकीय

बनावट खतांविरोधात राज्यांनी कठोर पावले उचलावीत,केंद्रीय कृषीमंत्र्यांचे पत्र….

नवी दिल्ली, दि.१४ :– देशभरात बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीबाबत वाढती चिंता व्यक्त करत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना गुणवत्तापूर्ण खते वेळेवर व योग्य दरात उपलब्ध करून देण्यासाठी […]Read More

महानगर

मासळी व्यवसायाच्या रक्षणासाठी जनआक्रोश मोर्चा

मुंबई, दि १४ मुंबई महानगरपालिकेच्या भूमिगत मासळी मंडई प्रकल्पाच्या विरोधात आणि पारंपरिक मासळी व्यवसायाचे रक्षण करण्याच्या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कोळी जनआक्रोश मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. हा मोर्चा क्रॉफर्ड मार्केट येथून महापालिका मुख्यालयापर्यंत निघणार आहे. आझाद मैदान येथील मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत समितीचे […]Read More

कोकण

किल्ले रायगडावरील शिवकालीन पर्जन्यमापक यंत्राची दूरवस्था !

महाड दि १४(मिलिंद माने)– छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगड वरील ऐतिहासिक दगडी बांधकाम असलेले शिवकालीन पर्जन्यमापक यंत्र काळाच्या ओघात ढासळू लागले असून सुमारे 300 वर्षापूर्वीचे या पर्जन्यमापक यंत्राची दूरवस्था झाली असून गडावरील हे पर्जन्यमापन यंत्र रायगड संवर्धनात पुन्हा उभे केले जावे अशी लाखो शिवभक्तांकडून मागणी केली जात आहे. मात्र पुरातत्त्व खाते आता […]Read More

महानगर

सरकारने केलेल्या अन्यायकारक कर वाढीच्या विरोधात आज ठाण्यात पुकारले बंद

ठाणे :आज खवय्या आणि मद्यपींना या बंदचा फटका बसला आहेसरकारने परवाना शुल्क 15 टक्के वाढविले आहे तर उत्पादन शुल्क 60 टक्के ने वाढविले आहे. या सरकारच्या निर्णया विरोधात हॉटेल बंद आंदोलन आज करण्यात आले. राज्यभरातल्या सर्वच बार आणि रेस्टॅारेन्ट मालकांनी राज्य सरकार च्या करवाढी विरोधात आज बंद ची हाक दिली होती.ठाण्यातील हॅाटेल असोसियशन कडून राज्य […]Read More

पर्यावरण

मोदी @11 अभियना अंतर्गत प्रबोधन आणि वृक्षारोपण संपन्न

पुणे, दि १४: केंद्रातील मोदी सरकारचा 11 वर्षाचा देश सेवेचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल वृक्षारोपणाचा कार्यक्रम विधी महाविद्यालय परिसरात हनुमान टेकडी पायथा (कांचन गल्ली) येथे पार पडला.  भाजपा पुणे शहर सरचिटणीस  पुनीत जोशी आणि भाजपा कोथरूड दक्षिण मंडळ अध्यक्ष कुलदीप सावळेकर यांच्या शुभहस्ते  वृक्षारोपणा करण्यात आले. मोदी @ ११ ह्या अभियानाबद्दल थोडीशी माहिती देऊन, ह्या अभियाना अंतर्गत […]Read More