Month: July 2025

महानगर

महामुंबई मेट्रोने गाठला नवा उच्चांक : २ए आणि ७ या

मुंबई दि १५ – मुंबईतील प्रवासाचा अनुभव अधिक सुलभ आणि कार्यक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो मार्गिका २ए आणि ७ वरील फेऱ्या वाढवण्यास मंजुरी दिली आहे. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला. ८ जुलै, […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

प्रारूप विकास आराखड्यास झालेला खर्च व्यर्थ, वसंत भसे

पुणे, (दि. १४ जुलै २०२५) हिंजवडी, चाकण, तळेगाव, खेड सह पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या लगत असणाऱ्या परिसरात वाहतुकीच्या समस्याने उग्ररूप धारण केले आहे. या समस्या पुणे महानगर नियोजन समितीला दुर्लक्षित केल्यामुळे उद्भवल्या आहेत. ७४ व्या घटना दुरुस्ती नुसार मा. राज्यपाल यांच्या आदेशाने स्थापन झालेल्या या समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र […]Read More

राजकीय

गणपतीसाठी कोकणातएसटीच्या जादा ५००० बसेस..

मुंबई दि १५ – २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी […]Read More

राजकीय

सर्व आदिवासींना धरती आबा योजनेतून वीज पुरवठा…

मुंबई दि १५– राज्यातील सर्व आदिवासींच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरती आबा ही योजना राबवली असून त्यात वीज पुरवठा योजना देखील आहे, त्यामध्ये ६,९६१ जोडण्या देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे त्यापैकी ४, ६८७ जोडण्या देण्याचं काम पूर्ण झालं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याबाबतचा मूळ प्रश्न राजू तोडसाम यांनी उपस्थित केला […]Read More

राजकीय

प्रधानमंत्री आवास योजनेची सर्व घरे सौर ऊर्जेवर, मोफत विजेची….

मुंबई दि १५ — प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्याला तब्बल तीस लाख इतकी घरे मंजूर करण्यात आली आहेत, ती देशात सर्वाधिक आहेत यातून सर्व दुर्बल घटकातील जाती जमातींना घरे उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली , ही सर्व घरे मोफत वीज उपलब्ध होणारी असतील. याबाबतचा मूळ प्रश्न संतोष दानवे यांनी […]Read More

राजकीय

आर्थिक फसवणुकीसाठी शिक्षेचा कालावधी आणि दंड रकमेत वाढ…

मुंबई दि १५ — राज्यातील आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या संचालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी या गुन्ह्यातील शिक्षा कालावधी तसंच दंडाची रक्कम वाढवण्यात येईल, त्यासोबतच त्यांची मालमत्ता लिलाव करण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. याबाबतचा मूळ प्रश्न अमोल खताळ यांनी उपस्थित केला होता, त्यावर प्रकाश सोळंके , सुधीर मुनगंटीवार यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या भुयारी बोगद्याचा पहिला भाग सुरू

मुंबई, दि. १४ : मुंबई–अहमदाबाद उच्चगती रेल्वे प्रकल्पाने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्रातील घनसोली ते शिळफाटा दरम्यान २१ किमी लांब असलेल्या बुलेट ट्रेनच्या भुयारी बोगद्याचा पहिला विभाग आता खुला झाला आहे. यामध्ये ठाणे खाडीखालून जाणारा तब्बल ७ किमी लांब भाग समाविष्ट आहे, जो देशातील अभियांत्रिकी कौशल्याचे प्रतीक मानला जातो. बोगद्याचा काही भाग न्यू […]Read More

ट्रेण्डिंग

वडा पाव, समोसा, जलेबी विकताना लावाला लागेल Health Alert फलक

नवी दिल्ली, दि. १४ : भारतातील वाढत्या लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता, समोसा, जलेबी, लाडू आणि वडा पाव यांसारख्या अन्नपदार्थांमध्ये किती साखर आणि कॅलरीज आहेत याची माहिती ‘तेल आणि साखर इशारा’ फलकाद्वारे द्यावी लागेल. मात्र सध्या हा नियम फक्त एम्स आणि आयआयटी सारख्या केंद्रीय संस्थांच्या कॅन्टीनवर […]Read More

राजकीय

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नाव बदलणार

मुंबई, दि. १४ : मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याचा प्रस्ताव सध्या केंद्र सरकारकडे विचाराधीन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेत याबाबत माहिती दिली असून, हे स्थानक “नाना जगन्नाथ शंकरशेठ” यांच्या नावाने ओळखले जाण्याची शक्यता आहे. नाना शंकरशेठ हे भारतात पहिली रेल्वे आणण्यात मोलाची भूमिका बजावणारे समाजसुधारक होते. त्यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ हे नामकरण सुचवण्यात […]Read More

ट्रेण्डिंग

अंतराळवीर शुभांशू शुक्लाचा परतीचा प्रवास सुरू

शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर आज १४ जुलै रोजी दुपारी ४:४५ वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर रवाना झाले. सुमारे २३ तासांच्या प्रवासानंतर, त्यांचे ड्रॅगन अंतराळयान १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता समुद्रात उतरेल. याला स्प्लॅशडाउन म्हणतात. हे अंतराळयान २६३ किलोपेक्षा जास्त माल घेऊन परत येईल. त्यात नासाचे हार्डवेअर आणि ६० हून अधिक प्रयोगांमधील डेटा समाविष्ट […]Read More