Month: July 2025

महानगर

येमेनी नागरिक बेकायदेशीर ९ वर्षापासून राहतो, पोलिसांना पत्ताच नाही?

मुंबई दि १६:– नंदूरबार जिल्हयातील अक्कलकुवा येथे जामीया इस्लामीया इशातूल उलुम या इस्लामिक धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत येमेन देशातील व्यक्ती व त्याचे कुटुंबिय व्हिसाची मुदत १९ फेब्रुवारी, २०१६ रोजी संपूनही राहत असल्याची बाब समोर आली आहे. विधानसभेत आमदार देवेंद्र कोठे आणि अनुप अग्रवाल यांनी लक्षवेधीद्वारे सदर प्रश्न उपस्थित केला होता. सदरहू मदरसा मध्ये बेकायदेशीररित्या राहत […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

शहराध्यक्ष धीरज घाटे व इतर १८ जणांवर गुन्हा दाखल करण्याची

पुणे, दि १६:- देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये अल्पसंख्यांक समुदाय विरोधात आत्तापर्यंत देशाने भाजपची बुलडोझर शाही पाहिली. मात्र आता पुण्यामध्ये विरोधकांवरती ही भाजप बुलडोजर चालवू पाहतोय. असा आरोप चैत्राली धाडवे-क्षीरसागर यांनी  आज पत्रकार परिषदेत केला.  पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेला चैत्राली धाडवे-क्षीरसागर यांच्यासह अॅड. आकाश साबळे, सागर धाडवे, सरचिटणीस युवक काँग्रेस पुणे शहर […]Read More

देश विदेश

आशियाई एरोबिक्स आणि हिप-हॉप चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी जिंकले १६ सुवर्ण,६

ठाणे दि : दुबई येथील FISAF – आशियाई एरोबिक्स आणि हिप हॉप चॅम्पियनशिप २०२५ मध्ये नुकत्याच झालेल्या फिटनेस एरोबिक्स आणि स्पोर्ट्स एरोबिक्समध्ये १६ सुवर्ण, ६ रौप्य पदके आणि हिप-हॉप बॅटलमध्ये १ ट्रॉफी जिंकून भारतातील (महाराष्ट्र) सहा उत्साही मुलींनी देशाचे नाव उंचावले. १ ते ३ जुलै २०२५ रोजी दुबई येथे झालेल्या या स्पर्धेत चमकदार कामगिरीने सांची […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन

पुणे, दि. १६ : लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि ‘केसरी’चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक जयंत टिळक यांचे आज पहाटे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. डॉ. दीपक टिळक हे काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील राहिले होते. 2021 मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रायलयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात […]Read More

विदर्भ

सीमावादातील ‘ती’ १४ गावे आता चंद्रपूर जिल्ह्यात…

चंद्रपूर दि १६:- तेलंगणाच्या सीमावादात अडकलेल्या जिवती तालुक्यातील १४ मराठी गावे लवकरच महाराष्ट्रात समाविष्ट होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून, यावर अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवनातील दालनात झालेल्या बैठकीत दिली. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक, राजुराचे आमदार देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी […]Read More

सांस्कृतिक

संगीत नाटकासाठी रवींद्र नाट्य मंदिर 25% सवलतीत

मुंबई, दि.१६– संगीत नाटकासाठी 25% सवलतीच्या दरात रवींद्र नाट्यगृह उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज येथे केली.मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते दिवंगत अरविंद पिळगावकर यांच्या आठवणींचा संग्रह असलेल्या तपस्या नेवे यांनी संपादित केलेल्या “कोहम् सोहम्” या पुस्तकाचे प्रकाशन आज रवींद्र नाट्य मंदिरच्या लघुनाट्य गृहात सांस्कृतिक मंत्री […]Read More

ट्रेण्डिंग

अनंत अंबानी करणार लालबागच्या राजाच्या मंडप सजावटीचा खर्च

मुंबई, दि. १५ : मुंबईतील परळमधील प्रसिध्द लालबाग राजाच्या गणेश मंडपाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. यंदाही रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी मंडपाच्या संपूर्ण सजावटीचा खर्च देणार आहेत. ते गेल्या वर्षीपासून मंडळाचे कार्यकारी सल्लागार आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाच्या तयारीचा शुभारंभ १४ जून रोजी पार पडलेल्या गणेश मुहूर्त पूजनने करण्यात आला. या मंडळाचा यंदा […]Read More

ट्रेण्डिंग

योगी आदित्यनाथांवरील चित्रपटाबाबत न्यायालयाकडून सेन्सॉर बोर्डाला नोटीस

मुंबई, दि. १५ : ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ ए योगी’ हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट सध्या चर्चेत आहे. अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ हा चित्रपट १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट योगी आदित्यनाथ यांचा एका साध्या कुटुंबातून मोठा नेता बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवतो. चित्रपटात अभिनेता […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबतचा ८ वर्षांचा पगार शासनाने थकवला

कोल्हापूर,दि. १५ : आपल्या देशात खेळाडूंकडून आंतरराष्ट्रीय पदकांची अपेक्षा केली जाते. आपण त्यांच्या कामगिरीचा अभिमानही बाळगतो मात्र शासनाकडून त्यांच्या कामगिरीककडे सपशेल दुर्लक्ष होत असते. कोल्हापुरची आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राही सरनोबत ही आठ वर्षे पगाराविना राहिल्याची माहिती समोर आली आहे, 2014 साली राही सरनोबतची उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पहिले तीन वर्षे पगार झाल्यानंतर पुढील आठ […]Read More

राजकीय

राष्ट्रवादी पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे

मुंबई दि १५:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज आपल्या पदावरून पायउतार झाले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित केलेल्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली. याच बैठकीत माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. यावेळी भावना व्यक्त करताना जयंत पाटील यांनी आपल्या कारकिर्दीचा […]Read More