Month: July 2025

पश्चिम महाराष्ट्र

पुणे खंडपीठासाठी वकिल संघटनांची आक्रमक भूमिका

पुणे, दि. १८ : पुणे जिल्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्याच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीसाठी वकील संघटनांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा न्यायालयात झालेल्या संयुक्त बैठकीत वकील संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांना 10 दिवसांचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. रिपोर्टनुसार, 26 जुलैपर्यंत कोणताही अधिकृत निर्णय न झाल्यास 1 ऑगस्टपासून पुणे जिल्ह्यातील […]Read More

महाराष्ट्र

सीमाभागातील निपाणी शहरात कन्नड भाषेची सक्ती

बेळगाव, दि. १८ : महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये मराठीला हिंदीचे वर्चस्व सहन करावे लागत असल्याने राज्यभरातील वातावरण पेटले आहे. त्यातच आत कर्नाटक सीमाभागात मराठीभाषिकांवर कन्नडचे वर्चस्व प्रस्थापित होत आहे. बेळगाव पाठोपाठ आता जिल्ह्यातील निपाणी (Nipani) शहरातही कन्नड भाषा सक्तीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.कारण सीमाभागातील निपाणी शहरात दैनंदिन व्यवहार, शासकीय कामकाज तसेच दुकानदार व व्यापाऱ्यांनीही त्यांच्या नामपाट्यांवर […]Read More

विज्ञान

भारत विकसीत करतोय जगातील पहिला ड्युअल स्टेल्थ ड्रोन

हैदराबाद, दि. १८ : भारत जगातील पहिला ड्युअल स्टेल्थ ड्रोन विकसीत केला जात आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा ड्रोन केवळ शत्रूच्या हाय-रेझोल्यूशन रडार आणि इन्फ्रारेड सिग्नलपासून बचाव करणार नाही, तर काही सेकंदात हल्ला करण्यास देखील सक्षम असेल. या ड्रोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘रडार अ‍ॅब्सॉर्प्शन अँड मल्टीस्पेक्ट्रल अ‍ॅडॉप्टिव्ह’ तंत्रज्ञान (RAMA). या तंत्रज्ञानावर आधारित ड्रोनला RAMA […]Read More

ट्रेण्डिंग

NCERT पुस्तकात मुघलांच्या इतिहासात मोठे बदल

नवी दिल्ली, १८ : ‘एनसीईआरटी’ बोर्डाने इयत्ता ८ वीच्या पुस्तकात मोठे बदल केले आहेत. ‘एनसीईआरटी’ने नवीन पुस्तकांमध्ये मुघल बादशाह बाबरचे क्रूर विजेता, अकबराचे सहिष्णू तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा’ म्हणून वर्णन केले असल्याची माहिती मिळाली आहे. मुघलांचा इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास यांचा समावेश आठवीच्या या नव्या पुस्तकात करण्यात आला आहे.‘एनसीईआरटी’ची ही नवीन पुस्तके बाजारात विक्रीसाठी उपलब्ध […]Read More

ट्रेण्डिंग

Scale AI मधील ७०० कर्मचाऱ्यांनी तडकाफडकी गमावली नोकरी

AI च्या आगमनामुळे अनेक कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याचा अंदाज आता खरा ठरत आहे. स्केल एआय या वेगाने वाढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कंपनीने आपल्या एकूण कर्मचारी संख्येच्या सुमारे 14 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय. त्यामुळे ही कपात टेक उद्योगात खळबळ माजवणारी ठरली आहे. मेटाकडून 14 अब्ज डॉलर्स म्हणजे अंदाजे 1.16 लाख कोटी रुपये इतका प्रचंड निधी मिळाल्यानंतर अवघ्या […]Read More

बिझनेस

BMW ची सर्वात स्वस्त कार भारतात लाँच

मुंबई,दि. १८ : BMW इंडियाने आज भारतीय बाजारात बीएमडब्ल्यू २ सिरीज ग्रॅन कूपचे अपडेटेड मॉडेल लाँच केले आहे. दुसऱ्या पिढीची ही कार सध्याच्या मॉडेलपेक्षा मोठी आहे आणि नवीन वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. सुरक्षेसाठी ट्रॅक्शन कंट्रोल आणि लेव्हल-२ अडास सारखी वैशिष्ट्ये आहेत. कंपनीने ही कार २१८एम स्पोर्ट आणि २१८एम स्पोर्ट प्रो या दोन प्रकारांमध्ये सादर केली आहे. […]Read More

बिझनेस

Airtel च्या ग्राहकांना Perplexity Pro’ चे १७ हजारांचे सबस्क्रीप्शन मोफत

मुंबई, दि. १८ : देशातील आघाडीचे नेटवर्क भारती एअरटेलने आपल्या पात्र ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. आता एअरटेल ग्राहक तब्बल17 हजार रुपये किमतीचे ‘Perplexity Pro’ सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी पूर्णपणे मोफत मिळवू शकतात. सध्या चॅटजीपीटी आणि जेमिनी सारखे एआय चॅटबॉट्स लोकप्रिय झाले आहेत. पर्प्लेक्सिटी हे एक एआय-चालित सर्च इंजिन आहे. हे तुम्हाला इंटरनेटवरून माहिती गोळा […]Read More

राजकीय

भास्कर जाधवांची विधानसभेत दिलगिरी…

मुंबई दि १८ — काल विधानसभेत शिवसेना उबाठा पक्षाच्या आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांनी हातवारे करून वक्तव्य केली आणि सभागृहाबाहेर देखील माध्यमांसमोर अध्यक्षांबाबत वक्तव्ये केली ही अश्लील पद्धतीची होती , त्यांनी माफी मागावी अन्यथा अध्यक्षांनी त्यांना निलंबित करावे अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई, दादा भुसे यांनी केली. त्यावर भास्कर जाधव यांनी दिलगिरी व्यक्त केली. […]Read More

राजकीय

महायुती सरकारला सत्तेचा माजमाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि १८महायुती सरकारला सत्तेचा माज असून या सत्तेमध्ये चड्डी बनियान गँग असून हीच चड्डी बनियान गँग हे सरकार चालवत आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानभवनात अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. ते पुढे म्हणाले या सरकारच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून या सरकारन राज्यातील कोणत्याही नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण […]Read More

राजकीय

विधिमंडळात आता आमदारांसाठी नीतिमूल्ये समिती….

मुंबई दि १८ — विधिमंडळात काल झालेल्या हाणामारीच्या प्रकरणामुळे विधिमंडळाची मोठी बदनामी झाली आहे, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता संसदेतील नीतिमूल्य समितीच्या धर्तीवर इथेही अशी समिती विधानपरिषद सभापतींशी चर्चा करून निर्माण केली जाईल अशी घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. यासोबतच पुढील अधिवेशनापासून केवळ विधीमंडळ सदस्य ,त्यांचे स्वीय सहाय्यक आणि शासकीय अधिकारी यांनाच विधीमंडळ परिसरात […]Read More